शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

१२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यासर्वांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नमुने निगेटीव्ह आढळले.

ठळक मुद्देआतापर्यंत १७ जणांचे नमुने निगेटिव्ह : ५७४ व्यक्ती निगरानीत, पालावरील नागरिकांचे सर्वेक्षण केले सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात परदेशातून व बाहेर राज्यातून येणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यात २२२ प्रवाशी विदेशातून जिल्ह्यात आले होते. तर त्यांच्या संपर्कात एकूण ९४५ व्यक्ती आढळून आल्या होता. यापैकी १२२ प्रवाशांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी मंगळवारी (दि.३१) संपला. त्यामुळे आता १०० विदेशी प्रवाशी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या ४७४ जण अशा एकूण ५७४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्या प्रशासनाच्या देखरेखखाली आहेत.जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यासर्वांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नमुने निगेटीव्ह आढळले. तर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण १८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १७ नमुने निगेटीव्ह तर केवळ १ जणांचा नमुना पाझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण विदेशातून २२२ प्रवाशी आले तर त्यांच्या संपर्कात ९४५ जण आले होते. मात्र यापैकी १२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी ३१ मार्च रोजी संपला.त्यामुळे आता केवळ १०० विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेले ४७४ अशा एकूण ५७४ जणांंना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर प्रशासनाची नजर आहे. विशेष मागील पाच दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण अथवा संशयीत रुग्ण आढळून आला आहे. मात्र प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.केटीएसमध्ये शंभर खाटांचे कक्ष सज्जराज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. मंगळवारी हा आकडा ३०२ वर पोहचला.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात शंभर खाटांचे विशेष कक्षाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.इतर राज्य व जिल्ह्यातून परतले ९ हजार नागरिककोरोनामुळे देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योग धंदे बंद पडल्याने रोजगारासाठी इतर जिल्ह्यात व राज्यात गेलेले मजूर व कामगार आपल्या जिल्ह्यात परतत आहे. ३१ मार्चपर्यंत एकूण ९०१३ जण आलेले आहेत. तर विदेशातून २२२ जण परतले आहे. या सर्वांवर प्रशासनाने नजर ठेवली आहे.पोलिसांनी उचलली कठोर पाऊलेलॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र यानंतरही नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुध्दा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा फास आवळला असून त्यांना आता प्रसाद देण्यास सुरूवात केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस