शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सैराट झालेल्या २५४ मुली घरी परतल्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:18 IST

नरेश रहिले / लोकमत विशेष गोंदिया : मध्यंतरी आलेल्या ‘'सैराट’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाने आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. या ...

नरेश रहिले / लोकमत विशेष

गोंदिया : मध्यंतरी आलेल्या ‘'सैराट’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाने आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. या सिनेमाच्या धर्तीवर अल्पवयीन मुलींनी प्रियकरासोबत पलायन केले. परंतु प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलींना प्रियकराकडून मिळालेली अमानुष वागणूक व दाखविलेले स्वप्न भंग झाल्याने प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुली घरी परतल्या. मागील चार वर्षात २५४ मुली, तर ३९ मुले असे २९३ मुले-मुली घरी परतले आहेत.

आपले मुले-मुली आदर्श नागरिक घडतील असे स्वप्न आई-वडील बघत असताना तीच मुले आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरत असतील तर यात आजघडीला काही नवल नाही. गोंदियासारख्या छोट्या जिल्ह्यातूनही वर्षाकाठी शेकडो मुली आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरून प्रियकरासोबत पलायन करीत आहे. परंतु प्रियकरासोबत पलायन झालेल्या मुलींना त्यांचे स्वप्नभंग होत असल्याचे लक्षात येत असल्याने डोळ्यात अश्रू घेऊन घरी परत येत आहेत. त्यातच त्या मुली आपल्या आई-वडिलांचा मानसन्मान समाजातून कमी करण्याचा प्रयत्न करतात. अपहरण व बेपत्ता झालेल्या बालकांच्या शोधासाठी शासनाने ऑपरेशन ‘मुस्कान’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमाची फलश्रुती म्हणजेच जिल्ह्यात मागील चार वर्षात म्हणजे सन २०१७ ते २०२० याकाळात सैराट झालेल्या ३२२ पैकी २५४ मुले-मुली आपल्या घरी सुखरूप परतल्या आहेत. यामध्ये २५४ मुली व ३९ मुले आहेत. मात्र २९ मुली अजूनही बेपत्ता आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार १८ वर्षांखालील हरविलेल्या मुलांना शोधण्याचे प्रमाण महाराष्ट्रात राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.

बॉक्स

यंदा ५६ टक्केच बालकांचा शोध

गोंदिया जिल्ह्यातील १८ वर्षांखालील हरविलेली मुले मिळून येण्याचे प्रमाण सन २०१७मध्ये ९८ टक्के, सन २०१८मध्ये ९८.८८ टक्के, सन २०१९ मध्ये ९२.०७ टक्के, तर सन २०२०मध्ये ५६.०९ टक्के आहे. सन २०१७ मध्ये १४ मुले व ६३ मुली असे ७७ बालके हरविलेली होती. त्यापैकी १४ मुले व ६२ मुली अशा ७६ मुला-मुलींना शोधण्यात आले आहे. सन २०१८मध्ये आठ मुले व ८२ मुली असे ९० मुलेमुली हरविली होती व त्यापैकी आठ मुले आणि ८१ मुली अशा ८९ मुला-मुलींना शोधण्यात आले आहे. सन २०१९ मध्ये १५ मुले, ९९ मुली असे ११४ हरविली होती. त्यापैकी १५ मुले आणि ९० मुली अशा १०५ मुला-मुलींना शोधण्यात आले आहे. दरवर्षीची परिस्थिती पाहता सन २०२० मध्ये लाॅकडाऊन असल्याने हरविलेल्या मुलींची संख्या ५० टक्के असून, त्यात दोन मुले व ३९ मुली असे ४१ मुले-मुली हरविले. त्यापैकी दाेन मुले, तर २१ मुली अशा २३ बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले.

बॉक्स

२९ मुलींचा घेणार शोध

मागील चार वर्षाची परिस्थिती पाहता गोंदिया जिल्ह्यातील २९ मुली अजूनही बेपत्ता आहेत. त्यात सन २०१७ व सन २०१८ मधील प्रत्येकी १ अशा २ मुली, सन २०१९ मध्ये नऊ मुली, तर सन २०२० मधील १८ मुली अशा एकूण २९ मुली अजूनही बेपत्ता आहेत.