शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

‘त्या’ १३ मजुरांनी पायीच गाठले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

पहाटेला निघालेल्या त्या १३ मजुरांना काही अंतरावर ट्रॅक्टर मिळाला. त्यांनी काही अंतर ट्रॅक्टर बसून प्रवास केला. रस्त्यामध्ये भेटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून प्रवास करताना वाहनांची सोय करून दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे त्यांना रात्र झाली. एका सभ्य नागरिकास पायी-पायी जाताना ते १३ मजूर दिसून आले. त्या सुज्ञ गृहस्थाने मोठ्या आस्थेनी विचारपूस करून त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली.

ठळक मुद्देअसह्य वेदना मात्र गावाची ओढ : स्वत:च्या घरात अलगीकरण, लॉकडाऊनचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी (पिंपळगाव) येथील मजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी १३ मजूर नागपूर जिल्ह्यातील मौदा परिसरात वीस दिवसांपूर्वी गेले होते. अशातच लॉकडाऊन करून संचारबंदी करण्यात आली. गावाला परत कसे जाणार याची चिंता त्यांना सतावू लागली. कुटुंबाच्या आठवणीने मन विचलीत होऊ लागले. अशात त्या १३ मजुरांनी संकल्प करून रविवारला (दि.५) पहाटे ३ वाजता परसाळ (गुंथारा) गावातून स्वगावी येण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. रात्रंदिवस पायी चालून सोमवारी त्यांनी आपले गाव गाठले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खांबी येथील मजूर गावात रोजगार नाही म्हणून काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील परसाळ (गुंथारा) येथे गहू कापणीच्या कामासाठी गेले होते.मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी १३ मजूर गाव सोडून शेकडो किमी अंतरावर राबण्यासाठी गेले होते. गावातून गेलेल्या त्या मजुरांनी त्या ठिकाणी काही दिवस गहू कापणीचे काम सुद्धा केले.अशातच जिवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करून संचारबंदी करण्यात आली. शासनाने जिथे आहात तिथेच थांबा असे आदेश सर्वत्र धडकले. कोरोना विषाणूची अनेकांनी चांगलीच धास्ती घेतली. खांबीवरून रोजगारासाठी गेलेल्या त्या १३ मजुरांना घराची ओढ लागली. मुलाबाळांच्या भवितव्याची चिंता मनोमन सतावू लागली. काही झाले तरी आता आपण आपल्या गावाला जावून कुटुंबासोबत राहायचे असा त्यांनी संकल्प केला. मौदा तालुक्यातील परसाळ या गावावरून रविवारी (दि.५) पहाटे ३ वाजता आपले सामान डोक्यावर घेऊन गावाला येण्यासाठी पायी-पायीच निघाले.पहाटेला निघालेल्या त्या १३ मजुरांना काही अंतरावर ट्रॅक्टर मिळाला. त्यांनी काही अंतर ट्रॅक्टर बसून प्रवास केला. रस्त्यामध्ये भेटलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून प्रवास करताना वाहनांची सोय करून दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे त्यांना रात्र झाली. एका सभ्य नागरिकास पायी-पायी जाताना ते १३ मजूर दिसून आले. त्या सुज्ञ गृहस्थाने मोठ्या आस्थेनी विचारपूस करून त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली.सावरबांधच्या बस स्थानकात त्यांनी थोडा विश्रांती घेतली. सोमवारी (दि.५) पहाटेच्या ४ वाजता चान्ना बाक्टी या गावात त्यांनी प्रवेश केला.या सर्व १३ मजुरांची नोंदणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी करून त्यांची प्राथमिक तपासणी करून मार्गदर्शन केले. त्यांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला. लोकमत प्रतिनिधीने खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर, पोलीस पाटिल नेमीचंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधून त्या मजुरांना गावी नेण्यासाठी व्यवस्था करण्यासंबधी चर्चा केली. सकाळी १० वाजता त्यांनी स्वगावी खांबी येथे नेवून जि.प.शाळेत तात्पुरती व्यवस्था करून त्या सर्वांना जेवण दिले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी सुद्धा भेट देऊन त्यांना घराबाहेर निघू नका असा हितोपदेश केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या