शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

११ महिन्यांत घडले २३० अपघात; गोंदियात १३५ जणांनी गमावला जीव

By कपिल केकत | Updated: December 11, 2023 19:36 IST

घाई कशाला, घरचे तुमची वाट बघत आहेत, यासाठीच लवकर निघा!

कपिल केकत, गोंदिया: जिवापेक्षा मोठी अन्य कोणतीही संपत्ती नाही, असे म्हटले जाते. नक्कीच यात तथ्य आहे. मात्र, यानंतरही कित्येक जण जिवाची पर्वा न करता वाहन दटावताना दिसतात. याचा शेवटही त्यांच्या जिवावर बेतूनच होतो. जिल्ह्यात मागील ११ महिन्यांत घडलेल्या २३० अपघातांत १३५ जणांनी जीव गमावल्याची आकडेवारी असल्याने याची प्रचिती येते. यामुळेच वाहन चालविताना घाई कशाला, घरचे तुमची वाट बघत आहेत ! एवढा भान ठेवणे गरजेचे आहे.

आपल्या अपत्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या, यासाठी पालक अल्पवयातच त्यांच्या हाती वाहन देत आहेत. हाती वाहन आल्यानंतर मात्र ही मुले आपल्या जिवाची पर्वा न करता भरधाव वेगात वाहन चालवून ‘रेस’ लावताना दिसत आहे. तरुण-तरुणीही वाहनाला विमान समजून चालवित असल्याने जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील ११ महिन्यांतील आकडेवारी तपासली असता, त्यात २३० अपघात घडले असून ११६ अपघातांत तब्बल १३५ जणांनी आपला जीव गमावल्याचे दिसून येते. तर, ७१ अपघात गंभीर स्वरूपाचे असून त्यात १६४ जण गंभीर जखमी झाले असतानाच ३५ अपघातांत ५९ जण किरकोळ जखमी झाले असून फक्त ८ अपघातांत कुणीही जखमी झाले नसल्याचे दिसून येत आहे.

अपघातांच्या या वर्गवारीत १३५ जणांचा जीव गेला असून, यामध्ये कुणाचा मुलगा व मुलगी हिरावली आहे. मात्र, त्यातह खेदाची बाब घरचा कमावता व लहान-लहान मुलांना सोडून गेलेल्या व्यक्तीची कमतरता कशी भरून निघणार ही गंभीर बाब आहे. यामुळे कोठेही जाताना ‘लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा’ या मंत्राचा अंमल प्रत्येकानेच करण्याची गरज आहे. कारण, प्रत्येकाच्याच घरी कुणीतरी वाट बघत आहे.

सर्वाधिक प्राणांतिक अपघात एप्रिल व ऑक्टोबर महिन्यात

जिल्ह्यात ११ महिन्यांमध्ये २३० अपघातांची नोंद घेण्यात आली असून, यातील ११६ अपघातांत १३५ जणांचा जीव गेला आहे. हे प्राणांतिक अपघात एप्रिल व ऑक्टोबर महिन्यातच सर्वाधिक घडले आहेत. एप्रिल महिन्यात घडलेल्या २६ अपघातांत १९ जणांचा जीव गेला असून ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या २४ अपघातांत सुद्धा १९ जणांचा जीव गेला आहे. तर जून महिन्यातील २७ अपघातांत तब्बल ४५ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.

मायबाप हो, आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या!

आजघडीला शाळेत शिकणारी मुले-मुली वाहन चालविताना दिसत आहेत. मात्र, ते भरधाव वेगात वाहन चालवून एकमेकांशी रेस लावत असून, येथेच अपघात घडतात. ही बाब त्यांच्यासह अन्य नागरिकांसाठीही धोक्याची आहे. अशात पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये. तसेच, आपली मुले अल्पवयीन असो वा नसो मात्र त्यांच्याकडेही पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

नियमांचे पालन करा

वाहतुकीचे नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. नियम मोडल्यास अपघात घडतात व यामध्ये कित्येकांना जीव गमवावा लागतो. यामुळे वाहन चालविताना नियमांचे पालन करा. कारण, प्रत्येकाच्याच घरी त्यांची वाट बघणारे आहेत.- किशोर पर्वते, निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

महिनानिहाय मृतांची संख्या

महिना- मृत

  • जानेवारी- ८
  • फेब्रुवारी- १२
  • मार्च- ९
  • एप्रिल- १९
  • मे- १६
  • जून- १४
  • जुलै- ११
  • ऑगस्ट- ५
  • सप्टेंबर -११
  • ऑक्टोबर- १९
  • नोव्हेंबर- ११

----------------------------------

अपघातातील मृत, गंभीर व किरकोळ जखमी

महिना- मृत- गंभीर - किरकोळ जखमी

  • जानेवारी- ८-१३-२
  • फेब्रुवारी-१२-१०-६
  • मार्च- ९-१०-१५
  • एप्रिल- १९-२३-२
  • मे- १६-१६-५
  • जून-१४-४५-५
  • जुलै- ११-१२-२
  • ऑगस्ट- ५-११-१२
  • सप्टेंबर- ११-५-१
  • ऑक्टोबर-१९-९-४
  • नोव्हेंबर- ११-१०-५
टॅग्स :Accidentअपघात