शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

तालुक्यातील १८२ शेतकरी विद्युत मीटरच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 3, 2014 23:39 IST

तालुक्यातील जवळपास १८२ शेतकरी गेल्या दिड वर्षापासून शेतात वीजमीटर लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जाते.

दिलीप चव्हाण - गोरेगावतालुक्यातील जवळपास १८२ शेतकरी गेल्या दिड वर्षापासून शेतात वीजमीटर लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत.विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी पंपाने मुबलक पाणी मिळावे म्हणून विद्युत मीटर लावून देण्याचे निकष आहे. यासाठी ६ हजार ६०० रुपये डिमांड म्हणून विद्युत वितरण कंपनीकडे जमा करावे लागते. या विद्युत मीटरसाठी कटंगी, कुऱ्हाडी, पाथरी, गोरेगाव, झांजिया, दवडीपार, मोहाळी, तिल्ली, गौरीटोला, पालेवाडा, पलखेडा, मुरदोली, गणखैरा, बोरगाव, सुकपूर, हिरापूर, कालीमाटी, आंबेतलाव व इतर काही गावातील १८२ शेतकऱ्यांनी विद्युत मीटरसाठी डिमांड भरून रितसर अर्ज केले आहे. मात्र दिड वर्षाचा कालावधी लोटूनही विद्युत वितरण कंपनीने त्या शेतकऱ्यांना विद्युत मीटरची जोडणी केलेली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात मीटरची जोडणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तालुक्यात चार हजार हेक्टरमध्ये रब्बी पीक, २४ हजार हेक्टरमध्ये खरीप पीक घेतले जाते. यातील तीन हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तर तीन हजार ५०० हेक्टर शेतजमीन सरंक्षित ओलिताखाली येते. तालुक्यातील बहुतेक शेतकरी रब्बी पिकात चना, उळीद, गहू, बाजरी, धान, तुळ या कडधान्यांची लागवड करतात. रब्बी पीक उन्हाळ्यात घेताना पाण्याची गरज भासते. यासाठी शेतकरी डिझेल पाणीपंप लावून शेताला पाणी पुरवितो. मात्र यामुळे शेतकऱ्याला अधिकचा भुर्दंड सहन करावा लागतो. शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन पातळीवर अनेक योजना आहेत. पण शासनाच्या या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही किंवा पोहचविल्या जात नाही? तालुक्यातील जागृत शेतकऱ्यांनी शासनाच्या विद्यत मीटरसाठी गेल्या दीड वर्षापासून अर्ज केले आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज पोहचली नाही. शेतकऱ्यांना विद्युत मीटर लावण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून अनुदान देण्यात येते. मात्र कृषी मंत्रालयाने फेब्रुवारी २०१३ पासून विद्युत वितरण कंपनीला अनुदान दिले नसल्यामुळे विद्युत वितरण कंपनीही हतबल झाली आहे. शेतकऱ्यांनी डिमांड भरले असून शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मीटरची जोडणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके मरणासन्न परिस्थितीत आहेत.पिकांना पाणी होत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विद्युत वितरण कंपनीविरूध्द असंतोष खदखदत आहे. शेतकऱ्यांना स्वस्तात वीज उपलब्ध करण्यासाठी २.१० पैसे युनिटचे दर विद्युत वितरण कंपनीने आखले आहे. यापैकी ५४ पैसे शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडे भरावे लागते तर उर्वरीत पैसे कृषी मंत्रालय विद्युत वितरण कंपनीकडे भरते.शासनाच्या विविध योजना असल्या तरी त्या योजनांची अंमलबजावणी वेळेवर होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांत आणखीनच वाढ होत आहे.