शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

३४ हजार वृध्दांची काठी झाली बळकट

By admin | Updated: December 9, 2015 02:11 IST

म्हातारपणात काम करण्याची ताकद नाही, आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यामुळे मुलांकडून होणारी हेळसांड, अशा समस्या गोरेगरीबांसह अनेक सर्वसाधारण कुटुंबात भेडसावतात.

वर्षाकाठी २१ कोटी ४७ लाखांची मदत२१ हजार रुपये उत्पन्नाची अट६५ वर्षांवरील वृध्दांना दिला जातो लाभनरेश रहिले गोंदियाम्हातारपणात काम करण्याची ताकद नाही, आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यामुळे मुलांकडून होणारी हेळसांड, अशा समस्या गोरेगरीबांसह अनेक सर्वसाधारण कुटुंबात भेडसावतात. असे होऊ नये, म्हाताऱ्या व्यक्तीलाही त्यांच्या वृध्दापकाळात सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य शासनाने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार ६४३ वृध्दांना लाभ मिळत असून त्यामुळे म्हातारपणात त्यांची काठी बळकट झाली आहे. ६५ व त्यापेक्षा अधिक वर्षाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील निराधार स्त्री व पुरूषांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनातर्फे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना तर राज्य सरकारकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाकडून २०० रूपये आणि राज्य शासनाकडून ३०० रूपये मासिक लाभ देण्यात येत होता. पुन्हा त्यात शंभर रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या योजनेच्या लाभार्थ्यांना ६०० रूपये लाभ देण्यात येतो. म्हातारपणात वृध्दांच्या औषधोपचाराचा खर्च अधिक असतो. त्यांच्याकडून मिळकत नसल्याने अनेक कुटुंबातील लोक त्या वृध्दांना त्रास देण्याचे काम करतात. मुले व सुनांच्या छळापायी त्रस्त झालेल्या अनेकांनी आपले घर सोडून वृध्दाश्रमाचा रस्ता धरला, तर काहींनी शेवटचा उपाय म्हणून भीक्षा मागून जगण्याचे ठरविले. काहींनी तर आपली जीवनयात्राच संपविली. ही बाब शासनाच्या लक्षात आल्याने वृध्दांना सन्मानाने जगता यावे म्हणून त्यांच्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना सुरू केली. या योजनांमुळे हजारो वृध्दांना जीवन जगण्याचा आधार मिळाला आहे. सात महिन्यात १२.२८ कोटी वाटप४वृद्धापकाळ योजनेसाठी गोंदिया जिल्ह्याला एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात २१ कोटी ४७ लाखांचा निधी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या विभागाकडून देण्यात आली. एप्रिल ते आॅक्टोबर सात महिन्याच्या काळात गोंदिया शहराला ४७ लाख २२ हजार २०० रूपये, गोंदिया तालुक्याला १ कोटी ३९ लाख ३० हजार ६०० रूपये, तिरोडा १ कोटी ५८ लाख १९ हजार, गोरेगाव तालुक्याला १ कोटी ५६ लाख ६५ हजार, आमगाव तालुक्याला १ कोटी ७३ लाख ९३ हजार ४०० रूपये, सालेकसा तालुक्याला ८४ लाख ९० हजार २०० रूपये, देवरी तालुक्याला ५९ लाख ५२ हजार २०० रूपये, अर्जुनी-मोरगाव तालुक्याला २ कोटी ३५ लाख ५८ हजार ४०० रूपये, सडक-अर्जुनी तालुक्याला १ कोटी ७२ लाख ९४ हजार ४०० रूपये वाटण्यात आले.