शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

जिल्ह्यात आढळली स्थलांतरित ५५ बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 06:00 IST

सर्व शिक्षा अभियानातून संपादणूक पातळी गाठण्याकरिता विशेष शैक्षणिक सहाय्य देण्याकरिता विशेष प्रशिक्षण देण्याची जवाबदारी शिक्षण हक्क कायद्याने शिक्षण विभागावर बंधनकारक आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांना बालरक्षक म्हणून कार्य करण्याची संधी दिली आहे.

ठळक मुद्देपोलीस विभागाने राबविली शोधमोहिम : ३१ कुटुंबातील ‘ती’ सर्व बालके येणार मुख्यप्रवाहात

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ६ ते १४ वर्ष वयोटातील सर्व बालके शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने आरटीई अंतर्गत कडक कायद्याची अमंबजावणी केली. संसाराचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन जाणाऱ्या कुटुंबातील बालके हे मुख्यत: शिक्षणापासून दूर राहतात. त्या बालकांनाही शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण हमी कायदा अमंलात आणण्यात आला. गोंदिया जिल्हा पोलिसांनी आपापल्या क्षेत्रातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेतले असता ३१ कुटुंबातील ५५ बालके स्थलांतरीत होऊन आले असल्याची माहिती पुढे आली आहे.भीक मागून पोट भरणाºया व बालमजुरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करावे, कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राज्यभर शिक्षण विभागाने राबविली.सर्व शिक्षा अभियानातून संपादणूक पातळी गाठण्याकरिता विशेष शैक्षणिक सहाय्य देण्याकरिता विशेष प्रशिक्षण देण्याची जवाबदारी शिक्षण हक्क कायद्याने शिक्षण विभागावर बंधनकारक आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांना बालरक्षक म्हणून कार्य करण्याची संधी दिली आहे. या मुलांना वाचन-लेखन व गणितातील मुलभूत क्रिया अवगत होण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने विकसित केलेल्या शैक्षणिक कृती आराखड्यातच उपयोग करण्यात यावा,यासाठी शिक्षकांनी त्यानुसार स्वत:ला अधिक समृद्ध करावे, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.राज्यात बालरक्षक चळवळ जोमाने कार्यान्वित असून राज्यातील सर्वच शिक्षकांनी बालरक्षकाच्या भूमिकेतून संवेदनशिलतेने काम केल्यास राज्यात एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या समन्वयीका कुलदीपीका बोरकर यांनी काही दिवसापूर्वी पोलीस विभागाला पत्र देऊन आपल्यापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती स्तलांतरीत बालके आली आहेत, याची चौकशी करून माहिती देण्याचे पत्र दिल्याने त्या पत्राच्या आधारावर पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यात इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून आलेली ३१ कुटुंबातील ५५ बालके असल्याची माहिती दिली आहे.२६ बालकांनी शाळाच पाहिली नाहीगोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी शोधून काढलेल्या स्थलांतरीत कुटुंबातील ५५ बालकांची संपूर्ण चौकशी केली असता २६ बालके कधीच शाळेत गेली नाहीत. ६ ते १५ वर्षादरम्यानची ती बालके असून ती बालके अद्याप शाळेत गेलीच नाहीत. २९ बालके शाळेत गेली परंतु ते शाळेत सतत गैरहजर आहेत. अश्या एकूण ५५ बालकांची फेर चौकशी शिक्षण विभाग करून त्यांना नियमीत शाळेत दाखल करणे, त्यांना शिक्षण हमी कार्ड देण्याचे काम शिक्षण विभाग करेल.चार तालुक्यातच आढळली बालकेयवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, छत्तीसगडच्या जांजगीर, बिलासपूर, मध्यप्रदेशच्या सिक्कर, भोपाळ, सिवोल येथील ती बालके आपल्या पाल्यांसोबत काम करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात आली आहेत. जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा या चार तालुक्यात पालकांसोबत वास्तव्यास आहेत अशी माहिती पोलीस विभागाने शिक्षण विभागाला सादर केली आहे.त्यांना मिळणार शिक्षण हमी कार्डआयुक्त शिक्षण तथा संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणीक प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांनी स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येणाºया समस्यांचे निराकरण करून त्यांना शिक्षण हमी कार्ड देऊन आश्वासक भूमिका पार पाडण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून काही कामानिमित्त अस्थायी कुटूंब येत असतात. अशा कुटूंबासोबत ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य बालके (मुले/मुली) यांना आरटीई अ‍ॅक्टप्रमाणे त्यांना नियमित शाळेत दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र