शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

४० टक्के कुटूंब आजही गवताच्या छताखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्याने या परिसराला व्यापले आहे. मधात ६-७ किमी चा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते.

ठळक मुद्देघरकुल योजनेचा पत्ताच नाही : सर्वांना घराचे केवळ स्वप्नच, मुरकुडोह दंडारीवासीयांची उपेक्षाच

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तालुक्यातील मुरकुडोह दंडारी वसाहतीला भेट दिल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता फारच दूर असल्याचे दिसून येते. येथील चाळीस टक्के कुटुंब अद्यापही गवताच्या छताखाली वास्तव्य करीत आहे. त्यांच्या स्वप्नातील पक्क्या घराचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न कायम आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्याने या परिसराला व्यापले आहे. मधात ६-७ किमी चा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते. काही स्थानिक लोकांच्या सांंगण्यावरुन वन संपत्ती गोळा करण्यासाठी वन वन भटकणारा आदिवासी समाजाचा घनदाट जंगलात व नदी खोºयात टोळीचा वावर असायचा. कदाचित वन उपज गोळा करुन आपल्या मुलभूत गरज भागविण्यासाठी आदिवासी लोकांची टोळी या भागात गेली असावी.हा भूभाग इतर लोकवस्तीपासून दूर असल्याने त्यांना सूर्यास्तपूर्वी परत जाणे शक्य न झाल्यामुळे त्या लोकांच्या टोळी येथील मोकळ्या भूभागावर आपला डेरा स्थापन केला असावा कालांतराने येथे त्या टोळीचे कुटूंब बिस्तारले आणि वस्ती निर्माण झाली. आधी काळापासून ज्या मूलभूत गरजासाठी लोकांना वन वन भटकावे लागत होते. आजही येथील लोकांचे जीवन या गरजा पूर्ण करण्यापूर्वीच अडकले आहे असे दिसून आले. येथील पाचही गावांमध्ये एकही पक्के घर दिसून आले नाही. येथील बहुतेक घरे मातीची व कौलारु छताचे आहेत. त्यातच ४० टक्के घरे फक्त बांबू आणि गवताच्या छताचे तसेच बांबूच्या भिंती असलेले दिसून येतात.या गावामध्ये अनेक कुटुंबाना साधे कौलारु घरे सुध्दा नशीबी नाही तर मग पक्के घर केव्हा हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.मागील ३०-४० वर्षापासून केंद्र शासनाची आवास योजना सुरू असून सुध्दा एवढ्या वर्षात येथील एकाही कुटूंबाला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. दर घरकुल योजना या गावापर्यंत पोहचलीच नसल्याचे चित्र आहे.मंजूर झाले तरी घरकुल बनले नाहीमुरकुडोह-दंडारी या गावांचा समावेश ग्रामपंचायत दरेकसामध्ये आहे. या ग्रामपंचायतीमध्ये दरेकसा सोडून डहाराटोला, दलदलकुही वंजारी या गावाचा समावेश असून मुरकुडोह, दंडारीचे पाचही गाव वार्ड नं.२ मध्ये येत आहे. या वॉर्डात घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी अनेक वेळा मागणी केली. दरम्यान काही घरकुल शासनाकडून मंजूर झाले परंतु प्रत्यक्षात बनलेच नाही.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना