शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१११ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित

By admin | Updated: April 3, 2017 01:42 IST

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन

पत्रपरिषद : कैलाश डोंगरे यांचा आरोप गोंदिया : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन हे कारण पुढे करून कोषागार अधिकाऱ्यांनी परत पाठविल्याचा आरोप संस्थाध्यक्ष कैलाश डोंगरे यांनी पत्रपरिषदेत केला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष कैलाश डोंगरे यांच्यासह संचालक सूर्यकांत डोंगरे व शैलेंद्र डोंगरे उपस्थित होते. डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेद्वारे आॅनलाईन प्रवेश अर्ज मागवून गुणानुक्रमे प्रत्येक महाविद्यालयाला शीट अलॉट केल्या जातात. प्रवेश क्षमतेच्या ८० टक्के जागा शासकीय कोट्यातून कॅप राऊंडद्वारे भरल्या जातात. यात ८० टक्के जागा न भरल्या गेल्यास शिल्लक जागा प्रवेश प्रक्रिया नियमावलीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेच्या दिलेल्या तारखेनुसार महाविद्यालयीन स्तरावर भरल्या जातात. त्यांना स्पॉट राऊंड नाव दिले जाते व त्यांना अलॉटमेंट लेटरदेखील मिळतो. यात सन २००९-१० पासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०१२-१३ पर्यंत शासन नियमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती. परंतु २०१२-१३ च्या मार्च महिन्यात जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे रूजू झाल्यानंतर त्यांनी स्पॉट राऊंडमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही म्हणून फार्म समाजकल्याण आयुक्त यांना परत पाठविले. परंतु राज्याच्या इतर जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या कृषी महाविद्यालयांना स्पॉट राऊंडमध्ये शिष्यवृत्ती मिळत होती. तोच आधार गोंदिया जिल्ह्याला देखील लागू होईल, अशी धारणा होती. मात्र जिल्हा कोषागार अधिकारी शासकीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून स्पॉट राऊंड म्हणजे महाविद्यालयाने स्वत:च्या जागा भरण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला, असे गृहित धरून त्यांची शिष्यवृत्ती नाकारत आहेत, असा आरोप कैलाश डोंगरे यांनी केला. याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी नेमाडे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय (इबीसी-२०१५/प्र.क्र. ४६/शिक्षण-१, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई, दिनांक ३० मार्च २०१५) पाठवून सदर बाबीचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. या शासन निर्णयानुसार, राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेतून अथवा शासनाच्या सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील. मात्र सदर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अशा प्रवेशांंना प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिली असली तरी या योजनेचा लाभ होणार नाही, असे आहे. तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कार्यतर मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित विद्यालय/ महाविद्यालयामधील शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना लागू राहील, असे आहे. या प्रकारामुळे सर्वत्र सावळा गोंधळ असून विद्यार्थी मात्र संभ्रमात पडले आहेत. मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन म्हणून नाकारण्यात आल्याने त्यांच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. आता संस्था, समाजकल्याण विभाग व कोषागार अधिकारी कोणता निर्णय घेतात की न्यायालय स्तरावर लढा दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)