शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

७० जोडपे अनुदानापासून वंचित

By admin | Updated: April 20, 2015 01:01 IST

पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले.

गोंदिया : पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले. या विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना १० हजार तर विवाह घडवून आणणाऱ्या संस्थांना प्रत्येक जोडप्यावर दोन हजार रूपये दिले जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ७० जोडप्यांना अजूनपर्यंत अनुदान देण्यात आले नाही. परिणामी शुभमंगल योजना अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सन २०१३-१४ या वर्षात शुभमंगल योजनेंतर्गत जिल्हयातील सहा संस्थांकडून करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यातील ८६ जोडप्यांना १० लाख ३२ हजार रूपये अनुदान देण्यात आले. परंतु ७० जोडप्यांना अजूनही कवडीची मदत देण्यात आली नाही. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेली जोडपी या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. लग्न लावून देणाऱ्या संस्था फक्त आपले अनुदान वाढविण्यासाठी वर-वधूंची संख्या वाढवितात. परंतु ते जोडपे निकष पुर्ण करीत नसल्याने अनुदानापासून वंचित राहतात. एकाच वर्षातील एवढे जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. मागील तीन वर्षाची संख्या पाहता शेकडोंच्या संख्येत जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांंना अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात केले जात आहे. मागील तीन ते चार वर्षाच्या तुलनेत हा प्रकार गोंदिया तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेले जोडपे कागदपत्रांचीपुर्तता योग्यरित्या करीत नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आले नाही. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांना शुभमंगल कन्यादान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे या योजनेकडे नागरिक पाठ फिरवीत आहेत. तर आता लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यांकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)संघटनांमध्ये स्पर्धाआयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांची संख्या अधिक असावी यासाठी सामूहिक विवाह सोहळा घडवून आणणाऱ्या संस्था प्रयत्न करतात. अनेक संस्था लोकप्रतिनिधींच्या हाताशी काम करणाऱ्या लोकांच्या असल्यामुळे किंवा नेत्यांच्याच असल्यामुळे आपल्या संस्थेकडून अधिक जोडप्यांचा विवाह करण्यासाठी चढाओढ लागली आहे. सर्वाधिक जोडप्यांचे लग्न आपण घडवून आणले असा वेगळा बाणा दाखविण्याचा शौक काही संघटनांना आहे. त्यामुळे ते सामूहिक विवाह सोहळ््यात लग्न करण्यास आलेल्या जोडप्यांची शहानिशा न करता त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात उरकून टाकतात.