शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

१.२५ लाख विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

By admin | Updated: January 25, 2017 01:29 IST

विद्यार्थ्यांची गळती होऊ नये यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना आखली.

पाच कोटींचे बिल प्रलंबित : दोन महिन्यांपासून आहार नाही गोंदिया : विद्यार्थ्यांची गळती होऊ नये यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना आखली. मात्र गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नोव्हेंबरच्या २० तारखेपासून पोषण आहारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी मुख्याध्यापकांनी पर्यायी व्यवस्था केली. परंतु अनेक ठिकाणी पोषण आहार वाटपच झाला नाही. परिणामी मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सुमारे १.२५ लाख विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात २५९ खासगी अनुदानीत शाळा तर जिल्हा परिषदेच्या १०९९ शाळा आहेत. यात वर्ग १ ते ५ पर्यंतचे ७३ हजार ९२५ विद्यार्थी तर वर्ग ६ ते ८ पर्यंतचे ५१ हजार १५० विद्यार्थी असे एकूण १ लाख २५ हजार ७५ विद्यार्थी आहेत. त्यांना शासनाकडून मध्यान्ह भोजन दिले जाते. परंतु मध्यान्ह भोजनासाठी पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार २० नोव्हेंबर नंतर दिलाच नसल्याने या १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना मागील दोन महिन्यांपासून मध्यान्ह भोजनापासून वंचित रहावे लागत आहे. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंन्झुमर फेडरेशन लिमीटेड मुंबईतर्फे हा शालेय पोषण आहार पुरवठा केला जातो. शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेने २० नोव्हेंबर पर्यंतचा शालेय पोषण आहार जिल्ह्यातील शाळांना पुरविला होता. परंतु त्यानंतरचा शालेय पोषण आहार ७० टक्के शाळांमध्ये अजुनही आलेला नाही. त्यामुळे मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी दुर असल्याची माहिती आहे. शैक्षणिक सत्र २०१६-१७ मधील जुन-जुलै, आॅगस्ट-सप्टेंबर, आॅक्टोबर-नोव्हेंबर हे तीन बिल ५ कोटींच्या घरात असून शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या यंत्रणेने बिलही सादर केले नाही. किंवा बिल काढण्याचे पत्र शासनाने ही दिले नाही. शासन व पोषण आहार पुरविणाऱ्या यंत्रणेच्या वादात विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनापासून वंचित रहावे लागत आहे. पुरवठादाराने बिल सादर करावे यासंदर्भात शिक्षण विभागाकडून ३ ते ४ वेळा पत्र देण्यात आले. परंतु त्यावर पुरवठादारांची काही प्रतिक्रीया आली नाही. पुरवठादारांनी १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळांना पोषण आहार पुरवठा सुरू केला आहे. आतापर्यंत फक्त ३० टक्के शाळांना पोषण आहार गेला आहे. परंतु जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना पोषण आहार पुरवठा करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिना लागेल, अशी माहिती आहे.(तालुका प्रतिनिधी) २८ नोव्हेंबरला केली होती मागणी शिक्षण विभागाने पोषण आहार पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराला २८ नोव्हेंबरला पत्र दिले होते. पत्र दिल्याच्या २० दिवसांच्या आत शालेय पोषण आहार सर्व शाळांना पुरविणे अपेक्षीत होते. परंतु कंत्राटदाराने बॉँडवर लिहिलेल्या अटी-शर्तीप्रमाणे काम केले नाही. मुख्याध्यापक काढणार बोगस बिल शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांसाठी आला नाही. तरी कुणीही विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित राहू नये. म्हणून शिक्षण विभागाने सर्व पंचायत समित्यांना पत्र देऊन मध्यान्ह भोजनाची पर्यायी व्यवस्था आपल्या स्तरावर करावी. असे पत्र मुख्याध्यापकांना देण्यास सांगितले. पर्यायी व्यवस्थेतून लागलेल्या अन्नाचे पैसे पुरवठादाराच्या हिस्स्यातून देण्यात येणार आहे. ज्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजन देण्यात आले नाही. त्या शाळेचे मुख्याध्यापक बोगस बिल जोडून पैसे काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन कोटी ८६ लाख आले शालेय पोषण आहारासाठी वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाने ९३ लाख ८६ हजार तर राज्य सरकारने ६२ लाख ३६ हजार, वर्ग ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने ७७ लाख ८६ हजार तर राज्य सरकारने ५१ लाख ९२ हजार असे एकूण दोन कोटी ८६ लाख रुपये दिले आहे.