शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:55 IST

आदिवासी समाज शारीरिकदृष्ट्या मेहनती आहे. पण त्याला परिश्रमाचे योग्य मोल मिळत नाही. याकरिता आदिवासी समाजातील लोक जास्त प्रमाणावर उच्चशिक्षित झाले तर समाजामध्ये अनेक गुणवंत लोक तयार होतील.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : भागी येथील आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आदिवासी समाज शारीरिकदृष्ट्या मेहनती आहे. पण त्याला परिश्रमाचे योग्य मोल मिळत नाही. याकरिता आदिवासी समाजातील लोक जास्त प्रमाणावर उच्चशिक्षित झाले तर समाजामध्ये अनेक गुणवंत लोक तयार होतील. त्यामुळे समाजाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारु शकते आणि तेव्हाच आपल्याला वाटेल की आपला समाज हा इतर समाजाच्या बरोबरीने विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. याकरिता आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील ग्राम भागी (चिचगड) येथे आदर्श आदिवासी सामूहिक विवाह समितीच्यावतीने रविवारी (दि.२१) आयोजित आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेत कोरेटे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी आदिवासी हलबा हलबी समाज संघटनेचे अध्यक्ष श्रावण राणा, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरत दुधनाग, गडचिरोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, मुख्य अभियंता प्रकाश घरत, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, माजी सभापती देवराज वडगाये, आमगावचे गटशिक्षण अधिकारी वाय.सी.भोयर, सालेकसाचे माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, भागीचे सरपंच धनराज कोरोंडे, आश्रमशाळा संचालक जितेंद्र नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी आमदार संजय पुराम यांनी, सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज असून यात वर-वधू कुटुबीयांच्या वेळ व पैशांची बचत होते असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष डॉ.विठ्ठल भोयर यांनी मांडले.संचालन सहायक शिक्षक भागवत भोयर व विलास राऊत यांनी केले. आभार सहायक शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी मानले.या विवाह सोहळ्यासाठी समितीचे उपाध्यक्ष युवराज कोल्हारे, कृष्णा गवाड, नूरचंद नाईक, सचिव मधुकर कुरसुंगे, सहसचिव कोषाध्यक्ष ओमराज राऊत, सहकोषाध्यक्ष जयपाल कोसरे, संघटक शिवकुमार राऊत, प्रेमलाल कोरोंडे, सुरेश वारई, अरविंद कोरोंडे, राधेश्याम राऊत, शामराव गावड, अर्जुन भोयर, उमेश धानगाये यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. या सोहळ््याला आदिवासी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि परिसरातील समाजातील बहुसंख्य महिला, पुरुष व युवक व वºहाडी प्रामुख्याने उपस्थित होते.१० जोडप्यांचे ‘शुभमंगल’आदिवासी सामूहिक विवाह समितीच्यावतीने ग्राम भागी येथे आयोजीत आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ््यात १० जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले. सोहळ््यात समाजबांधव व वºहाडी व पाहुणे परिणयबद्ध नव जोडप्यांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्न