शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

कुणी रस्ता देता का हो रस्ता? पाच किमीच्या रस्त्यासाठी ४० वर्षे संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:01 IST

यंत्रणा होतेय वरचढ : लोकप्रतिनिधींना जुमानेनात : वचक कसा होणार निर्माण?

गोंदिया : गेल्या आठवड्यात रस्त्यासाठी झालेल्या गोरेगाव आणि सालेकसा तालुक्यांतील आंदोलनाने जिल्हावासीयांना सध्या विचार करण्यास भाग पाडले आहे. रस्ता मंजूर होऊनही त्याचे काम कंत्राटदार सुरू करीत नाही म्हणून चक्क आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना रस्त्यावर ठिय्या आंदोलन करावे लागले. तर केवळ साडेपाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी आठ ते दहा गावांतील गावकऱ्यांना गेल्या ४० वर्षापासून शासन आणि प्रशासनासह संघर्ष करावा लागत आहे. एका आंदोलनाने लोकप्रतिनिधींची प्रशासनावरील पकड सैल झाल्याचे तर दुसऱ्या आंदोलनाने प्रशासकीय दप्तर दिरंगाईचे दर्शन घडविले. सध्या ही दोन्ही आंदोलने जिल्ह्यात चर्चेचा विषय असून पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४० वर्षे संघर्ष करावा लागणे हे दुर्दैवच आहे.

सालेकसा तालुक्यातील धानोली ते बाम्हणी या ५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी या परिसरातील आठ ते दहा गावातील गावकरी गेल्या ४० वर्षांपासून शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करीत आहेत. रस्त्यासाठी वांरवार पायऱ्या झिजविल्यानंतर प्रश्न मार्गी लागत नसल्याने गावकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून धानोली येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. पण या उपोषणाची अद्यापही शासन, प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी गावकऱ्यांचे उपोषण सुरूच असून निगरगट्ट प्रशासन आणि बघ्याची भूमिका बजाविणारे संधीसाधू लोकप्रतिनिधी यांचे दर्शन या निमित्ताने घडत आहे. कुठलाही गाव अथवा त्या परिसराचा विकास आणि तेथील रस्ते, वाहतुकीची साधने यावरून ठरविला जातो. रस्त्याचे जाळे विणण्यासाठी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविली जात आहे. पण यानंतरही केवळ पाच किलोमीटरच्या रस्ता बांधकामासाठी निधी उपलब्ध करून न दिल्याने गावकऱ्यांना १५ ते २० किलोमीटरचा फेरा मारून ये-जा करावी लागत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. तर लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनाची खैरात वाटत असल्याने या रस्त्याच्या प्रश्न अद्यापही मार्गी न लागल्याने गावकऱ्यांना आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली. त्यामुळे या उपोषणाने तरी निगरगट्ट प्रशासनाला पाझर फुटणार का, लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी पुढाकार घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यंत्रणेला बळ नेमके कुणाचे? शासकीय काम आणि महिनाभर थांब याचा प्रत्यय सर्वसामान्य नागरिकांनी अनेकदा अनुभवला आहे. त्यांच्यासाठी हा प्रकार नवीन नाही. पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनासुद्धा आता याचा प्रत्यय यावा यापेक्षा दुसरे कोणते मोठे दुर्दैव नाही. वारंवार निर्देश देऊनही बांधकाम विभागाच्या यंत्रणेचे जुमानत नाही म्हणून आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना रस्त्यावर ठिय्या आंदोलन करावे लागत असेल तर सर्व- सामान्यांच्या तक्रारीची ही यंत्रणा किती तत्परतेने दखल घेत असेल याचा अनुभव जिल्हावासीयांना आला. पण लोकप्रति- निधींच्या तक्रारीची दखल न घेण्याचे बळ यंत्रणेत आले कुठून हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया