शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

१४६ गावातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:56 IST

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांकडे दुर्लक्ष : ४ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनातर्फे अद्यापही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गावकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. मात्र मागील वर्षीे केवळ सरासरीच्या ९३० मि.मी.पावसाची नोंद झाली. यावर्षी तापमानातही प्रचंड वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर होत आहे. भूजल सर्वेक्षण व जि.प.पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यात केलेल्या तीसºया टप्प्याच्या सर्वेक्षणात भूजल पातळीत एक ते दीड मीटरने घट झाली असल्याचे आढळले.परिणामी विहिरी आणि बोअरवेलची पाण्याची पातळी अंत्यत खोल गेली आहे. तर काही गावातील विहिरी आणि बोअरवेल सुध्दा कोरड्या पडल्याने गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही गावातील बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची भल्या पहाटेपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र आहे.जि.प.पाणी पुरवठा विभागाने एप्रिल ते जून महिन्या दरम्यानचा एकूण ३९८ गावांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार १२६ गावे आणि २६ वाड्यांमध्ये सध्या पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे.या गावांमधील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ९३ लाख रुपयांच्या विविध उपाय योजनांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात १३६ नवीन बोअरवेलचे खोदकाम, ३६ गावातील नळ योजनांची दुरूस्ती, ९६२ बोअरवेलची दुरूस्ती, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १९ गावातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन केले आहे. पाणी टंचाई निवारणार्थ एकूण १५४० उपाय योजना राबविण्यात येणार आहे. मात्र अद्यापही या उपाय योजना राबविण्यास जि.प.पाणी पुरवठा विभागाने सुरूवात केली नाही. त्यामुळे गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.उपाययोजना कागदावरचजिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर दुसरीकडे जि.प.पाणी पुरवठा विभाग टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्याचा दावा करीत आहे.मात्र गावकºयांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याने प्रशासनाच्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.चार दिवसानंतर सोडणार पाणीगोंदिया शहरवासीयांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सोमवारी (दि.१५) महाराष्टÑ जीवन प्राधिकरण आणि सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाची पाहणी केली. त्यानंतर चार दिवसांनी पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत सोडले जाणार आहे.पाच कोटी रुपयांची तरतूद पण खर्च किती?जिल्हा प्रशासनाने यंदा जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ४ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र अद्यापही बºयाच गावांमधील बोअरवेल आणि नळ योजना बंद पडल्या आहे. त्यामुळे तरतूद केलेल्या निधीपैकी नेमका किती निधी आतापर्यंत खर्च करण्यात आला याची माहिती मात्र या विभागाकडे नाही.ग्रामीण भागासह शहरवासीयांवर संकटजिल्ह्यातील केवळ ग्रामीण भागावरच पाणी टंचाईचे संकट नसून गोंदिया शहरावर सुध्दा पाणी टंचाईचे संकट कायम आहे. गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाºया डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून केवळ चार दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे चार दिवसानंतर शहरवासीयांना सुध्दा पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई