शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

कुणी रस्ता देता का हो रस्ता? पाच किमीच्या रस्त्यासाठी ४० वर्षे संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:01 IST

यंत्रणा होतेय वरचढ : लोकप्रतिनिधींना जुमानेनात : वचक कसा होणार निर्माण?

गोंदिया : गेल्या आठवड्यात रस्त्यासाठी झालेल्या गोरेगाव आणि सालेकसा तालुक्यांतील आंदोलनाने जिल्हावासीयांना सध्या विचार करण्यास भाग पाडले आहे. रस्ता मंजूर होऊनही त्याचे काम कंत्राटदार सुरू करीत नाही म्हणून चक्क आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना रस्त्यावर ठिय्या आंदोलन करावे लागले. तर केवळ साडेपाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी आठ ते दहा गावांतील गावकऱ्यांना गेल्या ४० वर्षापासून शासन आणि प्रशासनासह संघर्ष करावा लागत आहे. एका आंदोलनाने लोकप्रतिनिधींची प्रशासनावरील पकड सैल झाल्याचे तर दुसऱ्या आंदोलनाने प्रशासकीय दप्तर दिरंगाईचे दर्शन घडविले. सध्या ही दोन्ही आंदोलने जिल्ह्यात चर्चेचा विषय असून पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४० वर्षे संघर्ष करावा लागणे हे दुर्दैवच आहे.

सालेकसा तालुक्यातील धानोली ते बाम्हणी या ५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी या परिसरातील आठ ते दहा गावातील गावकरी गेल्या ४० वर्षांपासून शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करीत आहेत. रस्त्यासाठी वांरवार पायऱ्या झिजविल्यानंतर प्रश्न मार्गी लागत नसल्याने गावकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून धानोली येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. पण या उपोषणाची अद्यापही शासन, प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी गावकऱ्यांचे उपोषण सुरूच असून निगरगट्ट प्रशासन आणि बघ्याची भूमिका बजाविणारे संधीसाधू लोकप्रतिनिधी यांचे दर्शन या निमित्ताने घडत आहे. कुठलाही गाव अथवा त्या परिसराचा विकास आणि तेथील रस्ते, वाहतुकीची साधने यावरून ठरविला जातो. रस्त्याचे जाळे विणण्यासाठी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविली जात आहे. पण यानंतरही केवळ पाच किलोमीटरच्या रस्ता बांधकामासाठी निधी उपलब्ध करून न दिल्याने गावकऱ्यांना १५ ते २० किलोमीटरचा फेरा मारून ये-जा करावी लागत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. तर लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनाची खैरात वाटत असल्याने या रस्त्याच्या प्रश्न अद्यापही मार्गी न लागल्याने गावकऱ्यांना आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली. त्यामुळे या उपोषणाने तरी निगरगट्ट प्रशासनाला पाझर फुटणार का, लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी पुढाकार घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यंत्रणेला बळ नेमके कुणाचे? शासकीय काम आणि महिनाभर थांब याचा प्रत्यय सर्वसामान्य नागरिकांनी अनेकदा अनुभवला आहे. त्यांच्यासाठी हा प्रकार नवीन नाही. पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनासुद्धा आता याचा प्रत्यय यावा यापेक्षा दुसरे कोणते मोठे दुर्दैव नाही. वारंवार निर्देश देऊनही बांधकाम विभागाच्या यंत्रणेचे जुमानत नाही म्हणून आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना रस्त्यावर ठिय्या आंदोलन करावे लागत असेल तर सर्व- सामान्यांच्या तक्रारीची ही यंत्रणा किती तत्परतेने दखल घेत असेल याचा अनुभव जिल्हावासीयांना आला. पण लोकप्रति- निधींच्या तक्रारीची दखल न घेण्याचे बळ यंत्रणेत आले कुठून हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया