शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार कुटुंबावर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:10 IST

तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.

ठळक मुद्देतलाव पडले कोरडे : मासेमारी व्यवसाय डबघाईस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.त्यामुळे कोट्यवधीे रुपयांचा व्यवसाय संकटात आला असून यावर अवलंबून असणाऱ्या ७ हजारावर कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.जिल्ह्यात माजी मालगुजारी (मामा) तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तलावांचा उपयोग मासेमारी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. जिल्ह्यात जि.प.च्या मालकीचे एकूण ६ हजार ८३९ लघु तलाव आहेत. तर २०० हेक्टर क्षेत्राचे १० आणि २०० हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे ५६ तलाव आहेत. १३३ नोदंणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. जि.प.व सिंचन विभागातर्फे तलावांचा लिलाव करुन अथवा लिजवर तलाव मत्स्यपालन संस्थेला दिले जाते. यामुळे शासनाला सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. तर तलावांची संख्या अधिक असल्याने या दोन्ही गोष्टी मत्स्यपालनासाठी अनुकुल आहेत.या व्यवसायामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो.मात्र मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ९५० मि.मी.पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा तापमानात सुध्दा प्रचंड वाढ झाली असल्याने पाण्याचे लवकर बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून तलाव कोरडे पडत आहे. तलावातील पाणी कमी आणि वाढत्या उष्णतामानामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थांना सुध्दा आर्थिक फटका बसला असून यावर आधारीत कुटुंंब देखील संकटात आल्याचे चित्र आहे.तलावांच्या खोलीकरणाचा अभावशासनाने जलयुक्त शिवारच्या धर्तीवर गाळमुक्त तलाव योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील शेकडो तलावातील गाळाची समस्या कायम आहे. परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत सुध्दा घट होत आहे. तलावांचे खोलीकरण झाले असते तर तलावात काही प्रमाणात पाणी साचून राहिले असते त्याची मत्स्यपालन संस्था आणि शेतकऱ्यांना सुध्दा मदत झाली असती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.तलावांवर वाढले अतिक्रमणजि.प.आणि सिंचन विभागाच्या मालकीचे जिल्ह्यात सहा हजारावर तलाव आहेत. मात्र यांच्या देखभाल दुरूस्तीकडे या दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे तलाव लगतच्या शेतकºयांनी तलावावर अतिक्रमण करुन तलावाचे क्षेत्र कमी केले आहे. परिणामी तलावाचे सिंचन क्षेत्र कमी होत असून याचा पाहिेजे तसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे.भूजल पातळीवर परिणामतलावातील गाळाचा उपसा न केल्याने सिंचन क्षमतेत घट होत आहे.तर उन्हाळ्याच्या दिवसात लवकरच तलाव कोरडे पडत असल्याने त्याचा भूजल पातळीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfishermanमच्छीमार