शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

दोन तृतीयांश बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:47 IST

एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते.

ठळक मुद्देसंडे अँकर । जि.प.तील अभद्र युती, मंत्रिमंडळ गठित झाल्यानंतर निर्णय, अभद्र युती तोडण्यासाठी काँग्रेस नेते अनुकुल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रातील राजकारणात तयार झालेल्या नवीन सत्ता समीकरणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच गोंदिया जि.प.मध्ये मागील साडेचार वर्षांपासून असलेली काँग्रेस-भाजपची अभद्र युती तोडण्यासाठी आता पावले उचलली जात आहे. जि.प.तील विद्यमान सत्ताधाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असून त्यासाठी आता जुळवाजुळव करण्यास सुरूवात करण्यात आल्याची माहिती आहे.एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस २० आणि भाजपचे १७ असे पक्षीय बलाबल आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र स्थानिक राजकारण आणि दोन्ही पक्षातील नेत्यांच्या मतभेदामुळे काँग्रेसने भाजपसोबत अभद्र युती करुन साडेचार वर्षांपूर्वी जि.प.मध्ये स्थापन केली होती. यामुळे सर्वाधिक सदस्य निवडून येऊन सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी.आ.गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत जि.प., पं.स.सदस्य आणि नगरसेवकांनी सुध्दा भाजपमध्ये प्रवेश केला.जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपसोबत जाण्यासाठी जे नेते अनुकुल होते तेच आता पक्षात नसल्याने जि.प.तील अभद्र युती तोडण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी सक्रीय झाले आहे. त्यामुळेच त्यांनी दोन दिवसांपूर्वी जि.प. तील काँग्रेसचा गट नेता बदलून त्यासंबंधिचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद नियमानुसार सत्तारुढ पदाधिकाऱ्यांवर अविश्वास आणण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते.यासाठी एकूण ३६ सदस्यांची संख्या असणे आवश्यक आहे. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आणि काँग्रेसच्या एकूण १६ सदस्यांपैकी ११ सदस्य असून ५ सदस्यांना पक्षांतून निलबिंत करण्यात आले होते. त्यामुळे ३६ चा आकडा जुळत नाही.हीच अडचण ओळखून विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाने निलबिंत केलेल्या ५ जि.प.सदस्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा पक्षात घेतल्यास अविश्वास आणण्यासाठी आवश्यक असलेला ३६ चा आकडा सहजपणे पार करणे शक्य आहे. याकरिता काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाºयांनी यासंबंधिचे पत्र पक्ष श्रेष्ठींकडे पाठविले आहे. त्यावर निर्णय होताच जि.प.तील अभद्र युती तोडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे.सदस्य परत येण्यास तयारविधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक जि.प.,पं.स. सदस्य भाजपमध्ये गेले होते.मात्र यापैकी बरेच जण आता काँग्रेसमध्ये येण्यास तयार असून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी सुध्दा अनुकुल असल्याची माहिती आहे.भाजप बिनधास्तजिल्हा परिषदेत भाजपसोबत असलेली अभद्र युती तोडण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीने हालचाली सुरू केल्या आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भाजप नेते बिनधास्त असून युती तोडण्यासंदर्भात कुठल्याच घडामोडी सुरू नसल्याचे या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. त्यामुळे भाजप बिनधास्त असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद