शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

११ महिन्यांत घडले २३० अपघात; गोंदियात १३५ जणांनी गमावला जीव

By कपिल केकत | Updated: December 11, 2023 19:36 IST

घाई कशाला, घरचे तुमची वाट बघत आहेत, यासाठीच लवकर निघा!

कपिल केकत, गोंदिया: जिवापेक्षा मोठी अन्य कोणतीही संपत्ती नाही, असे म्हटले जाते. नक्कीच यात तथ्य आहे. मात्र, यानंतरही कित्येक जण जिवाची पर्वा न करता वाहन दटावताना दिसतात. याचा शेवटही त्यांच्या जिवावर बेतूनच होतो. जिल्ह्यात मागील ११ महिन्यांत घडलेल्या २३० अपघातांत १३५ जणांनी जीव गमावल्याची आकडेवारी असल्याने याची प्रचिती येते. यामुळेच वाहन चालविताना घाई कशाला, घरचे तुमची वाट बघत आहेत ! एवढा भान ठेवणे गरजेचे आहे.

आपल्या अपत्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या, यासाठी पालक अल्पवयातच त्यांच्या हाती वाहन देत आहेत. हाती वाहन आल्यानंतर मात्र ही मुले आपल्या जिवाची पर्वा न करता भरधाव वेगात वाहन चालवून ‘रेस’ लावताना दिसत आहे. तरुण-तरुणीही वाहनाला विमान समजून चालवित असल्याने जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील ११ महिन्यांतील आकडेवारी तपासली असता, त्यात २३० अपघात घडले असून ११६ अपघातांत तब्बल १३५ जणांनी आपला जीव गमावल्याचे दिसून येते. तर, ७१ अपघात गंभीर स्वरूपाचे असून त्यात १६४ जण गंभीर जखमी झाले असतानाच ३५ अपघातांत ५९ जण किरकोळ जखमी झाले असून फक्त ८ अपघातांत कुणीही जखमी झाले नसल्याचे दिसून येत आहे.

अपघातांच्या या वर्गवारीत १३५ जणांचा जीव गेला असून, यामध्ये कुणाचा मुलगा व मुलगी हिरावली आहे. मात्र, त्यातह खेदाची बाब घरचा कमावता व लहान-लहान मुलांना सोडून गेलेल्या व्यक्तीची कमतरता कशी भरून निघणार ही गंभीर बाब आहे. यामुळे कोठेही जाताना ‘लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा’ या मंत्राचा अंमल प्रत्येकानेच करण्याची गरज आहे. कारण, प्रत्येकाच्याच घरी कुणीतरी वाट बघत आहे.

सर्वाधिक प्राणांतिक अपघात एप्रिल व ऑक्टोबर महिन्यात

जिल्ह्यात ११ महिन्यांमध्ये २३० अपघातांची नोंद घेण्यात आली असून, यातील ११६ अपघातांत १३५ जणांचा जीव गेला आहे. हे प्राणांतिक अपघात एप्रिल व ऑक्टोबर महिन्यातच सर्वाधिक घडले आहेत. एप्रिल महिन्यात घडलेल्या २६ अपघातांत १९ जणांचा जीव गेला असून ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या २४ अपघातांत सुद्धा १९ जणांचा जीव गेला आहे. तर जून महिन्यातील २७ अपघातांत तब्बल ४५ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.

मायबाप हो, आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या!

आजघडीला शाळेत शिकणारी मुले-मुली वाहन चालविताना दिसत आहेत. मात्र, ते भरधाव वेगात वाहन चालवून एकमेकांशी रेस लावत असून, येथेच अपघात घडतात. ही बाब त्यांच्यासह अन्य नागरिकांसाठीही धोक्याची आहे. अशात पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये. तसेच, आपली मुले अल्पवयीन असो वा नसो मात्र त्यांच्याकडेही पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

नियमांचे पालन करा

वाहतुकीचे नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. नियम मोडल्यास अपघात घडतात व यामध्ये कित्येकांना जीव गमवावा लागतो. यामुळे वाहन चालविताना नियमांचे पालन करा. कारण, प्रत्येकाच्याच घरी त्यांची वाट बघणारे आहेत.- किशोर पर्वते, निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

महिनानिहाय मृतांची संख्या

महिना- मृत

  • जानेवारी- ८
  • फेब्रुवारी- १२
  • मार्च- ९
  • एप्रिल- १९
  • मे- १६
  • जून- १४
  • जुलै- ११
  • ऑगस्ट- ५
  • सप्टेंबर -११
  • ऑक्टोबर- १९
  • नोव्हेंबर- ११

----------------------------------

अपघातातील मृत, गंभीर व किरकोळ जखमी

महिना- मृत- गंभीर - किरकोळ जखमी

  • जानेवारी- ८-१३-२
  • फेब्रुवारी-१२-१०-६
  • मार्च- ९-१०-१५
  • एप्रिल- १९-२३-२
  • मे- १६-१६-५
  • जून-१४-४५-५
  • जुलै- ११-१२-२
  • ऑगस्ट- ५-११-१२
  • सप्टेंबर- ११-५-१
  • ऑक्टोबर-१९-९-४
  • नोव्हेंबर- ११-१०-५
टॅग्स :Accidentअपघात