शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

६६ निराश्रीतांना ‘रमाई’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2016 12:43 AM

शहरातील ६६ निराश्रितांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी ‘रमाई’ योजना आधार देणारी ठरली आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून

९४ लाखांचा निधी : घरकुलांचे तीन हप्ते अडलेगोंदिया : शहरातील ६६ निराश्रितांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी ‘रमाई’ योजना आधार देणारी ठरली आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील या निराश्रीतांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी ९४ लाख ३५ हजार रूपयांचा निधी देण्यात आला असून या घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. आपले स्वत:चे हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जीवनात काही असो-नसो मात्र डोक्यावर स्वत:चे छत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:चे घर आहे तो आज नशिबवान समजला जातो. कारण आजच्या महागाईला बघता स्वत:चे घर बांधणे सर्वाच्याच आवाक्यात राहिलेले नाही. त्यातही हातावर कमावून खाणाऱ्यांचे तर सोडूनच द्यावे. अशा निराश्रीत गरजूंसाठी शासनाने ‘रमाई आवास योजना’ सुरू केली आहे. ही योजना अशा निराश्रीतांसाठी त्यांना हक्काचे घरकूल मिळवून देणारी ठरत आहे. अनुसूचित जातीतील दरिद्रय रेषेखालील(बीपीएल) व दारिद्रय रेषेवरील (एपीएल) दोन्ही घटकांसाठी ही योजना शासन राबवित आहे. यात बीपीएलसाठी १.५० लाखांचे तर एपीएलसाठी १.३५ लाखांचे अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत शहरातील ६६ निराश्रीतांना सन २०१५-१६ या वर्षात घरकूल मंजूर करण्यात आले आहे. यात ३५ लाभार्थी बीपीएल असून ३१ लाभार्थी एपीएलचे आहेत. यासाठी शासनाकडून ५२.५० लाख रूपये बीपीएलसाठी तर ४१.८५ हजार रूपये एपीएलसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)