शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

१०२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त ३ पोलिसांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 14:51 IST

पोलीस चौकी अंतर्गत १०२ गावांचा समावेश आहे. यात सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या गावासाठी केवळ तीन पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी यंत्रणा सपेशल नापास झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : गावकऱ्यांच्या समस्येकडे कानाडोळा

गोंदिया : शांतता व सुरक्षितता राखण्याचे महत्त्वाचे कार्य कायद्याद्वारे पोलीस विभागाकडे असते. त्यामुळे गुन्हा व गुन्हेगार, दोन्हीचा बीमोड करता येतो. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज व मुबलक असणे गरजेचे असताना मात्र केवळ तीन पोलीस १०२ गावांना संरक्षण देण्याचा काम करतात. अशावेळी अपराधाला अंकुश लावणे कठीण होते. त्यातही छोट्याशा खोलीत पोलीस चौकी, कित्येक वर्षांपासून ‘नो चेन्ज हिच स्थिती आहे.

आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून परिचित आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला सालेकसा तालुका नेहमी विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला आहे. शासनापासून तर प्रशासनापर्यंत सर्वच स्तरावर सालेकसा तालुक्याकडे पाठ फिरविली जाते. त्यामुळे विकासाच्या रुळावर तालुका आला नाही. लोकप्रतिनिधी आपली खुर्ची वाचविण्यातच गुंग राहतात.

मागील बऱ्याच वर्षांपासून साखरीटोला येथील पोलीस स्टेशनचा प्रस्ताव धूळखात आहे. मात्र, कुणाचेही याकडे लक्ष नाही. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे पोलीस स्टेशन व्हावे, या मागणीला घेऊन प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पोहोचला. मात्र, अजूनपर्यंत प्रस्तावाचे काय झाले हे कळायला मार्ग नाही. पोलीस चौकी अंतर्गत १०२ गावांचा समावेश आहे. यात सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या गावासाठी केवळ तीन पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी यंत्रणा सपेशल नापास झाली आहे.

नागरिकांना पोलीस स्टेशनची प्रतीक्षा

एखादा अपराध घडल्यास पोलीस विभागाला सालेकसा येथून पोहोचण्यास विलंब लागतो. साधा रिपोर्ट देण्यासाठी नागरिकांना सालेकसा पोलीस स्टेशनचा दरवाजा ओलांडावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा तक्रार करण्यापेक्षा नाही दिलेली बरी, असे मानून तक्रार होत नाही. तक्रार झाली ही तरीही तपास करण्यास विलंब होतो, त्यामुळे पोलीस स्टेशनच्या अभावी नागिरक त्रस्त झाले आहेत.

शेकडोच्यावर गावे असताना केवळ तीन पोलीस, पोलीस उपनिरीक्षकांसह पाच पोलीस व एक महिला पोलिसाची आवश्यकता असताना केवळ तीन पोलिसांवर संरक्षण करण्याची जबाबदारी असल्याने त्यातही पोलीस चौकी बऱ्याचदा बंदच राहत असल्याने गुन्हेगारी, अवैध धंदे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस स्टेशन कधी होणार, प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिस