शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

४५० बचत गटांना ४५ लाखांचा फिरता निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:50 IST

राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया व तिरोडा येथील शहरी भागात बचत गट निर्मिती व बळकटीकरणाचे कार्य केले जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया शहरी भागात ४८६ व तिरोडा शहरी भागात ७० असे एकंदरीत ५५६ शहर स्तरीय स्वयं सहाय समूहाची निर्मिती करण्यात आली. यात ६२४९ महिला सहभागी झाल्या आहेत. यापैकी ४५० बचत गटांना ४५ लाख रूपयाचा फिरता निधी वाटप करण्यात आला.

ठळक मुद्दे६२४९ महिलांचा सहभाग : शहरातील महिलांच्या बळकटीकरणासाठी दीनदयाल अंत्योदय योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया व तिरोडा येथील शहरी भागात बचत गट निर्मिती व बळकटीकरणाचे कार्य केले जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत गोंदिया शहरी भागात ४८६ व तिरोडा शहरी भागात ७० असे एकंदरीत ५५६ शहर स्तरीय स्वयं सहाय समूहाची निर्मिती करण्यात आली. यात ६२४९ महिला सहभागी झाल्या आहेत. यापैकी ४५० बचत गटांना ४५ लाख रूपयाचा फिरता निधी वाटप करण्यात आला.बचत गट बळकटीकरण व महिला सक्षमीकरणाकरिता तीन स्तरीय रचनेचा अवलंब करण्यात आला आहे. यामध्ये स्वयं सहायता बचत गट ङ्क्त वसती स्तरीय संघ, शहर स्तरीय संघ याप्रमाणे बांधणी करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक स्वयं सहाय बचत गटातील दोन प्रतिनिधी या प्रमाणे १५ ते २० गटांचा वस्ती स्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे. नगर परिषद गोंदिया व तिरोडा अंतर्गत ४४ वस्तीस्तर संघ कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तीस्तरीय संघातून दोन प्रतिनिधी घेऊन शहर स्तरीय संघाची स्थापना करण्यात आली आहे. असे एकुण ३ शहर स्तरीय संघाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरण व उपजीविका वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.या अभियानांतर्गत ४५० बचत गटांना प्रती गट १० हजार रु पये प्रमाणे एकुण ४५ लाखाचा फिरता निधी वाटप करण्यात आला आहे. नोंदणीकृत वसतीस्तरीय संघाला प्रति संघ ५० हजार याप्रमाणे ७ वसती स्तरीय संघांना ३ लाख ५० हजार वाटप करण्यात आलेले आहे. या निधीमधून गरजू बचत गटांना अडचणीच्या वेळेस तत्काळ कर्ज वाटप करण्यात येते.सध्या स्थितीत आयसीआयसीआय बँक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ईतर राष्ट्रीयकृत बँकाच्या माध्यमातून महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून बचत गट सभासद यांनी विविध प्रकारचे लघु गृह उद्योग व इतर व्यवसाय सुरू करून यांना रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध झालेले आहे. वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात राष्ट्रीय नागरी उपजीविका विकास अभियान अंतर्गत लोक संचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून ४२२ महिला बचत गटांना बँकेचे ५ कोटी १६ लाख रु पये कर्ज उपलब्ध करून दिल आहे. महिला बचत गटांद्वारे कर्जाची नियमति परतफेड केली जात आहे.