शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

आमगाव नगरी झाली बेवारस

By admin | Updated: March 7, 2016 01:34 IST

आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासाठी टाकण्यात आलेली रिट याचिका (२०/२०१५) उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने रद्दबातल केली आहे.

रिट याचिका फेटाळली : ना ग्रामपंचायत, ना नगर पंचायत गोंदिया : आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासाठी टाकण्यात आलेली रिट याचिका (२०/२०१५) उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने रद्दबातल केली आहे. यासह महाराष्ट्र शासनाची १२ फेब्रुवारी २०१५ ची अधिसूचनाही रद्दबातल करण्यात आली आहे. त्यामुळे सदर आदेशाच्या अनुषंगाने आजच्या स्थितीत आमगाव नगर पंचायत किंवा नगर परिषद आहे याचे चित्र स्पष्ट होत नाही. तर सदर आदेशामुळे प्रशासकांची सेवा समाप्त झाल्याचे निर्दशनास येते. त्यामुळे आमगाव नगरी आजघडीला बेवारस दिसत आहे. शासनाने जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या सहा तालुकास्थळांचा दर्जा वाढ करून त्यांना नगर पंचायतचा दर्जा दिला होता. मात्र आमगावातील लोकसंख्येच्या दृष्टीने नगर पंचायत ऐवजी नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा या मागणीला घेऊन पद्मावती चुटे यांनी महाराष्ट्र शासनाविरोधात रिट याचिका टाकली होती. मात्र उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर यांनी १० फेब्रुवारी रोजी ही याचिका रद्दबातल केली. तसेच महाराष्ट्र शासनाची १२ फेब्रुवारी २०१५ रोजीची नगर पंचायतबाबतची अधिसूचना रद्द करीत नगर पंचायत किंवा नगर परिषद बनविने हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील नसून राज्य शासनाने याबाबत योग्य निर्णय घेण्याचा निर्णय दिला आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने आजच्या स्थितीत आमगाव नगर पंचायत किंवा नगर परिषद आहे याचे चित्र स्पष्ट होत नाही. तसेच आदेशामुळे प्रशासकांची सेवा समाप्त झाल्याचेही म्हणणे वावगे ठरणार नाही. असे झाल्याने नगर पंचायतीचे चाललेले कारभार जसे विधि प्रमाणपत्र देणे, बांधकाम परवानगी देणे, मालमत्ता कराची वसुली, स्वच्छता विषयक बाबी, पाणी पुरवठा, पथदिवे इत्याही नागरी सुविधा खोळबंत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.तसेच आता नागरिकांना आपल्या समस्या कोणाकडे नोंदवाव्या याबाबत असमंजस स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमगाव नगरी आजघडीला बेवारस झाली असेच म्हणता येईल. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)