शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेतकऱ्यांचे अर्ज २८ हजार पंचनामे केवळ २१५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९१ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.खरीपात जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत हप्ता भरुन पिकांचा विमा उतविला होता. यंदा पीक परिस्थिती चांगली असल्याने भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधानाचे भाव होते.

ठळक मुद्देपीक विमा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव : तक्रार अर्जात दररोज भर, मदत मिळण्यास लागणार विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले.या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने कृषी,महसूल विभाग आणि पीक विमा कंपन्यांना दिले. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी २८ हजार शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात यावे,यासाठी विमा कंपनीकडे अर्ज केले.मात्र विमा कंपनीने आत्तापर्यंत केवळ २१५० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तयार केले आहे.परिणामी उर्वरित शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार आणि त्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९१ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.खरीपात जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत हप्ता भरुन पिकांचा विमा उतविला होता. यंदा पीक परिस्थिती चांगली असल्याने भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधानाचे भाव होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे यावर पाणी फेरल्या गेल्या. दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी करुन ठेवली होती. याच दरम्यान पाऊस झाल्याने धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड झाला. तर काही प्रमाणात धानाला कोंबे फुटली परिणामी शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत मातीमोल झाली.बºयाच शेतकऱ्यांनी बँकेतून कर्जाची उचल करुन आणि उधार उसणवारी करुन तर काहींनी पत्नीचे दागिने गहाण ठेऊन खरीपाची तयारी केली होती. धानाची विक्री करुन कर्जाची परतफेड करु असे स्वप्न शेतकरी पाहत होता.मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे हे स्वप्न सुध्दा भंगल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांनी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले.जवळपास २८ हजारावर शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीकडे अर्ज केले. कृषी विभागाने पंचनामे पूर्ण केले आहे. तर पीक विमा कंपनीचे पंचनामे होणे अद्यापही बाकी आहे. २८ हजार अर्जांपैकी आतापर्यंत केवळ २१५० शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.विमा कंपनीने प्रत्त्येक तालुक्यात एका प्रतिनिधीची नियुक्ती केली आहे.त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास मनुष्यबळ कमी पडत असल्याने पंचनामे करण्यास उशीर होत असल्याची माहिती आहे.मात्र शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या पाहता पंचनामे केव्हा होणार आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.कृषी विभागाचे पंचनामे अंतीम टप्प्यातपरतीच्या पावसामुळे धानपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेकडून युध्दपातळीवर करण्यात आले. यात एकूण १९ हजार ३८६ हेक्टरमधील धान पिकाचे नुकसान झाले आहे. यात ९ हजार ५३३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केच्यावर तर ९ हजार ८५३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. यामुळे ३२ हजार ७९८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याने यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयवाड यांनी सांगितले.तलाठी,कृषी सेवकाची मदत घेण्याचे निर्देशपीक विमा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने परतीच्या पावसामुळे धान पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास उशीर होत आहे.त्यामुळे याचा फटका पीक विमाधारक शेतकऱ्यांना बसू शकतो.हीच बाब ओळखून शासनाने पीक विमा कंपन्याना तलाठी आणि कृषी सेवकांची मदत घेऊन पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.८०७ गावातील शेतकऱ्यांना फटकागोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीचा पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील ८०७ गावातील शेतकऱ्यांना बसल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने शासनाला पाठविला आहे.मदतीसाठी ३०० कोटी रुपयांची गरजपरतीच्या पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कमी कालावधीत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी जवळपास ३०० कोटी रुपयांचा निधी लागण्याची शक्यता आहे.नुकसान भरपाई मिळण्यास तीन महिने लागणारज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढला आहे. त्या शेतकºयांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे.धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे काम सुरू असून यानंतर नुकसानीचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती