शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून कचारगडसाठी ३.२६ कोटी

By admin | Updated: February 23, 2016 02:18 IST

कचारगड देवस्थानाचा पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून तीन कोटी २६

सालेकसा : कचारगड देवस्थानाचा पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून तीन कोटी २६ लाख मंजूर करण्यात आले असून येत्या मार्च अखेर तो निधी कचारगडच्या विकासासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी गोंडवाना महासंमेलनादरम्यान मार्गदर्शन करताना दिली.गोंडवाना महासंमेलनाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आर्णिचे आ. तोडसाम, गोंडराजे वासुदेव शाह टेकाम, भाजप नेते राकेश शर्मा, जि.प. सदस्य विजय टेकाम, गोंडी धर्माचार्य दादा हिरसिंह मरकाम, शेरसिंह आचला यांच्यासह अनेक राज्यातून आलेले आदिवासी समाजाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे, प्रभारी प्रकल्प अधिकारी मीनाक्षी उन्हाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व प्रथम भूमकाल यांनी १२ सगापेन व ७५० गणगोत पूजा करुन उद्घाटन महोदयांना दीप प्रज्वलित करण्यात लावले. संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमगावचे आमदार संजय पुराम यांनी हळदीचा पिवळा टीेका लावून अतिथीचे स्वागत केले.या प्रसंगी खा. नेते म्हणाले की गोंडी संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असून यात पर्यावरण रक्षणासाठी विशेष भर दिला जातो. खऱ्या अर्थाने आदिवासी समाज हा नैषर्गिक संपत्तीचा रक्षण कर्ता आहे. म्हणून त्यांच्या श्रद्धास्थाने विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आदिवासीचे सुद्धा विकास होईल. याप्रसंगी ना. बडोले म्हणाले की संस्कृती व परंपरा जपण्यामध्ये आदिवासी समाज सदैव तत्पर राहीला आहे. मागासलेला असला तरी निषर्गातील संपत्तीचे रक्षण करणे, परंपराच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासणे या समाजाला माहित आहे. आ. पुराम म्हणाले कचारगडच्या विकासातच आदिवासीचा विकास लपलेला आहे. त्यामुळे सर्वांनी कचारगडच्या विकासात सहकार्य करण्याची गरज आहे. कचारगड आता विकासाचा वाटेवर आला असून येणाऱ्या काळात निश्चित याचा कायापालट होणार यात शंका नाही. प्रास्ताविक मांडताना कचारगड समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी कचारगडच्या विकासासाठी शासन स्तरावरील ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत प्रकट केले. उपस्थित पालक मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन केले की या परिसरात वर्षभर पिण्याच्या पाण्याची वीजेची व आरोग्याची सेवा मिळावी यासाठी ठोस उपाय योजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाला समितीचे माजी अध्यक्ष शंकलाल मडावी, भाजप अध्यक्ष परणसराम फुंडे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, बाबा लिल्हारे, राजेंद्र बडोले, चंद्रलेखा कंगाली, संस्थापक गोपालसिंह उईके, आदी उपस्थित होते. संचालक पर्वतसिंह कंगाली यानी केले. आभार सचिव संतोष पंधरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रमणलाल सलाम, मनिष पुसाम, बारेलाल वरकडे, सुरेश परते, रामेश्वर पंधरे, शकुनतला परते, मनोज इळपाते, राधेश्याम टेकाम, विरेंद्र उईके आदिनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)