शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ७१ लाख रुपये केले प्रशासनाने वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र शासनाकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन जमा केले जात होते. मात्र या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी सुध्दा घेत होते. शिवाय काही अपात्र असलेल्या व एकाच कुटुंबातील सात आठ जण या योजनेचा लाभ घेत होते. 

ठळक मुद्देशेतकरी सन्मान योजना : ३९२३ शेतकरी ठरले होते अपात्र

  अंकुश गुंडावार    लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र या योजनेचा लाभ आयकर भरणारे धनाढय शेतकरी सुध्दा घेत होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर आयकर भरणाऱ्या आणि अपात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून मानधनाची दिलेली रक्कम वसुल करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले. यातंर्गत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देऊन जिल्ह्यातील ७३३ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ७१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र शासनाकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन जमा केले जात होते. मात्र या योजनेचा लाभ आयकर भरणारे शेतकरी सुध्दा घेत होते. शिवाय काही अपात्र असलेल्या व एकाच कुटुंबातील सात आठ जण या योजनेचा लाभ घेत होते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात आयकर भरणारे जिल्ह्यातील २२६९ शेतकरी आढळले तर १६५४ शेतकरी विविध कारणाने अपात्र ठरले होते. या एकूण ३९२३ शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आतापर्यंत मानधनापोटी ३ कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करुन शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यातंर्गत प्रत्येक तालुक्यातील अपात्र ठरलेल्या व आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदारांनी नोटीस बजावून मानधनाची रक्कम परत करण्यास सांगितले होते. यापैकी आतापर्यंत ७३३ शेतकऱ्यांनी मानधनाची रक्कम परत केली आहे. यात आयकरधारक ६६० शेतकऱ्यांनी ६५ लाख ४ हजार आणि अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी ५ लाख ९४ हजार रुपये शासनाकडे जमा केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. सध्या तालुकास्तरावर ही रक्कम वसुलची प्रक्रिया सुरु आहे. 

सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यातीलआयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांकडून मानधन स्वरुपात त्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली रक्कम वसूल केली जात आहे. विशेष म्हणजे शेतकरी सुध्दा प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.रक्कम परत करण्यासाठी मुदत नाहीआयकर भरणाऱ्या व अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मानधनाची रक्कम परत करण्यासाठी प्रशासनाने विशिष्ट कालावधी ठरवून दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या सवडीनुसार ही रक्कम परत करता येणार असले तरी बरेच शेतकरी नोटीस मिळाल्यानंतर ही रक्कम परत करीत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना