शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील १८२ शेतकरी विद्युत मीटरच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 3, 2014 23:39 IST

तालुक्यातील जवळपास १८२ शेतकरी गेल्या दिड वर्षापासून शेतात वीजमीटर लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जाते.

दिलीप चव्हाण - गोरेगावतालुक्यातील जवळपास १८२ शेतकरी गेल्या दिड वर्षापासून शेतात वीजमीटर लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत.विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी पंपाने मुबलक पाणी मिळावे म्हणून विद्युत मीटर लावून देण्याचे निकष आहे. यासाठी ६ हजार ६०० रुपये डिमांड म्हणून विद्युत वितरण कंपनीकडे जमा करावे लागते. या विद्युत मीटरसाठी कटंगी, कुऱ्हाडी, पाथरी, गोरेगाव, झांजिया, दवडीपार, मोहाळी, तिल्ली, गौरीटोला, पालेवाडा, पलखेडा, मुरदोली, गणखैरा, बोरगाव, सुकपूर, हिरापूर, कालीमाटी, आंबेतलाव व इतर काही गावातील १८२ शेतकऱ्यांनी विद्युत मीटरसाठी डिमांड भरून रितसर अर्ज केले आहे. मात्र दिड वर्षाचा कालावधी लोटूनही विद्युत वितरण कंपनीने त्या शेतकऱ्यांना विद्युत मीटरची जोडणी केलेली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात मीटरची जोडणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तालुक्यात चार हजार हेक्टरमध्ये रब्बी पीक, २४ हजार हेक्टरमध्ये खरीप पीक घेतले जाते. यातील तीन हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तर तीन हजार ५०० हेक्टर शेतजमीन सरंक्षित ओलिताखाली येते. तालुक्यातील बहुतेक शेतकरी रब्बी पिकात चना, उळीद, गहू, बाजरी, धान, तुळ या कडधान्यांची लागवड करतात. रब्बी पीक उन्हाळ्यात घेताना पाण्याची गरज भासते. यासाठी शेतकरी डिझेल पाणीपंप लावून शेताला पाणी पुरवितो. मात्र यामुळे शेतकऱ्याला अधिकचा भुर्दंड सहन करावा लागतो. शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन पातळीवर अनेक योजना आहेत. पण शासनाच्या या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही किंवा पोहचविल्या जात नाही? तालुक्यातील जागृत शेतकऱ्यांनी शासनाच्या विद्यत मीटरसाठी गेल्या दीड वर्षापासून अर्ज केले आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज पोहचली नाही. शेतकऱ्यांना विद्युत मीटर लावण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून अनुदान देण्यात येते. मात्र कृषी मंत्रालयाने फेब्रुवारी २०१३ पासून विद्युत वितरण कंपनीला अनुदान दिले नसल्यामुळे विद्युत वितरण कंपनीही हतबल झाली आहे. शेतकऱ्यांनी डिमांड भरले असून शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मीटरची जोडणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके मरणासन्न परिस्थितीत आहेत.पिकांना पाणी होत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विद्युत वितरण कंपनीविरूध्द असंतोष खदखदत आहे. शेतकऱ्यांना स्वस्तात वीज उपलब्ध करण्यासाठी २.१० पैसे युनिटचे दर विद्युत वितरण कंपनीने आखले आहे. यापैकी ५४ पैसे शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडे भरावे लागते तर उर्वरीत पैसे कृषी मंत्रालय विद्युत वितरण कंपनीकडे भरते.शासनाच्या विविध योजना असल्या तरी त्या योजनांची अंमलबजावणी वेळेवर होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांत आणखीनच वाढ होत आहे.