शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
4
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
5
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
6
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
7
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
8
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
9
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
10
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
11
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
12
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
13
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
14
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
15
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
16
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
17
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
18
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
19
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
20
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...

देशात ६० टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजाराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 21:53 IST

असंसर्गजन्य आजारांत मुख्यत्वे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे आजार, लखवा, कर्करोग सारख्या आजारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या आजारांत कोणत्याही प्रकारचे तीव्र लक्षण दिसत नाही व त्यामुळे आजार जास्त बाळावल्यावर लोकांच्या लक्षात येतो.

ठळक मुद्देहिम्मत मेश्राम : असंसर्गजन्य रोग तपासणी, निदान, उपचार व मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : असंसर्गजन्य आजारांत मुख्यत्वे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे आजार, लखवा, कर्करोग सारख्या आजारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या आजारांत कोणत्याही प्रकारचे तीव्र लक्षण दिसत नाही व त्यामुळे आजार जास्त बाळावल्यावर लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे कित्येक रु ग्णांना मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्वाला सामोरे जावे लागते. यासाठी सर्व जनतेने सहा महिन्यांतून एकदा रक्तदाब व रक्तशर्करेची तपासणी करावी. कारण, देशात ६० टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजाराने होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिम्मत मेश्राम यांनी सांगीतले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र म व असंसर्गरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि.३) केटीएस रुग्णालयात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजीत असंसर्गरोग तपासणी, निदान, उपचार व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोहन घुगे होते. याप्रसंगी डॉ. रवी लावनकर, डॉ. दीपक बाहेकर, डॉ. मोहबे, डॉ. शैलेश कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचे कोणतेही पूर्वलक्षण नसताना हृदयाच्या झटक्याने (असंसर्गजन्य रोगाने ) अचानक दु:खद निधन झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. लावनकर यांनी, अचानक एखाद्या व्यक्तीस हृदयाचा झटका आल्यास किंवा हाताची नाडी व हृदयाचे ठोके न लागल्यास दोन्ही हाताने हृदयावर मिनिटाला कमीत कमी १०० वेळा दाब देऊन व तोंडाने प्राणवायू देऊन वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत रु ग्णास जिवंत ठेऊ शकतो असे सांगीतले. तसेच प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ. बाहेकर यांनी, उच्चरक्तदाब किंवा मधुमेह कुणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. यापासून बचाव करायचा असल्यास दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम, फळांचे जास्त सेवन, तेलकट-तळलेले पदार्थ, मीठ, मांस कमी खाणे, व्यसन व मानसिक तणावापासून दूर राहिल्यास असंसर्गजन्य रोगापासून दूर राहू शकतो असे सांगीतले. डॉ. मोहबे यांनी, असंसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी व ते होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. डॉ. कुकडे यांनी, तंबाखूचे सेवन केल्याने हृदयाची वारंवार गत वाढून पुढे हृदयाचे आजार व कर्करोग सुद्धा होतो असे सांगीतले. शिबिरासाठी डॉ. मनोज राऊत, डॉ. अनिल आटे, डॉ. शुक्ला, संजय बिसेन, आर. बी. एस. के. चे डॉक्टर , नर्स, फार्मासिस्ट, एन. यु. एच. एम. चे डॉक्टर आणि नर्स, मेंटल हेल्थ टीम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण टीम. एस. डी. एच. तिरोडा येथील टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टीमने सहकार्य केले.९१ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीसदर तपासणी शिबिरात एकूण ९१ कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ७० पुरु ष व २१ स्त्री कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी १० कर्मचाऱ्यांची रक्तशर्करा व २० कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढलेला आढळला. तसेच ५९ ईसीजी तपासणी पैकी तीन कर्मचाऱ्यांच्या ईसीजी मध्ये बदल आढळून आला.

टॅग्स :Healthआरोग्य