शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

७ हजार कुटुंबावर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:10 IST

तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.

ठळक मुद्देतलाव पडले कोरडे : मासेमारी व्यवसाय डबघाईस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यावर जवळपास ७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वाढत्या तापमानामुळे तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहे.त्यामुळे कोट्यवधीे रुपयांचा व्यवसाय संकटात आला असून यावर अवलंबून असणाऱ्या ७ हजारावर कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.जिल्ह्यात माजी मालगुजारी (मामा) तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तलावांचा उपयोग मासेमारी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो. जिल्ह्यात जि.प.च्या मालकीचे एकूण ६ हजार ८३९ लघु तलाव आहेत. तर २०० हेक्टर क्षेत्राचे १० आणि २०० हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे ५६ तलाव आहेत. १३३ नोदंणीकृत मत्स्यपालन संस्था आहेत. जि.प.व सिंचन विभागातर्फे तलावांचा लिलाव करुन अथवा लिजवर तलाव मत्स्यपालन संस्थेला दिले जाते. यामुळे शासनाला सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. तर तलावांची संख्या अधिक असल्याने या दोन्ही गोष्टी मत्स्यपालनासाठी अनुकुल आहेत.या व्यवसायामुळे हजारो कुटुंबाना रोजगार मिळतो.मात्र मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ९५० मि.मी.पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा तापमानात सुध्दा प्रचंड वाढ झाली असल्याने पाण्याचे लवकर बाष्पीभवन होत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून तलाव कोरडे पडत आहे. तलावातील पाणी कमी आणि वाढत्या उष्णतामानामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थांना सुध्दा आर्थिक फटका बसला असून यावर आधारीत कुटुंंब देखील संकटात आल्याचे चित्र आहे.तलावांच्या खोलीकरणाचा अभावशासनाने जलयुक्त शिवारच्या धर्तीवर गाळमुक्त तलाव योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील शेकडो तलावातील गाळाची समस्या कायम आहे. परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत सुध्दा घट होत आहे. तलावांचे खोलीकरण झाले असते तर तलावात काही प्रमाणात पाणी साचून राहिले असते त्याची मत्स्यपालन संस्था आणि शेतकऱ्यांना सुध्दा मदत झाली असती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.तलावांवर वाढले अतिक्रमणजि.प.आणि सिंचन विभागाच्या मालकीचे जिल्ह्यात सहा हजारावर तलाव आहेत. मात्र यांच्या देखभाल दुरूस्तीकडे या दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे तलाव लगतच्या शेतकºयांनी तलावावर अतिक्रमण करुन तलावाचे क्षेत्र कमी केले आहे. परिणामी तलावाचे सिंचन क्षेत्र कमी होत असून याचा पाहिेजे तसा लाभ होत नसल्याचे चित्र आहे.भूजल पातळीवर परिणामतलावातील गाळाचा उपसा न केल्याने सिंचन क्षमतेत घट होत आहे.तर उन्हाळ्याच्या दिवसात लवकरच तलाव कोरडे पडत असल्याने त्याचा भूजल पातळीवर सुध्दा परिणाम होत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfishermanमच्छीमार