शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

८३७७ रुग्णांना मिळाले नवजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 00:44 IST

कोणताही आजार हा श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करीत नाही. श्रीमंत व्यक्तीला जर हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदू व मज्जासंस्थेचे आजार झाले...

जीवनदायी योजना : बीपीएल रुग्णांवर महागडा उपचारगोंदिया : कोणताही आजार हा श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करीत नाही. श्रीमंत व्यक्तीला जर हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदू व मज्जासंस्थेचे आजार झाले तर तो त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार व शस्त्रक्रिया करु शकतो. परंतु गरीब आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्यांना महागडा उपचार करणे शक्य होत नाही. अशा रुग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून नवजीवन मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३७७ रुग्णांनी या योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ घेतला.राज्य शासनाने दारिद्रय रेषेखाली जीवन जगणा-या व्यक्तिला हृदयरोग, मेंदू, मज्जासंस्थांचे विकार आणि मुत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाचे उपचार व शस्त्रक्रियेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हयातील तब्बल ८३७७ रुग्णांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे. या योजनेअंतर्गत निवड केलेल्या रुग्णांवर जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील खाजगी तथा शासकिय रु ग्णालयातून उपचार मिळाले आहेत. या रु ग्णांच्या आजारावरील महागडे उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च राज्य शासनाने केल्यामुळे त्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखालील पिवळया शिधापत्रिकाधारक कुटुंबाबरोबरच अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक आणि दारिद्रय रेषेवरील केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशी आरोग्य ओळखपत्रे असणारे कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ ते २८ आॅगस्ट २०१६ या कालावधीत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हयात व जिल्हयाबाहेरील रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर १६ कोटी १३ लक्ष २१ हजार ७१५ रुपये खर्च करण्यात आले. या योजनेअंतर्गत जळालेले रुग्ण, कार्डिओलॉजी, क्रिटीकल केअर, ईएनटी सर्जरी, इन्डोक्रोनोलॉजी, जनरल मेडिसीन अशा प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्हयात या योजनेअंतर्गत उपचार व शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आलेल्या खाजगी व शासकिय रुग्णालयातून २६२८ रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यासाठी ३ कोटी ८० लाख १५ हजार ४०० रुपये, तर जिल्हयाबाहेरील खाजगी, विश्वस्त संस्थांचे रुग्णालय व शासकिय रुग्णालयातून जिल्हयातील ५७४९ रुग्णांनी उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत. यासाठी शासनाने १२ कोटी ३३ लाख ६ हजार ३१५ रु पये रु ग्णांवर खर्च केले. जिल्हयातील गोरगरीब दारिद्रय रेषेखाली जीवन जगणा-या रु ग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ख-या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. आता ही योजना ४ आॅगस्ट २०१६ पासून महात्मा फुले जनआरोग्य योजना म्हणून राज्यात लागू झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)