शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

७५ हजार विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:27 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थी गणवेशापासून वंचित : एकच गणवेशाचे दिले पैसे

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले. परंतु ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचा दुसरा जोड देण्यासाठी आतापर्यंत शासनाने पैसे दिलेच नसल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाºया व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन जोड गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते. परंतु शाळा सुरू होऊन महिना होत असताना आतापर्यंत फक्त एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांना वळती करण्यात आले आहेत. त्यातही अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही. गणवेशाच्या दुसºया जोडसाठी रक्कम शासनाकडून शिक्षण विभागाला आलीच नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे देण्यात आले नाही.गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार ५३६ मुली, अनुसूचित जातीतील चार हजार ५४४ मुले, अनुसूचित जमातीतील सहा हजार ७१९ मुले व दारिद्रय रेषेखालील २२ हजार ४७७ मुले अशा एकूण ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेश द्यायचे होते. दोन जोड गणवेशांपैकी एका गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितींच्या खात्यात जमा केल्याचे सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी सांगत आहेत. परंतु अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. गणवेशाचे पैसे मिळाले तर विद्यार्थ्यांना निदान एक गणवेश तरी आतापर्यंत का देण्यात आला नाही. गणवेशाच्या दुसऱ्या जोडसाठी शासनाकडून कार्यवाही करण्यात आली नाही.दोन कोटी २६ लाखांची गरजजिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशाचा दुसरा जोड देण्यासाठी दोन कोटी २५ लाख ८२ हजार ८०० रूपयांची गरज आहे. एवढा निधी शासनाने पाठविल्याशिवाय दुसरा जोड विद्यार्थ्यांना देता येणार नाही. एका गणवेशामागे ३०० रूपये शासन देत आहे. परंतु तेही गणवेशाची रक्कम शाळा सुरू होऊनही दिली नसल्याने काही ठिकाणचे विद्यार्थी आठवडाभर एकाच गणवेशात शाळेत जातात. तर काही ठिकाणी व्यवस्थापन समित्यांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेले नाही.

टॅग्स :Schoolशाळा