शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के राखीव प्रवेशाचे ४ कोटी १६ लाख अडले

By admin | Updated: July 13, 2016 02:21 IST

शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ चे कलम १२ नुसार वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा,

१२२ शाळांचा समावेश : प्रवेश नाकारण्यासाठी शाळा झाल्या हतबल नरेश रहिले गोंदिया शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ चे कलम १२ नुसार वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कायम आणि विनाअनुदानित शाळांत २५ टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश देण्याची अट शासनाने घातली आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील १२२ शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. मात्र मागील चार वर्षात त्या राखीव जागांवरील विद्यार्थ्यांपोटी शाळांना मिळणारे ४ कोटी १६ लाख ४४ हजार रुपये शासनाकडून मिळालेच नाही. त्यामुळे संबंधित शाळांचे संचालक अडचणीत आले आहेत. वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली जाते. त्या विद्यार्थ्यांची खासगी शाळांत लागणारे शुल्क शासन त्या संस्थांना शासनाकडून देण्यात देते. मागील चार वर्षात गोंदिया जिल्ह्यात वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण देणाऱ्या शाळांना विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटी ५ कोटी ७१ लाख ५७ हजार ३७२ रूपये शासनातर्फे मिळणे अपेक्षित होते. मात्र फक्त एक कोटी ५५ लाख १२ हजार ३९७ रूपये देण्यात आले आहेत. उर्वरित ४ कोटी १६ लाख ४४ हजार ९७५ रूपये या शाळांना देणे बाकी आहे. शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार सन २०१२-१३ पासून वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना इंग्रजी माध्यमांध्ये प्रवेश देणे अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार सन २०१२-१३ या वर्षात पहिल्या वर्गात ५१६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सन २०१३-१४ या वर्षात पहिल्या वर्गात ८३६, दुसऱ्या वर्गात ५१६ असे १३५२ विद्यार्थी होते. या दोन वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटी एक कोटी ४९ लाख ६९ हजार ८९१ रूपये मागणी करण्यात आली होती. परंतु २०१३-१४ या वर्षात ७२ लाख ८ हजार ३९७ रूपये शासनाने दिले. ते पैसे गोंदियातील ५५ शाळांना वाटप करण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षातील ७७ लाख ६१ हजार ४९४ रूपये देण्यात आले नाही. सन २०१४-१५ या वर्षात पहिल्या वर्गात ६२३, दुसऱ्या वर्गात ८३६, तिसऱ्या वर्गात ५१६ अश्या १९७५ विद्यार्थ्यांचा प्रवेश होता. त्यांच्या शाळांना एक कोटी ७२ लाख ८ हजार ९५ रूपये शासनाकडून घेणे होते. परंतु शासनाने एकदा आठ लाख व दुसऱ्या वेळी ७५ लाख ४ हजार रूपये पाठविले. त्या शाळाचे ८९ लाख ४ हजार ९५ रूपये अडवून ठेवले आहेत. सन २०१५-१६ या वर्षात पहिल्या वर्गात ७४३, दुसऱ्या वर्गात ६२३, तिसऱ्या वर्गात ८३६, चवथ्या वर्गात ५१६ असे २७१८ विद्यार्थ्यांपोटी २ कोेटी ४९ लाख ७९ हजार ३८६ रूपयांची मागणी करण्यात आली. परंतु त्यातील एकही पैसे देण्यात आले नाही. मागील चार वर्षातील चार कोटी १६ लाख ४४ हजार ९७५ रूपये शाळांना न मिळाल्यामुळे शाळा संचालक मोठ्या अडचणीत आले आहेत. शाळांना कारवाईची भीती जिल्ह्यात वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना कायम व विनाअनुदानित नामांकित इंग्रजी माध्यमांच्या १२२ शाळांमध्ये मागील चार वर्षापासून ही प्रवेश प्रक्रिया करण्यात येते. परंतु शासनाने मोठ्या प्रमाणात रक्कम न दिल्याने त्या बालकांना आता प्रवेश द्यायचा किंवा नाही असा पेच शाळा संचालकांपुढे निर्माण झाला. परंतु शासनाचे पैसे आहेत जाणार कुठे असा विचार काही आर्थिकदृष्ट्या सक्षम शाळांचे संचालक करीत आहेत. मात्र यामुळे सर्वसाधारण शाळांना आपला खर्चही भागविणे कठीण होत आहे. जर त्या मुलांना प्रवेश देण्यास नकार दिला तर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्याचे पत्र शिक्षण संचालकांना पाठविले जाते. याची धास्ती शाळा चालविणाऱ्या शिक्षण संस्था चालकांमध्ये असते. तीन कि.मी.च्या अटीमुळे संधी हुकली जिल्ह्यात ग्रामीण भागात व नक्षलग्रस्त भागात दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थी बरेच आहेत. परंतू त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश हवा असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. कारण जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळा शहरी भागात आहेत. नियमानुसार संबंधित विद्यार्थ्याच्या घरापासून त्या शाळेचे अंतर तीन किलोमीटरपेक्षा अधिक असू नये. त्यामुळे सालेकसा, देवरी, आमगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गोंदियातील नामांकित शाळांमधील प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे.