शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

सात महिन्यात १९७ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:08 PM

जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देशून्य मृत्यू अभियान अपयशी : गोंदियात होऊ शकते गोरखपूरची पुनरावृत्ती

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे. मात्र दुसरीकडे याच अभियानाला काळे फासण्याचे काम बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय करीत आहे. गेल्या सात महिन्यात एकट्या गंगाबाईत रुग्णालयात १९७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.जिल्हा आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल आहे. या भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. यासाठी शून्य मृत्यू अभियान राबविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे केला.त्यांनी बैठका घेऊन सर्व आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांना सूचनाही दिल्या. मात्र गंगाबाईतील बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गंगाबाईत आलेल्या रूग्णांची आकडेवारी पाहता जानेवारी महिन्यात ५६५ महिलांची प्रसूती करण्यात आली. त्यात आयूडी ११ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे पाच बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ८ बालके अश्या २४ बालकांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात ५१० महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी ८ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १३ बालके अश्या २३ बालकांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात ५५४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी ५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ९ बालके अश्या १६ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ४९७ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १० बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १२ बालके अश्या २४ बालकांचा मृत्यू झाला. मे महिन्यात ५६४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे ५ बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १९ बालके अश्या ३९ बालकांचा मृत्यू झाला. जून महिन्यात ५२५ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे ४ बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ९ बालके अश्या २८ बालकांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ५६६ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी २० बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील २१ बालके अश्या ४३ बालकांचा मृत्यू झाला. या सात महिन्यात बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात बालमृत्यूचे तांडव सुरू असतानाही आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनही निद्रावस्थेत आहे.अतिदक्षता कक्षावर प्रश्नचिन्हगंगाबाई स्त्री रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबातील गर्भवती प्रसूतीसाठी दाखल होतात. येथे जन्माला येणारी बालके सर्व सामान्य बालकांच्या वजनापेक्षा कमी वजनाची असल्यामुळे त्या बालकांना योग्य उपचार देण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सुसज्ज नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला. परंतु येथे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ९१ बालकांचा मृत्यू झाला.रिक्त पदांमुळे कर्मचारी त्रस्तगंगाबाई स्त्री रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांवर भार येत आहे. त्यामुळे त्यांना अठरा अठरा तास काम करावे लागते. गंगाबाई स्त्री रूग्णालयात ६ बधीरीकरण तज्ज्ञांची गरज आहे. परंतु येथे एकच तज्ज्ञ कार्यरत आहेत. मेडीकल कॉलेजचे बधीरीकरण तज्ज्ञ काम करीत नाही. गंगाबाई स्त्री रूग्णालयात सहा बालरोग तज्ज्ञांची गरज असताना केवळ तीनच कार्यरत आहेत. परिचारीकांची ६० पदे मंजूर असताना ३४ जागाच भरल्या आहेत. वर्ग चारचे ४० पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना स्ट्रेचरवर नेण्याचे काम नातेवाईकांनाच करावे लागते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गर्भातच दगावली ८४ बालकेगर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी केलेले दुर्लक्ष, वेळोवेळी उपचार नाही, खानपाणात अनियमितता, असंतुलीत आहार, प्रथीने, विटॉमीन, लोह गर्भवतींना वेळीच मिळत नसल्यामुळे त्यांच्या पोटातील गर्भाची वाढ होऊ शकली नाही. सतत होणाºया दुर्लक्षीततेमुळे जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारी ८, मार्च ५, एप्रिल १०, मे १५, जून १५ व जुलै २० अशा एकूण ८४ बालकांचा गर्भातच मृत्यू झाला.