शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

बापरे! तब्बल ५ कोटी ७२ लाखांचा धान घोटाळा; संचालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By अंकुश गुंडावार | Updated: August 10, 2023 17:59 IST

तक्रारीच्या १४ दिवसांनंतर कारवाई

गोंदिया : तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने शासकीय धान खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी हंगामात खरेदी केलेल्या एकूण २८ हजार ५९ क्विंटल धानाची अफरातफर करून ५ काेटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांचा घोळ करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी बुधवारी (दि.९) रात्री या संस्थेच्या ११ संचालकांसह ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे 'लोकमत'ने सर्वप्रथम हा घोळ उघडकीस आणला होता. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ हमीभावाने सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करतात. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करणाऱ्या संस्थांना फेडरेशन प्रति क्विंटल कमिशन देत असते. या संस्थांनी केंद्रावर खरेदी केलेला धान राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने गेल्या खरीप हंगामात खरेदी केलेला १२ हजार ६३ किलो व रब्बी हंगामातील १५ हजार ९९६ क्विंटल असा एकूण २८ हजार ५९ क्विंटल १३ किलो धान एकूण किमत ५ कोटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांचा धान फेडरेशनकडे जमा केला नाही. शिवाय खरेदी केलेला धान या संस्थेच्या गोदामातसुद्धा शिल्लक नव्हता. त्यामुळे या संस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी ५ कोटी ७२ लाख ४० हजार ६२५ रुपयांच्या धानाची अफरातफर करून शासनाची फसवणूक केली. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या संचालक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या संचालकांमध्ये मोहन केलराम राणे, लक्ष्मीचंद ताराचंद रहांगडाले, सेवक मोतीराम शेंडे, चिमातन दसाराम तुरकर, छोटेलाल फुलीचंद गौतम, केदारनाथ लोकचंद देशमुख, माधेराव लोकचंद देशमुख, भागचंद आसाराम राणे, उमा प्रल्हाद राणे, अनुबाई राधेलाल वट्टी, गिगमदास फुलीचंद गौतम आदी ११ संचालक व संगणक ऑपरेटर मनीष ओमकार वैष्णव, ग्रेडर दिनेश हेमराज चव्हाण, केंद्र प्रमुख व ग्रेडर खुमेश भुमेश्वर राणे व शिशुपाल भूमेश पटले सर्व रा.चुटीया यांचा समावेश असून यांच्यावर भादंविच्या कलम ४०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करीत आहेत.

घोळ खरिपातही पण तक्रारीस विलंब

तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप हंगामात खरेदी केलेला तब्बल १२ हजार क्विंटल धान सहा महिने लोटूनही जमा केला नाही. यानंतरही या संस्थेला रब्बी हंगामात धान खरेदीची परवानगी देण्यात आली. त्यानंतर या संस्थेने पुन्हा रब्बी हंगामातील १५ हजार ९९६ क्विंटल धान जमा केला नाही. पण यानंतरही या संस्थेवर कारवाई करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे या प्रकरणात एवढी दिरंगाई का हे कळण्यास मार्ग नाही.

चूक संस्थेची, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना

चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या संस्थेने धान जमा न केल्याने फेडरेशनने धानाचे चुकारे थांबविले आहे. त्यामुळे हक्काचे धान विक्री करून शेतकऱ्यांना उधारउसनवारी करून गरज भागविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चूक संस्थेची, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना अशी स्थिती आहे.

पाच संस्थांनी अडविला २० हजार क्विंटल धान

चुटीया येथील संस्थेप्रमाणेच गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील पाच संस्थांनी अद्यापही २० हजार क्विंटल धान जमा केलेला नाही. या संस्थांनासुध्दा अंतिम नोटीस देण्यात आली आहे. येत्या आठ-दहा दिवसांनंतर या संस्थांवरसुध्दा कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया