शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहूसाठी १० हजार प्रतिहेक्टरी कर्ज

By admin | Updated: May 11, 2014 00:27 IST

खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्‍या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्‍या शेतकर्‍याला अभय मिळते.

रावणवाडी : खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्‍या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्‍या शेतकर्‍याला अभय मिळते. परंतु सध्याच्या धोरणात बँकांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्ज देण्याऐवजी ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहू प्रतिहेक्टरी १० हजार रूपये कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने नवीनच संकट शेतकर्‍यांवर ओढवले आहे. सन २०१३ ते १४ या वर्षात नवीन धोरणाचा उपयोग करण्यात येत असल्याने शेतकरी आल्यापावली बँकेच्या दारातून परतला आहे. पूर्वीचे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पावसामुळे धानाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. मृगाचा हंगाम केवळ महिनाभर येऊन ठेपला आहे. बँकांची मदत घेऊन नव्या दमाने धान उत्पादन करू, असा आशावाद त्यांना होता. परंतु या धोरणाने त्यांच्या आशेवरच पूर्णत: पाणी फेरले. परिसरात काही शेतकर्‍यांनी जमीन कसण्याची उगीचच कटकट म्हणून जमिनी कवडीमोल भावात विकण्याचा सपाटा सुरू केला. काही दलालांच्या टोळ्या गावागावांत शेतकर्‍यांच्या दारात पोहचत असल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांचा कल हक्काचा व नगदी रोजगाराकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे बँकेने सरसकट कर्ज देवून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. बँकेचे कर्ज, सावकाराची मदत आणि सरकारचे धोरण शेतकर्‍यांपर्यंत वेळेवर पोहचले नसल्याने मागील वर्षी जिल्ह्यातील एकूण पेरणीयुक्त जमिनीपैकी २४ हजार २९० हेक्टर जमीन पडीत राहिली. शेतकर्‍यांनी शेती करण्यासाठी कायमचा रामराम ठोकला. काहींनी शहरात धाव घेऊन मिळेल तो व्यवसाय स्वीकारला. भूमाफियांना मात्र या संधीचे सोने केले. (वार्ताहर)