शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दिव्यांग बांधवांसाठी ३ डिसेंबरपर्यंत नविन धोरण, बच्चू कडूंची ग्वाही

By अंकुश गुंडावार | Updated: August 17, 2023 18:13 IST

दिव्यांग प्रमाणपत्र वितरणासाठी अभियान राबविणार

गोंदिया : यापूर्वी दिव्यांग बांधवांची सुनावणी होत नव्हती पण आता दिव्यांग बांधवांच्या तक्रारींकरिता संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्र राज्यभर मी फिरतो आहे, फिरणार आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या तक्रारींतून नविन धोरण आम्ही तयार करणार आहोत. ३ डिसेंबरपर्यंत नविन धोरण राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी आणणार असल्याची ग्वाही दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा आ. बच्चू कडू यांनी सांगितले.

गोंदिया येथे जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान कार्यक्रम गुरुवारी (दि.१७) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ते गोंदिया येथे आले असताना पत्रकारांसह ते बोलत होते. आ. बच्चू कडू म्हणाले, महाराष्ट्रभर या संदर्भात दौरे करित असतांना एक बाब प्रकर्षाने जाणवली की कोणत्याही जिल्ह्यात तालुक्याला दिव्यांग मंडळ नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांना जिल्हा कार्यालयाला येवून प्रमाणपत्र घ्यावा लागते.

सध्या ग्रामीण रूग्णालयात प्रमाणपत्र देता येत नाही. जिल्हा कार्यालयातूनच ती व्यवस्था आहे. जास्तीत जास्त उपजिल्हा रूग्णालयातून ती व्यवस्था करता येईल. या संदर्भात जि.प.चे सीईओ आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून शिबीरातून किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रमाणपत्र वितरण करता येईल. एका महिन्यापुरते प्रमाणपत्र वितरण करण्याचे अभियान याकरिता राबविण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीबाबत बोलणे टाळले

शासन आपल्या दारी तसेच दिव्यांग आपल्या दारी या युती शासनाच्या योजनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे या योजनेवरून युतीशासनाला जुमले सरकार म्हणून हिणवतात यावर आ. बच्चू कडू म्हणाले की जुमले असोत की आणखी काही असो, सरकार काम तर करित आहे. घरी बसून तर काम होत नाही असे सांगितले. खा.शरद पवार, ना. अजित पवार यांच्या पुण्यातील भेटी संदर्भात माध्यमांनी विचारले असता मी आज दिव्यांग बांधवाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे. या संदर्भात काय ते विचारा म्हणत इतर प्रश्नांची उत्तरे देण्यास त्यांनी टाळले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूgondiya-acगोंदियाDivyangदिव्यांग