शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
3
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
4
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
5
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
6
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
7
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
9
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
10
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
11
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
12
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
13
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
14
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
15
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
16
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
18
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
19
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
20
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

७५ हजार विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:27 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थी गणवेशापासून वंचित : एकच गणवेशाचे दिले पैसे

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले. परंतु ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचा दुसरा जोड देण्यासाठी आतापर्यंत शासनाने पैसे दिलेच नसल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाºया व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन जोड गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते. परंतु शाळा सुरू होऊन महिना होत असताना आतापर्यंत फक्त एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांना वळती करण्यात आले आहेत. त्यातही अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही. गणवेशाच्या दुसºया जोडसाठी रक्कम शासनाकडून शिक्षण विभागाला आलीच नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे देण्यात आले नाही.गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार ५३६ मुली, अनुसूचित जातीतील चार हजार ५४४ मुले, अनुसूचित जमातीतील सहा हजार ७१९ मुले व दारिद्रय रेषेखालील २२ हजार ४७७ मुले अशा एकूण ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेश द्यायचे होते. दोन जोड गणवेशांपैकी एका गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितींच्या खात्यात जमा केल्याचे सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी सांगत आहेत. परंतु अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. गणवेशाचे पैसे मिळाले तर विद्यार्थ्यांना निदान एक गणवेश तरी आतापर्यंत का देण्यात आला नाही. गणवेशाच्या दुसऱ्या जोडसाठी शासनाकडून कार्यवाही करण्यात आली नाही.दोन कोटी २६ लाखांची गरजजिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचा दुसरा जोड देण्यासाठी दोन कोटी २५ लाख ८२ हजार ८०० रूपयांची गरज आहे. एवढा निधी शासनाने पाठविल्याशिवाय दुसरा जोड विद्यार्थ्यांना देता येणार नाही. एका गणवेशामागे ३०० रूपये शासन देत आहे. परंतु तेही गणवेशाची रक्कम शाळा सुरू होऊनही दिली नसल्याने काही ठिकाणचे विद्यार्थी आठवडाभर एकाच गणवेशात शाळेत जातात. तर काही ठिकाणी व्यवस्थापन समित्यांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेले नाही.

टॅग्स :Schoolशाळा