शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

दोन तृतीयांश बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:47 IST

एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते.

ठळक मुद्देसंडे अँकर । जि.प.तील अभद्र युती, मंत्रिमंडळ गठित झाल्यानंतर निर्णय, अभद्र युती तोडण्यासाठी काँग्रेस नेते अनुकुल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रातील राजकारणात तयार झालेल्या नवीन सत्ता समीकरणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच गोंदिया जि.प.मध्ये मागील साडेचार वर्षांपासून असलेली काँग्रेस-भाजपची अभद्र युती तोडण्यासाठी आता पावले उचलली जात आहे. जि.प.तील विद्यमान सत्ताधाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असून त्यासाठी आता जुळवाजुळव करण्यास सुरूवात करण्यात आल्याची माहिती आहे.एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र स्थानिक राजकारण आणि दोन्ही पक्षातील नेत्यांच्या मतभेदामुळे काँग्रेसने भाजपसोबत अभद्र युती करुन साडेचार वर्षांपूर्वी जि.प.मध्ये स्थापन केली होती. यामुळे सर्वाधिक सदस्य निवडून येऊन सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी.आ.गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत जि.प., पं.स.सदस्य आणि नगरसेवकांनी सुध्दा भाजपमध्ये प्रवेश केला.जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपसोबत जाण्यासाठी जे नेते अनुकुल होते तेच आता पक्षात नसल्याने जि.प.तील अभद्र युती तोडण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी सक्रीय झाले आहे. त्यामुळेच त्यांनी दोन दिवसांपूर्वी जि.प. तील काँग्रेसचा गट नेता बदलून त्यासंबंधिचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद नियमानुसार सत्तारुढ पदाधिकाऱ्यांवर अविश्वास आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते.यासाठी एकूण ३६ सदस्यांची संख्या असणे आवश्यक आहे. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आणि काँग्रेसच्या एकूण १६ सदस्यांपैकी ११ सदस्य असून ५ सदस्यांना पक्षांतून निलबिंत करण्यात आले होते. त्यामुळे ३६ चा आकडा जुळत नाही.हीच अडचण ओळखून विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाने निलबिंत केलेल्या ५ जि.प.सदस्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा पक्षात घेतल्यास अविश्वास आणण्यासाठी आवश्यक असलेला ३६ चा आकडा सहजपणे पार करणे शक्य आहे. याकरिता काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाºयांनी यासंबंधिचे पत्र पक्ष श्रेष्ठींकडे पाठविले आहे. त्यावर निर्णय होताच जि.प.तील अभद्र युती तोडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे.सदस्य परत येण्यास तयारविधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक जि.प.,पं.स. सदस्य भाजपमध्ये गेले होते.मात्र यापैकी बरेच जण आता काँग्रेसमध्ये येण्यास तयार असून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी सुध्दा अनुकुल असल्याची माहिती आहे.भाजप बिनधास्तजिल्हा परिषदेत भाजपसोबत असलेली अभद्र युती तोडण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीने हालचाली सुरू केल्या आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भाजप नेते बिनधास्त असून युती तोडण्यासंदर्भात कुठल्याच घडामोडी सुरू नसल्याचे या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. त्यामुळे भाजप बिनधास्त असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद