शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

६९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 21:52 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी यंदा जिल्ह्यातील ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या संख्येत प्रथमच वाढ : कर्जदार शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक , ६ हजार शेतकऱ्यांनी स्वेछेने काढला विमा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामानातील बदलाचा सर्वाधिक परिणाम पिकांवर होत आहे. तर मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी यंदा जिल्ह्यातील ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र यात पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून स्वत:हून विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे.जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९२ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र ऑगस्ट महिन्यात सुरूवातीपासून चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. पण हवामान विभागाचे अंदाज देखील वांरवार चुकत असल्याने नैसगिक संकटापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.विशेष म्हणजे मागील चार पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.ही जरी समाधानकारक बाब असली तरी यात कर्जदार शेतकºयांचे सर्वाधिक प्रमाण आहे. तर स्वत:हून पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्या तुलनेत फार कमी आहे.यंदा जिल्ह्यातील एकूण ६९ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यात ६३ हजार ४१२ शेतकरी हे कर्जदार गटातील असून ५ हजार ८९० शेतकरी बिगर कर्जदार गटातील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी एकूण ३८ हजार ६६९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला असून विमा हप्त्यापोटी १४ कोटी १७ लाख ६२ हजार २५७ रुपये विमा कंपन्याकडे भरले आहेत.पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँक अपयशीशासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा, राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांना २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र जिल्हा आणि ग्रामीण बँका वगळता राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्ट गाठण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ४० टक्केच पीक कर्जाचे वाटप केले. त्यामुळे नाबार्डकडून पुढील वर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.विमा कंपन्यांचा अनुभव वाईटजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा कंपन्याबाबत वाईट अनुभव आहे. त्यामुळेच कृषी विभागाच्या व्यापक जनजागृतीनंतरही शेतकरी स्वत:हून पीक विमा काढण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य केले असल्याने शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र स्वत:हून विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही अजूनही विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी