शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

मत्स्य व्यवसायातून आठ हजार कुटुंबांना आधार

By admin | Updated: September 23, 2015 05:28 IST

मालगुजारी तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय उत्तमरित्या वाढत आहे. हा मत्स्यपालन व्यवसाय

देवानंद शहारे ल्ल गोंदियामालगुजारी तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय उत्तमरित्या वाढत आहे. हा मत्स्यपालन व्यवसाय आठ हजार कुटुंबांसाठी आधार बनला आहे. मत्स्य व्यवसाय व मत्स्य उत्पादनाबाबत गोंदिया जिल्हा चंद्रपूरनंतर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागात अनेक महत्त्वपूर्ण पदे रिक्त असतानाही जिल्ह्यात मत्स्य व्यवसायातून मागील वर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. जिल्ह्यात १३३ नोंदणीकृत मत्स्यमार सहकारी संस्था आहेत. यापैकी १२६ संस्था कार्यरत आहेत. ९ हजार १५० सभासद (पारंपरिक मत्स्यमार) यापैकी ८ हजारांच्या जवळपास मत्स्यमार क्रियाशील आहेत. जिल्ह्यात या व्यवसायासाठी ६ हजार ९०५ तलाव, बांध आहेत. एकूण जलक्षेत्र २१ हजार ५०९ हेक्टर आहे. यापैकी १६ हजार ३२६ हेक्टरमध्ये मत्स्यपालन केले जात आहे. सिंचन विभागाच्या ६६ तलावांचे जलक्षेत्र ११ हजार हेक्टरच्या जवळपास असून जिल्हा परिषदेच्या एक हजार ८७ तलावांचे जलक्षेत्र चार हजार ६५४ हेक्टर आहे. याशिवाय ८८ खासगी व पाच बचत गटांचे तलाव आहेत. यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस न आल्यामुळे ६२९ लाख मत्स्य जीरे अमरावती व नागपूर जिल्ह्यास विक्री करावे लागले. येथील माशांची बालाघाट, नागपूर व हावडा येथे निर्यात केली जाते. पाचव्या वर्षी कंत्राट मालगुजारी तलावांत मत्स्य पालनासाठी मत्स्यमार सहकारी संस्थेला कंत्राट दिले जातात. त्यासाठी मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त, जिल्हा मत्स्यमार संघाच्या सिफारसीवर सिंचन विभागाचे तलाव जिल्हा परिषदेद्वारे पाच वर्षांसाठी कंत्राटावर दिले जातात. संस्थेकडून दरवर्षी कंत्राटाची रक्कम वसुली करण्यात येते. मत्स्य पालनासाठी देण्यात येणारे अनुदानाचे दरसुद्धा जुने आहेत. त्यामुळे मत्स्य व्यवसाय प्रभावित होत आहे. या संदर्भात राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्ताद्वारे गोडे पाण्याचे मासे पकडण्यासाठी नाव (होडी) अनुदान वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमगाव उपकार्यालय बंदजिल्हा मत्स्य विभागात चार पदे रिक्त होते. यापैकी एक पद भरण्यात आले आहे. सहायक आयुक्ताचे पद रिक्त आहे. आमगाव उपकार्यालयात सहायक मत्स्यविकास अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्यामुळे हे कार्यालय बंद पडून आहे. याशिवाय मत्स्य बीज केंद्र इटियाडोह, मत्स्य बीज केंद्र अंभोरा येथे फील्ड मॅनच्या दोन जागा रिक्त आहेत. मासेमारांसाठी विविध योजना पारंपरिक माासेमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाद्वारे विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नवीन तलावांत विभागाच्या माध्यमातून पाच वर्षे मोफत मत्स्यबीजांचा साठा केला जातो. नाव आदी साहित्यांवर ५० टक्के किंवा ३० हजार रूपयांपर्यंत अनुदान दिले जाते. दारिद्र्यरेषेखाली येणाऱ्या मत्स्यमारांना आवास बांधकामासाठी ४० हजार रूपयांपर्यंत आर्थिक मदत, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास एक लाख रूपये अपघात विमा, अपंगत्वासाठी ५० हजार रूपयांची सहायता यासह अनेक योजना आहेत. नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये मत्स्यमारांशी संपर्कासाठी दोन वाहनांची गरज आहे, पण सध्या एकही वाहन उपलब्ध नाही. सामाजिक दृष्टिकोनातून मागास, दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांना व महिलांना सक्षमीकरणाची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील मत्स्यबीज मार्केटमध्ये उपलब्ध व्हायला हवे. मत्स्य व्यवसाय संस्थेचा कोणताही सभासद मत्स्य उत्पादनासाठी कार्यालयाशी संपर्क करू शकतो.-समीर परवेज,सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, गोंदिया.तलावांमध्ये पाणी राहात नाही. मोटार पंपद्वारे सिंचनासाठी पाणी घेतले जाते. तलावातून उपयुक्त पाणीच सिंचनासाठी घेतले जावू शकते. परंतु डेड वॉटर (मृत साठा) कमी होत आहे. पंचायत समितीमध्ये पैसा भरल्यानंतरही अशी स्थिती आहे. -टंटू मोडकू मेश्रामअध्यक्ष, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, भडंगा.