शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:11 IST

नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.

ठळक मुद्देएक वर्षाच्या आतील ६९३ बालके : बालमृत्यू थांबता थांबेना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.शासन मातामृत्यू व बालमृत्यूची संख्या शुन्यावर आणण्यासाठी विविध योजना अमंलात आणत आहे. परंतु या योजनांच्या अमंलबजावणीत कुचराही होत असल्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील जनता आरोग्यासंदर्भात अत्यंत उदासिन आहे. गर्भवती किंवा बाळंतीन यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यूचा आकड्यात दरवर्षी वाढ होत आहे.मागील दोन वर्षातील बालमृत्यूचा आढावा घेतला असता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ०-१ वर्षातील ३९५ बालके तर १ ते ५ वर्षातील १९ अशा ४१४ बालकांचा मृत्यू झाला आहे. सन २०१८-१९ या वर्षातील बालमृत्यूची आकडेवारी कमी झाली आहे. वर्षात ०-१ वर्षातील २९८ बालके तर १ ते ५ वर्षातील ४३ अश्या ३४१ बालकांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू झाला आहे. उपकेंद्रापासून जिल्हा रूग्णालयापर्यंत रूग्णांच्या सेवेसाठी यंत्रणा जरी असली तरी याच यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. महिला गर्भवती झाल्यापासून तिच्या प्रसूती होऊन पाच वर्षापार्यंत बाळाची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर इतरही यंत्रणा असल्या तरी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. बालमृत्यूची आकडेवारी फुगने ही बाब आरोग्य विभागासाठी मंथन करायला लावणारी आहे.गर्भवतींकडे व नवजात बालकांच्या संगोपणाकडे होणारे दुर्लक्ष हे बालमृत्यूचे आकडे फुगवत आहेत.उमलण्यापूर्वीच १५७ कळ्या कोमेजल्यामहिलांची गर्भावस्थेत कुटुंबातील लोक पाहिजे तशी विशेष काळजी घेत नसल्यामुळे हे जग पाहण्याच्या पूर्वीच १५७ कोवळ्या कळ्या कोमेजल्या आहेत. सन २०१७-१८ या वर्षात १५१ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. तर सन २०१८-१९ या वर्षात १०६ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. अत्यल्प कमी वजनाची जन्माला आलेली बालके कुपोषणामुळे मृत्यूच्या दाढेत जात आहेत. परंतु महिला व बालकल्याण विभाग या मृत्यूला कुपोषणाने मृत्यू झाल्याचे दाखवित नाहीत.गर्भातच वाढतेय कुपोषणगर्भवती महिलांना गर्भावस्थेत संतुलीत आहार देणे आवश्यक असतांना महिलांच्या दररोजच्या जेवणातून वरण हद्दपार झाला असतो. कडी, आळण किंवा वांग्याची भाजी यावरच त्यांचे दररोजचे जेवण असल्यामुळे बाळाला पोषण मिळत नाही. त्यातच गर्भावस्थेतही ग्रामीण भागात राहणारी महिला खूप कष्ट करते आणि पोटाला संतुलीत आहारही मिळत नाही. त्यामुळे पोटातच तिच्या बाळाची वाढ होत नाही. वाढ झाली तरी ती अत्यल्प प्रमाणात असते.असंतुलीत आहारामुळे कमी वजनाची बालके जन्माला येतात. त्यामुळे कमी वजनाच्या बालकांचा पोटातच किंवा जन्म घेतांना मृत्यू होतो. असंतुलीत आहारामुळे गर्भाची वाढ होत नाही त्यात व्यंगता येते परिणामी अर्भक मृत्यूदर वाढतो.