शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

पाणी टंचाईविषयी प्रशासन गंभीर नाही

By admin | Updated: May 1, 2016 01:53 IST

गतवर्षी जिल्ह्यात झालेला अल्प पाऊस, पाणीटंचाई व दुष्काळाच्या संबधाने शासन व प्रशासन गंभीर नाही.

अर्जुनी-मोरगाव : गतवर्षी जिल्ह्यात झालेला अल्प पाऊस, पाणीटंचाई व दुष्काळाच्या संबधाने शासन व प्रशासन गंभीर नाही. जिल्ह्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई असतांनाही पंचायत समिती व तालुकास्तरावर पाणीटंचाई संबधाने बैठकाच घेतल्या नाहीत. शासन व प्रशासनाच्या डोळेझाक प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असल्याचा आरोप जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे. आॅक्टोबर महिन्यात धानपिकात दाणा भरण्यासाठी आवश्यक असलेला पाऊस झाला नाही. केवळ २.२ मिमी पाऊस पडला. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसला. जिल्ह्यात तलावांची संख्या भरपूर आहे. मात्र ते कोरडे आहेत अशा तलावात सातत्याने पाणीसाठा राहावा यादृष्टीने प्रयत्नच होतांना दिसत नाही. याचा परिणाम पाणी टंचाईच्या रुपाने पुढे आला. पंचायत समिती व तालुकास्तरावर पाणी टंचाई संदर्भात बैठकच होत नाही. अर्जुनी मोरगाव येथे बैठक घेण्यात आली. ती केवळ अर्ध्या तासात पालकमंत्र्यांनी गुंडाळली. विशेष म्हणजे या बैठकीत सरपंच व पाणी पुरवठा विभागाचे जबाबदारी अधिकारी उपस्थित नव्हते. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पाणी टंचाईचा विषय सातत्याने चर्चेला होते. वारंवार मागणी करून ही पदाधिकारी हा विषय गांभीर्याने न घेता देखभाल दुरूस्ती योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीतून यावर्षी एकाही विंधन विहीरीला मंजूरी देण्यात आली नाही. त्यामुळे शासन व प्रशासन पाणी टंचाई संबधाने किती गंभीर आहे याची कल्पना येते. आगामी आठ दिवसात पाणी टंचाईवर उपाययोजना केली गेली नाही. परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्यांच्या पाणी टंचाई व दुष्काळच्या समस्यांकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे परशुरामकर म्हणाले. शासन प्रशासन दोन्ही बेजबाबदार असल्याचे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)