शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

१११ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित

By admin | Updated: April 3, 2017 01:42 IST

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन

पत्रपरिषद : कैलाश डोंगरे यांचा आरोप गोंदिया : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन हे कारण पुढे करून कोषागार अधिकाऱ्यांनी परत पाठविल्याचा आरोप संस्थाध्यक्ष कैलाश डोंगरे यांनी पत्रपरिषदेत केला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष कैलाश डोंगरे यांच्यासह संचालक सूर्यकांत डोंगरे व शैलेंद्र डोंगरे उपस्थित होते. डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेद्वारे आॅनलाईन प्रवेश अर्ज मागवून गुणानुक्रमे प्रत्येक महाविद्यालयाला शीट अलॉट केल्या जातात. प्रवेश क्षमतेच्या ८० टक्के जागा शासकीय कोट्यातून कॅप राऊंडद्वारे भरल्या जातात. यात ८० टक्के जागा न भरल्या गेल्यास शिल्लक जागा प्रवेश प्रक्रिया नियमावलीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेच्या दिलेल्या तारखेनुसार महाविद्यालयीन स्तरावर भरल्या जातात. त्यांना स्पॉट राऊंड नाव दिले जाते व त्यांना अलॉटमेंट लेटरदेखील मिळतो. यात सन २००९-१० पासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०१२-१३ पर्यंत शासन नियमानुसार शिष्यवृत्ती मिळत होती. परंतु २०१२-१३ च्या मार्च महिन्यात जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे रूजू झाल्यानंतर त्यांनी स्पॉट राऊंडमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही म्हणून फार्म समाजकल्याण आयुक्त यांना परत पाठविले. परंतु राज्याच्या इतर जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या कृषी महाविद्यालयांना स्पॉट राऊंडमध्ये शिष्यवृत्ती मिळत होती. तोच आधार गोंदिया जिल्ह्याला देखील लागू होईल, अशी धारणा होती. मात्र जिल्हा कोषागार अधिकारी शासकीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून स्पॉट राऊंड म्हणजे महाविद्यालयाने स्वत:च्या जागा भरण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला, असे गृहित धरून त्यांची शिष्यवृत्ती नाकारत आहेत, असा आरोप कैलाश डोंगरे यांनी केला. याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी नेमाडे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय (इबीसी-२०१५/प्र.क्र. ४६/शिक्षण-१, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई, दिनांक ३० मार्च २०१५) पाठवून सदर बाबीचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. या शासन निर्णयानुसार, राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेतून अथवा शासनाच्या सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील. मात्र सदर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अशा प्रवेशांंना प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिली असली तरी या योजनेचा लाभ होणार नाही, असे आहे. तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कार्यतर मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित विद्यालय/ महाविद्यालयामधील शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना लागू राहील, असे आहे. या प्रकारामुळे सर्वत्र सावळा गोंधळ असून विद्यार्थी मात्र संभ्रमात पडले आहेत. मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील तब्बल १११ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फार्म स्पॉट अ‍ॅडमिशन म्हणून नाकारण्यात आल्याने त्यांच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. आता संस्था, समाजकल्याण विभाग व कोषागार अधिकारी कोणता निर्णय घेतात की न्यायालय स्तरावर लढा दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)