शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

मनरेगाच्या कामांचे १७ कोटी रुपये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

ग्रामपंचायत ही गाव विकासाचा कणा असते. १४ व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींचे महत्त्व अधिक वाढले आहे.मात्र मनरेगांतर्गत विकास कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींना १७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मागील तीन वर्षांपासून थकीत असल्याने ग्रामपंचायतींचा कणा मोडला आहे.

ठळक मुद्देचारशेवर ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी : प्रशासनाचे वेळकाढू धोरण, सरपंच देणार आयुक्त कार्यालावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र या कामांचे १७ कोटी ७३ लाख ३७ हजार रुपयांची देयके मागील तीन वर्षांपासून प्रलबिंत आहे. देयके न मिळाल्याने चारशेवर ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली असून काम करणारे कंत्राटदार सुध्दा अडचणीत आले आहे.मनरेगातंर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांदन रस्ते, माती वाहतूक, वृक्ष लागवडीसह इतर कुशल कामे २०१६ ते २०१९ या कालावधीत अनेक कामे करण्यात आली.यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विकास कामांचा सुध्दा समावेश होता. ग्रामपंचायतींनी शासनाने दिलेल्या मुदतीत ही सर्व कामे पूर्ण केली.या कामांमुळे हजारो मजुरांच्या हाताला कामे सुध्दा उपलब्ध झाले. शिवाय शासनाकडून सुध्दा या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. त्याचे श्रेय घेण्याची संधी सुध्दा सोडली नाही. मात्र कुशल कामे करुन सुध्दा मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील ५४८ ग्रामपंचायतपैकी चारशेवर ग्रामपंचायतींना कामाचे पैसे मिळाले नाही.मागील तीन वर्षांपासून मनरेगाकडे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे १७ कोटी ७३ लाख ३७ हजार रुपये थकीत आहेत.यामुळे ग्रामपंचायत आणि काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेची सुध्दा आर्थिक कोंडी झाली आहे.विकास कामांसाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी आपल्या जवाबदारीवर उधारीवर साहित्य खरेदी केले. मात्र मनरेगाकडून निधी न मिळाल्याने त्यांची सुध्दा चांगलीच कोंडी झाली आहे.देणेदार त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावत आहे.त्यामुळे सरपंचानी यासाठी पालकमंत्री, सीईओपासून सर्वच अधिकाऱ्यांना आत्तापर्यंत निवेदन दिले. मात्र मागील तीन वर्षांपासून त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.जिल्ह्यातील गोंदिया तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायत मनरेगाच्या थकीत निधीमुळे अडचणीत आल्या आहेत.मनरेगा आयुक्तांना विचारणार जाबग्रामपंचायत ही गाव विकासाचा कणा असते. १४ व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींचे महत्त्व अधिक वाढले आहे.मात्र मनरेगांतर्गत विकास कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींना १७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मागील तीन वर्षांपासून थकीत असल्याने ग्रामपंचायतींचा कणा मोडला आहे. त्यामुळे थकीत निधी कधी देणार याचा जाब मनरेगा आयुक्तांना विचारण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच शुक्रवारी (दि.२०) जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्त्वात नागपूर येथे धडक देणार आहेत.