शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२२५४ खातेदार बनले सभासद

By admin | Updated: January 13, 2017 01:01 IST

फक्त खातेदार म्हणून संस्थेत असल्याने मिळणाऱ्या सुविधांपासून शेतकरी वंचीत राहतात.

सहकार विभागाचा अभियान : कित्येक खातेदारांची अनिच्छागोंदिया : फक्त खातेदार म्हणून संस्थेत असल्याने मिळणाऱ्या सुविधांपासून शेतकरी वंचीत राहतात. मात्र सभासदांप्रमाणेच या खातेदारांना अन्य सुविधा मिळाव्या या उद्देशातून सेवा सहकारी संस्थेत असलेल्या खातेदारांना आता सभासद करण्यासाठी सहकार विभागाकडून अभियान राबविले जात आहे. यांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २२५४ खातेदारांना संस्था सभासद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात मात्र खातेदारांची अनिच्छा दिसत आहे. गाव पातळीवर कार्यरत असलेल्या सेवा सहकारी संस्थेतून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ‘कर्ज’ ही असते. यासाठी संबंधीत शेतकरी संस्थेचा सभासद असणे गरजेचे आहे. मात्र माहिती अभावी गावातील शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे खातेदार तर असतात मात्र ते सभासद नसल्याने कर्जासह अन्य सुविधांपासून वंचीत राहतात. शेतीचा हंगाम येताच या शेतकऱ्यांना कर्जासाठी इतरत्र भटकावे लागते. माहितीचा अभाव असल्याने आपल्या हक्काच्या संस्थेतून मिळणाऱ्या सोयींना ते मुकतात. हा प्रकार संपुष्टात यावा व प्रत्येक शेतकऱ्याला सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी प्राप्त व्हाव्या या उद्देशातून सहकार मंत्र्यांनी सेवा सहकारी संस्थेतील खातेदारांना सभासदत्व देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहकार विभागाकडून विशेष अभियान राबवून सेवा सहकारी संस्थेतील खातेदारांना सभासद करवून देण्याचे कार्य केले जात आहे. साधारण खातेदार असलेले हे शेतकरी संस्थेचे सभासद झाल्यास त्यांना संस्थेकडून हंगामात कर्ज तर मिळणारच. शिवाय संस्थेकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्य सुविधांसाठीही ते पात्र ठरणार आहेत. त्यानुसार सहकार विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत २२५४ खातेदारांना संस्थांचे सभासद बनविण्यात आले आहेत. असे असतानाही मात्र आताही ६२ हजार ७२८ खातेदार सभासद बनवयाचे आहेत. मात्र यातही कित्येक सभासदांची अनिच्छा असल्याने या मोहिमेला पाहिजे तसे यश मिळाले नाही. परिणामी खातेदारांना सभासद बनविण्यात आल्याचा आकडा कमी दिसतो. (शहर प्रतिनिधी) माहिती अभावी शेतक री पिछाडले शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात पैसा लागतो. अशात सेवा सहकारी संस्थेच्या माध्यामातून कर्ज वाटप होत असले तर हे खातेदार शेतकरी कर्ज वाटपात पात्र ठरत नसून मुकतात. परिणामी इतरत्र उधार-उसनवारी किंवा सावकाराकडून व्याजावर पैसा घेणे हेच पर्याय उरतात. त्याचे परिणामही पुढे जावून शेतकऱ्यांना भोगावे लागतात. हे प्रकार थांबावे व पात्र प्रत्येक शेतकऱ्याला संस्थेकडून सहकार्य लाभावे या व्यापक दृष्टीकोनातून सहकार मंत्र्यांनी खातेदारांना सभासदत्व देण्याचा हा निर्णय घेतला आहे.