शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:11 IST

नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.

ठळक मुद्देएक वर्षाच्या आतील ६९३ बालके : बालमृत्यू थांबता थांबेना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.शासन मातामृत्यू व बालमृत्यूची संख्या शुन्यावर आणण्यासाठी विविध योजना अमंलात आणत आहे. परंतु या योजनांच्या अमंलबजावणीत कुचराही होत असल्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील जनता आरोग्यासंदर्भात अत्यंत उदासिन आहे. गर्भवती किंवा बाळंतीन यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यूचा आकड्यात दरवर्षी वाढ होत आहे.मागील दोन वर्षातील बालमृत्यूचा आढावा घेतला असता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ०-१ वर्षातील ३९५ बालके तर १ ते ५ वर्षातील १९ अशा ४१४ बालकांचा मृत्यू झाला आहे. सन २०१८-१९ या वर्षातील बालमृत्यूची आकडेवारी कमी झाली आहे. वर्षात ०-१ वर्षातील २९८ बालके तर १ ते ५ वर्षातील ४३ अश्या ३४१ बालकांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू झाला आहे. उपकेंद्रापासून जिल्हा रूग्णालयापर्यंत रूग्णांच्या सेवेसाठी यंत्रणा जरी असली तरी याच यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. महिला गर्भवती झाल्यापासून तिच्या प्रसूती होऊन पाच वर्षापार्यंत बाळाची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर इतरही यंत्रणा असल्या तरी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. बालमृत्यूची आकडेवारी फुगने ही बाब आरोग्य विभागासाठी मंथन करायला लावणारी आहे.गर्भवतींकडे व नवजात बालकांच्या संगोपणाकडे होणारे दुर्लक्ष हे बालमृत्यूचे आकडे फुगवत आहेत.उमलण्यापूर्वीच १५७ कळ्या कोमेजल्यामहिलांची गर्भावस्थेत कुटुंबातील लोक पाहिजे तशी विशेष काळजी घेत नसल्यामुळे हे जग पाहण्याच्या पूर्वीच १५७ कोवळ्या कळ्या कोमेजल्या आहेत. सन २०१७-१८ या वर्षात १५१ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. तर सन २०१८-१९ या वर्षात १०६ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. अत्यल्प कमी वजनाची जन्माला आलेली बालके कुपोषणामुळे मृत्यूच्या दाढेत जात आहेत. परंतु महिला व बालकल्याण विभाग या मृत्यूला कुपोषणाने मृत्यू झाल्याचे दाखवित नाहीत.गर्भातच वाढतेय कुपोषणगर्भवती महिलांना गर्भावस्थेत संतुलीत आहार देणे आवश्यक असतांना महिलांच्या दररोजच्या जेवणातून वरण हद्दपार झाला असतो. कडी, आळण किंवा वांग्याची भाजी यावरच त्यांचे दररोजचे जेवण असल्यामुळे बाळाला पोषण मिळत नाही. त्यातच गर्भावस्थेतही ग्रामीण भागात राहणारी महिला खूप कष्ट करते आणि पोटाला संतुलीत आहारही मिळत नाही. त्यामुळे पोटातच तिच्या बाळाची वाढ होत नाही. वाढ झाली तरी ती अत्यल्प प्रमाणात असते.असंतुलीत आहारामुळे कमी वजनाची बालके जन्माला येतात. त्यामुळे कमी वजनाच्या बालकांचा पोटातच किंवा जन्म घेतांना मृत्यू होतो. असंतुलीत आहारामुळे गर्भाची वाढ होत नाही त्यात व्यंगता येते परिणामी अर्भक मृत्यूदर वाढतो.