शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

१४६ गावातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:56 IST

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांकडे दुर्लक्ष : ४ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनातर्फे अद्यापही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गावकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. मात्र मागील वर्षीे केवळ सरासरीच्या ९३० मि.मी.पावसाची नोंद झाली. यावर्षी तापमानातही प्रचंड वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर होत आहे. भूजल सर्वेक्षण व जि.प.पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यात केलेल्या तीसºया टप्प्याच्या सर्वेक्षणात भूजल पातळीत एक ते दीड मीटरने घट झाली असल्याचे आढळले.परिणामी विहिरी आणि बोअरवेलची पाण्याची पातळी अंत्यत खोल गेली आहे. तर काही गावातील विहिरी आणि बोअरवेल सुध्दा कोरड्या पडल्याने गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही गावातील बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची भल्या पहाटेपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र आहे.जि.प.पाणी पुरवठा विभागाने एप्रिल ते जून महिन्या दरम्यानचा एकूण ३९८ गावांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार १२६ गावे आणि २६ वाड्यांमध्ये सध्या पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे.या गावांमधील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ९३ लाख रुपयांच्या विविध उपाय योजनांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात १३६ नवीन बोअरवेलचे खोदकाम, ३६ गावातील नळ योजनांची दुरूस्ती, ९६२ बोअरवेलची दुरूस्ती, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १९ गावातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन केले आहे. पाणी टंचाई निवारणार्थ एकूण १५४० उपाय योजना राबविण्यात येणार आहे. मात्र अद्यापही या उपाय योजना राबविण्यास जि.प.पाणी पुरवठा विभागाने सुरूवात केली नाही. त्यामुळे गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.उपाययोजना कागदावरचजिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर दुसरीकडे जि.प.पाणी पुरवठा विभाग टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्याचा दावा करीत आहे.मात्र गावकºयांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याने प्रशासनाच्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.चार दिवसानंतर सोडणार पाणीगोंदिया शहरवासीयांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सोमवारी (दि.१५) महाराष्टÑ जीवन प्राधिकरण आणि सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाची पाहणी केली. त्यानंतर चार दिवसांनी पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत सोडले जाणार आहे.पाच कोटी रुपयांची तरतूद पण खर्च किती?जिल्हा प्रशासनाने यंदा जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ४ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र अद्यापही बºयाच गावांमधील बोअरवेल आणि नळ योजना बंद पडल्या आहे. त्यामुळे तरतूद केलेल्या निधीपैकी नेमका किती निधी आतापर्यंत खर्च करण्यात आला याची माहिती मात्र या विभागाकडे नाही.ग्रामीण भागासह शहरवासीयांवर संकटजिल्ह्यातील केवळ ग्रामीण भागावरच पाणी टंचाईचे संकट नसून गोंदिया शहरावर सुध्दा पाणी टंचाईचे संकट कायम आहे. गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाºया डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून केवळ चार दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे चार दिवसानंतर शहरवासीयांना सुध्दा पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई