शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ७१ लाख रुपये केले प्रशासनाने वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र शासनाकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन जमा केले जात होते. मात्र या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी सुध्दा घेत होते. शिवाय काही अपात्र असलेल्या व एकाच कुटुंबातील सात आठ जण या योजनेचा लाभ घेत होते. 

ठळक मुद्देशेतकरी सन्मान योजना : ३९२३ शेतकरी ठरले होते अपात्र

  अंकुश गुंडावार    लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र या योजनेचा लाभ आयकर भरणारे धनाढय शेतकरी सुध्दा घेत होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर आयकर भरणाऱ्या आणि अपात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून मानधनाची दिलेली रक्कम वसुल करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले. यातंर्गत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देऊन जिल्ह्यातील ७३३ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ७१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र शासनाकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन जमा केले जात होते. मात्र या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी सुध्दा घेत होते. शिवाय काही अपात्र असलेल्या व एकाच कुटुंबातील सात आठ जण या योजनेचा लाभ घेत होते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात आयकर भरणारे जिल्ह्यातील २२६९ शेतकरी आढळले तर १६५४ शेतकरी विविध कारणाने अपात्र ठरले होते. या एकूण ३९२३ शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आतापर्यंत मानधनापोटी ३ कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करुन शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यातंर्गत प्रत्येक तालुक्यातील अपात्र ठरलेल्या व आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदारांनी नोटीस बजावून मानधनाची रक्कम परत करण्यास सांगितले होते. यापैकी आतापर्यंत ७३३ शेतकऱ्यांनी मानधनाची रक्कम परत केली आहे. यात आयकरधारक ६६० शेतकऱ्यांनी ६५ लाख ४ हजार आणि अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी ५ लाख ९४ हजार रुपये शासनाकडे जमा केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. सध्या तालुकास्तरावर ही रक्कम वसुलची प्रक्रिया सुरु आहे. 

सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यातीलआयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांकडून मानधन स्वरुपात त्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली रक्कम वसूल केली जात आहे. विशेष म्हणजे शेतकरी सुध्दा प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.रक्कम परत करण्यासाठी मुदत नाहीआयकर भरणाऱ्या व अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मानधनाची रक्कम परत करण्यासाठी प्रशासनाने विशिष्ट कालावधी ठरवून दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या सवडीनुसार ही रक्कम परत करता येणार असले तरी बरेच शेतकरी नोटीस मिळाल्यानंतर ही रक्कम परत करीत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना