शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

वर्षभरात ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:19 IST

जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देशहरात २२८ मृत्यू : गंगाबाई रूग्णालयाचा आकडा वाढता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. यावरून शून्य बालमृत्यू अभियानाचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात ४७ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागात १८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ३८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सालेकसा तालुक्यातील ग्रामीण भागात १३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला.देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात ५ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागात २० चिमुकल्यांचा तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात १४ चिमुकल्यांचा मृत्यू झाला झाला आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांत वर्षभरात १६३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु तिरोडा व गोंदिया या दोन शहरांत चिमुकल्यांच्या मृत्यूची आकडेवारी सर्वाधीक आहे. येथे २२८ चिमुकल्यांचा वर्षभरात मृत्यू झाला असून ग्रामीण भागापेक्षा दुप्पट मृत्यू शहरी भागात झाले आहे. यात येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सर्वाधीक चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्याचा बालमृत्यू दर २२.२० टक्केजिल्ह्यातील गर्भवती महिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे बालमृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात १७ हजार ९०० महिलांची प्रसूती करण्यात आली. यातील १७ हजार ६१६ बाळ सुखरूप आहेत. तर ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून हा दर २२.२० टक्के आहे. शासनाने शून्य माता व बालमृत्यू अभियान सुरू केले. परंतु या अभियानाची उत्तम अंमलबजावणी न झाल्यामुळे बालमृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आहाराकडे दुर्लक्षगर्भावस्थेत महिलांना संतुलीत आहार दिला जात नाही. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणी होत नसल्यामुळे महिलांच्या पोटात असलेले अर्भक कुपोषीत होतात. त्यामुळे कमी वजन व शरीराची योग्यरित्या वाढ न झाल्यामुळे अर्भक मृत्यूदर वाढत आहे. बाल विकास विभागातर्फे दिला जाणारा आहार चवीष्ट नसल्यामुळे महिला मंडळी तो आहार जनावरांना देत असल्याची माहिती आहे.वांगाभातमुळे वाढतेय कुपोषणगोंदिया जिल्हा आदिवासी असल्यामुळे येथील लोक पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याची काळजी घेत नाही. गर्भवती महिला वांगे, आळण, कढी अशा एकेरी भाज्यांवरच दिवस काढतात. अनेक महिलांना गर्भावस्थेच्या पूर्ण काळात पोळी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे वजन सुरूवातीपासून कमीच असते. त्यातून कुपोषण वाढत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू