शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहूसाठी १० हजार प्रतिहेक्टरी कर्ज

By admin | Updated: May 11, 2014 00:27 IST

खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्‍या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्‍या शेतकर्‍याला अभय मिळते.

रावणवाडी : खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्‍या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्‍या शेतकर्‍याला अभय मिळते. परंतु सध्याच्या धोरणात बँकांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्ज देण्याऐवजी ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहू प्रतिहेक्टरी १० हजार रूपये कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने नवीनच संकट शेतकर्‍यांवर ओढवले आहे. सन २०१३ ते १४ या वर्षात नवीन धोरणाचा उपयोग करण्यात येत असल्याने शेतकरी आल्यापावली बँकेच्या दारातून परतला आहे. पूर्वीचे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पावसामुळे धानाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. मृगाचा हंगाम केवळ महिनाभर येऊन ठेपला आहे. बँकांची मदत घेऊन नव्या दमाने धान उत्पादन करू, असा आशावाद त्यांना होता. परंतु या धोरणाने त्यांच्या आशेवरच पूर्णत: पाणी फेरले. परिसरात काही शेतकर्‍यांनी जमीन कसण्याची उगीचच कटकट म्हणून जमिनी कवडीमोल भावात विकण्याचा सपाटा सुरू केला. काही दलालांच्या टोळ्या गावागावांत शेतकर्‍यांच्या दारात पोहचत असल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांचा कल हक्काचा व नगदी रोजगाराकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे बँकेने सरसकट कर्ज देवून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. बँकेचे कर्ज, सावकाराची मदत आणि सरकारचे धोरण शेतकर्‍यांपर्यंत वेळेवर पोहचले नसल्याने मागील वर्षी जिल्ह्यातील एकूण पेरणीयुक्त जमिनीपैकी २४ हजार २९० हेक्टर जमीन पडीत राहिली. शेतकर्‍यांनी शेती करण्यासाठी कायमचा रामराम ठोकला. काहींनी शहरात धाव घेऊन मिळेल तो व्यवसाय स्वीकारला. भूमाफियांना मात्र या संधीचे सोने केले. (वार्ताहर)