शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५.७२ लाख खाते संगणीकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:37 IST

वडिलांच्या संपत्तीमध्ये मुला-मुलींचा समान वाटा आहे. या ग्रामसभेच्या माध्यमातून वारसान फेरफार, संपत्तीक

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रथम महसुली ग्रामसभा उत्साहातगोंदिया : वडिलांच्या संपत्तीमध्ये मुला-मुलींचा समान वाटा आहे. या ग्रामसभेच्या माध्यमातून वारसान फेरफार, संपत्तीक हिस्सेवाटणी, वर्ग २ ची जमीन वर्ग १ करणे, लक्ष्मी मुक्ती योजना यावर निर्णय घेण्यात येतील. सर्वांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. संपत्तीमध्ये मुलीचे नाव नोंद झाल्यामुळे संपत्तीचे संरक्षण होईल. जिल्ह्यातील पाच लाख ८० हजार खातेदारांपैकी पाच लाख ७२ हजार खाते संगणीकृत झाल्यामुळे महाराष्ट्रात सातबारा संगणीकृत झाल्यामुळे गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महसुली ग्रामसभा आयोजित करण्याचा वेळापत्रक जिल्हाधिकारी यांनी जाही केला. त्यानुसार मुरदोली ग्रामपंचायतची प्रथम महसुली सभा घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सभेत मार्गदर्शक म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, नायब तहसीलदार एम.एन. वेदी, सरपंच शसेंद्र भगत, पं.स. सदस्य अलका काटेवार, पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, १ मेनंतर सर्व कास्तकारांना संगणीकृत सातबारा देण्यात येईल. यानंतर शेतजमिनीमध्ये असलेल्या प्रौढ झाडांचे संरक्षण करण्याकरिता शेतकऱ्यांना निधी देण्याचा विचार सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील मालगुजारी तलावांच्या संरक्षणाकरिता शासनस्तरावर त्यांची मोजणी करून त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. तलावातील गाळ काढल्यानंतर पुन्हा गाळ साचणार नाही, याचेही नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले, प्रत्येक मनुष्याला आपले जीवन सुखकर व्हावे, असे वाटते. त्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांनी स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या बाबींकडे अग्रक्रमाने लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगितले. याप्रसंगी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. गावकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. महसुली प्रास्ताविक तहसीलदार कल्याणकुमार डहाट व ग्रामसभेचे प्रास्ताविक सरपंच शसेंद्र भगत यांनी मांडले. संचालन पोलीस पाटील दिलीप मेश्राम यांनी केले. आभार किशोर मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसेवक आर.एन. बहेकार, रोशन कटरे, हरिचंद धुर्वे, मदनलाल भेंडारकर, हरिचंद पटले, के.एम. पटले आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)