शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

७ हजार कुटुंबावर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:10 IST

तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.

ठळक मुद्देतलाव पडले कोरडे : मासेमारी व्यवसाय डबघाईस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.त्यामुळे कोट्यवधीे रुपयांचा व्यवसाय संकटात आला असून यावर अवलंबून असणाऱ्या ७ हजारावर कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.जिल्ह्यात माजी मालगुजारी (मामा) तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तलावांचा उपयोग मासेमारी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. जिल्ह्यात जि.प.च्या मालकीचे एकूण ६ हजार ८३९ लघु तलाव आहेत. तर २०० हेक्टर क्षेत्राचे १० आणि २०० हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे ५६ तलाव आहेत. १३३ नोदंणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. जि.प.व सिंचन विभागातर्फे तलावांचा लिलाव करुन अथवा लिजवर तलाव मत्स्यपालन संस्थेला दिले जाते. यामुळे शासनाला सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. तर तलावांची संख्या अधिक असल्याने या दोन्ही गोष्टी मत्स्यपालनासाठी अनुकुल आहेत.या व्यवसायामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो.मात्र मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ९५० मि.मी.पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा तापमानात सुध्दा प्रचंड वाढ झाली असल्याने पाण्याचे लवकर बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून तलाव कोरडे पडत आहे. तलावातील पाणी कमी आणि वाढत्या उष्णतामानामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थांना सुध्दा आर्थिक फटका बसला असून यावर आधारीत कुटुंंब देखील संकटात आल्याचे चित्र आहे.तलावांच्या खोलीकरणाचा अभावशासनाने जलयुक्त शिवारच्या धर्तीवर गाळमुक्त तलाव योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील शेकडो तलावातील गाळाची समस्या कायम आहे. परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत सुध्दा घट होत आहे. तलावांचे खोलीकरण झाले असते तर तलावात काही प्रमाणात पाणी साचून राहिले असते त्याची मत्स्यपालन संस्था आणि शेतकऱ्यांना सुध्दा मदत झाली असती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.तलावांवर वाढले अतिक्रमणजि.प.आणि सिंचन विभागाच्या मालकीचे जिल्ह्यात सहा हजारावर तलाव आहेत. मात्र यांच्या देखभाल दुरूस्तीकडे या दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे तलाव लगतच्या शेतकºयांनी तलावावर अतिक्रमण करुन तलावाचे क्षेत्र कमी केले आहे. परिणामी तलावाचे सिंचन क्षेत्र कमी होत असून याचा पाहिेजे तसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे.भूजल पातळीवर परिणामतलावातील गाळाचा उपसा न केल्याने सिंचन क्षमतेत घट होत आहे.तर उन्हाळ्याच्या दिवसात लवकरच तलाव कोरडे पडत असल्याने त्याचा भूजल पातळीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfishermanमच्छीमार