शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

६० टक्के युवकांना दारुची लत, तर ८० टक्के गुटख्याच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला युवक म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, शरीरात ताकद आहे, मनात उत्साह आहे आणि जो व्यसनापासून मुक्त आहे, तसेच ज्याच्या जीवनात अनुशासन आहे तो युवक आदर्श होण्याच्या वाटेवर असू शकतो; परंतु आज घडीला युवकांमध्ये या गोष्टी मुळीच अभावानेच पाहायला मिळतात. त्यामुळे आदर्श युवक घडविण्यासाठी त्या दिशेने युवकांना संस्कारक्षम बनवण्याची गरज आहे.

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा :  दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. या देशातील युवा स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला आदर्श युवक झाला पाहिजे. हा कदाचित या मागील हेतू असावा; परंतु विद्यमान परिस्थितीत आदर्श युवक कोणाला म्हणावे हा प्रश्न सर्वसामान्य विचारवंत लोकांना पडत आहे. कारण आजचा युवक दिशाहीन झाला आहे. ६० टक्के युवकांना दारूची लत लागली आहे, तर ८० टक्के युवक तंबाखू आणि गुटख्याच्या आहारी गेल्याची बाब पुढे आली आहे.स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला युवक म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, शरीरात ताकद आहे, मनात उत्साह आहे आणि जो व्यसनापासून मुक्त आहे, तसेच ज्याच्या जीवनात अनुशासन आहे तो युवक आदर्श होण्याच्या वाटेवर असू शकतो; परंतु आज घडीला युवकांमध्ये या गोष्टी मुळीच अभावानेच पाहायला मिळतात. त्यामुळे आदर्श युवक घडविण्यासाठी त्या दिशेने युवकांना संस्कारक्षम बनवण्याची गरज आहे. जीवनात नीती आणि चारित्र्यात शुद्धता असलेला युवक आदर्श युवक ठरू शकतो; परंतु या सर्व गोष्टी अलीकडच्या युवकांत अभावानेच दिसून येतात. जे युवक आदर्श पावलावर  चालण्याच्या प्रयत्न करीत आहेत त्यांना आज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. देशात ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. अर्थात या देशात युवा वर्ग जगाच्या तुलनेत खूप जास्त आहे; परंतु या  युवकाच्या अंगी असलेली ऊर्जा  योग्य प्रकारे उपयोगात येत नाही. त्यामुळे आपला देश आजही आत्मनिर्भर होऊ शकला नाही. 

युवकांवर गुटखा ठरतोय भारी - सालेकसा तालुक्याच्या विचार केल्यास ५० ते ६० टक्के विद्यार्थीच दहाव्या वर्गाच्या पुढे शिक्षण घ्यायला जातात. इतर विद्यार्थी शिक्षण सोडून कामधंद्याला लागून  व्यसनाधीन होत आहेत. कॉलेजमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थीसुद्धा दारूच्या आहारी गेले आहे. माध्यमिक  शिक्षणापासूनच अनेक विद्यार्थी गुटखा आणि तंबाखूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. 

अनुशासनाचा अभाव- युवा अवस्थेत चेहऱ्यावरील तेज गायब झालेले आणि शरीराची शक्ती हीन झालेली असते. हृदयात करुणा संपलेली असून, नेहमी चिडचिडेपणा, अनुशासनचा अभाव, वरिष्ठांचा अनादर, चारित्र्यहीनता या गोष्टींचे प्रमाण दिवसेंदिवस युवकांमध्ये वाढत आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीTobacco Banतंबाखू बंदी