शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
3
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
4
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
5
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
6
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
7
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
8
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
9
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
10
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

२५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:46 AM

मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देकीडरोगामुळे झाले होते नुकसान : पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.आमगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली होती.सुरूवातीला या पिकांना पावसाचा व त्यानंतर कीडरोगाचा फटका बसला. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमविण्याची पाळी आली होती. कीडरोगांमुळे हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचे संकट ओढवले. बँकेतून व उधार उसनवारी करुन शेतकऱ्यांनी खरीपात पिकांची लागवड केली होती. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे यावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. कीडरोगांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याचीच दखल आ. सजंय पुराम यांनी या दोन्ही तालुक्यातील कीडरोगांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला. शेतकऱ्यांना नुकसान भरापाई मिळावी, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी १० लाख ५९ हजार २२६ रूपयांचा निधी मंजूर केला. याचा लाभ आमगाव तालुक्यातील १४ हजार ४३ शेतकऱ्यांना तर सालेकसा तालुक्यातील ११ हजार ४८९ शेतकऱ्यांना मिळणार आहे. नुकसान भरपाईपोटी मंजुर झालेल्या निधी तहसील कार्यालयातंर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. हंगामाला सुरूवात झाली असून नुकसान भरपाईच्या रक्कमेचे वाटप लवकर होणार का याकडे लक्ष आहे.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशीकमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने सुध्दा याची दखल घेत १२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आ.संजय पुराम यांनी सांगितले.