शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

६९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 21:52 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी यंदा जिल्ह्यातील ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या संख्येत प्रथमच वाढ : कर्जदार शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक , ६ हजार शेतकऱ्यांनी स्वेछेने काढला विमा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामानातील बदलाचा सर्वाधिक परिणाम पिकांवर होत आहे. तर मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी यंदा जिल्ह्यातील ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र यात पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून स्वत:हून विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे.जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९२ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र ऑगस्ट महिन्यात सुरूवातीपासून चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. पण हवामान विभागाचे अंदाज देखील वांरवार चुकत असल्याने नैसगिक संकटापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.विशेष म्हणजे मागील चार पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.ही जरी समाधानकारक बाब असली तरी यात कर्जदार शेतकºयांचे सर्वाधिक प्रमाण आहे. तर स्वत:हून पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्या तुलनेत फार कमी आहे.यंदा जिल्ह्यातील एकूण ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यात ६३ हजार ४१२ शेतकरी हे कर्जदार गटातील असून ५ हजार ८९० शेतकरी बिगर कर्जदार गटातील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी एकूण ३८ हजार ६६९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला असून विमा हप्त्यापोटी १४ कोटी १७ लाख ६२ हजार २५७ रुपये विमा कंपन्याकडे भरले आहेत.पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँक अपयशीशासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा, राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांना २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र जिल्हा आणि ग्रामीण बँका वगळता राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्ट गाठण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ४० टक्केच पीक कर्जाचे वाटप केले. त्यामुळे नाबार्डकडून पुढील वर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.विमा कंपन्यांचा अनुभव वाईटजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा कंपन्याबाबत वाईट अनुभव आहे. त्यामुळेच कृषी विभागाच्या व्यापक जनजागृतीनंतरही शेतकरी स्वत:हून पीक विमा काढण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य केले असल्याने शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र स्वत:हून विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही अजूनही विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी