शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

२१ जनावरं डांबलेले तस्करीचे वाहन पकडले; गोंदियात दोन गटांत राडा

By नरेश रहिले | Updated: March 30, 2024 18:55 IST

चंगेरा येथे जनावरे पकडली, हाणामारी बाजारटोलात : पोलिस खबऱ्या असल्याचा संशय

गोंदिया : कत्तलखान्यात नेण्यासाठी कोंबून ठेवलेल्या जनावरांचे वाहन पोलिसांनी पकडले असून त्यातील २१ जनावरांची सुटका करण्यात आली. रावणवाडी पोलिसांनी ग्राम चंगेरा येथे रात्री ८ वाजेदरम्यान ही कारवाई केली.

जनावरांना कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी वाहन क्रमांक एमएच ३७-टी ३११४ मध्ये २१ जनावरांना चारापाणी न देता त्यांचे पाय बांधून दाटीवाटीने वाहनात डांबून नेण्याच्या तयारीत असताना पोलिस शिपाई नरेंद्र मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड घालून वाहन पकडले. वाहनात बघितले असता त्यात २१ जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले. या प्रकरणात पोलिसांनी १२ लाख रुपये किमतीचे वाहन, तर दोन लाख १० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण १४ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त केला. तसेच, आरोपी फिरोज खान रशीद खान (५२, रा. सेलूबाजार, जि. वाशिम), राजीक सफी कनोज (२७, रा. बाजारटोला-काटी) व जितेंद्र हरिलाल अंबुले (२९, रा. बाजारटोला-काटी) या तिघांवर २९ मार्च रोजी रावणवाडी पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११, १, (ड) सहकलम ५ अ, ९ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बघेले करीत आहेत.

म्हणे तू पोलिसांचा खबरी

- या प्रकरणातील आरोपींनी बाजारटोला येथील रविशंकर तोफसिंग तुरकर (२८) व थानसिंग तोफसिंग तुरकर (२३) या दोघा भावंडांना पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय घेत २८ मार्च रोजी रात्री १० वाजता बाजारटोला येथे शिवीगाळ करीत काठी व दगडाने मारून जखमी केले. या घटनेत प्रतिउत्तर म्हणून अल्ताफ सफिक कानुज (२४, रा. बाजारटोला) यालाही आरोपी रविशंकर तुरकर व थानसिंग तुरकर यांनी धक्काबुक्की करीत दगडाने मारहाण केली. या दोन्ही गटांतील लोकांवर रावणवाडी पोलिसांनी भादंवि कलम ३२४,५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया