शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

वर्षभरात ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:19 IST

जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देशहरात २२८ मृत्यू : गंगाबाई रूग्णालयाचा आकडा वाढता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. यावरून शून्य बालमृत्यू अभियानाचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात ४७ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागात १८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ३८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सालेकसा तालुक्यातील ग्रामीण भागात १३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला.देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात ५ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागात २० चिमुकल्यांचा तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात १४ चिमुकल्यांचा मृत्यू झाला झाला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांत वर्षभरात १६३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु तिरोडा व गोंदिया या दोन शहरांत चिमुकल्यांच्या मृत्यूची आकडेवारी सर्वाधीक आहे. येथे २२८ चिमुकल्यांचा वर्षभरात मृत्यू झाला असून ग्रामीण भागापेक्षा दुप्पट मृत्यू शहरी भागात झाले आहे. यात येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सर्वाधीक चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्याचा बालमृत्यू दर २२.२० टक्केजिल्ह्यातील गर्भवती महिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे बालमृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात १७ हजार ९०० महिलांची प्रसूती करण्यात आली. यातील १७ हजार ६१६ बाळ सुखरूप आहेत. तर ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून हा दर २२.२० टक्के आहे. शासनाने शून्य माता व बालमृत्यू अभियान सुरू केले. परंतु या अभियानाची उत्तम अंमलबजावणी न झाल्यामुळे बालमृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आहाराकडे दुर्लक्षगर्भावस्थेत महिलांना संतुलीत आहार दिला जात नाही. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणी होत नसल्यामुळे महिलांच्या पोटात असलेले अर्भक कुपोषीत होतात. त्यामुळे कमी वजन व शरीराची योग्यरित्या वाढ न झाल्यामुळे अर्भक मृत्यूदर वाढत आहे. बाल विकास विभागातर्फे दिला जाणारा आहार चवीष्ट नसल्यामुळे महिला मंडळी तो आहार जनावरांना देत असल्याची माहिती आहे.वांगाभातमुळे वाढतेय कुपोषणगोंदिया जिल्हा आदिवासी असल्यामुळे येथील लोक पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याची काळजी घेत नाही. गर्भवती महिला वांगे, आळण, कढी अशा एकेरी भाज्यांवरच दिवस काढतात. अनेक महिलांना गर्भावस्थेच्या पूर्ण काळात पोळी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे वजन सुरूवातीपासून कमीच असते. त्यातून कुपोषण वाढत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू