शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

युवकांनी देश प्रथम संकल्पना अंगीकारावी: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2024 08:33 IST

साखळीत हर घर तिरंगा यात्रेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना देश प्रथम ही भावना वृद्धिंगत करून युवकांनी आगामी काळात देशाची धुरा सांभाळण्यासाठी आतापासूनच सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करून सर्व क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करताना देशाला वैभवच्या शिखरावर नेण्यासाठी युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्हावेली-साखळी येथे केले.

भाजप साखळी मतदारसंघ युवा मोर्चातर्फे रविवारी हर घर तिरंगा जागृती रॅलीचे आयोजन न्हावेली ती साखळी यादरम्यान करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात अनेक क्षेत्रात देशाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. 'विकसित भारत-आत्मनिर्भर भारत'साठी मोठे देशाला अधिक भक्कम करण्यास कारणीभूत ठरणारी असल्याने प्रत्येक भारतीय मनात देश प्रथम ही भावना रुजवणे गरजेचे आहे. त्याच हेतूने हर घर तिरंगा ही संकल्पना असून सर्व घटकांनी देशाच्या जडणघडणीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वतः दुचाकीवर बसून मुख्यमंत्र्यांनी न्हावेली ते साखळी दरम्यानच्या जागृती रॅलीमध्ये सहभाग घेऊन युवाशक्तीचा उत्साह वाढवला. भारत मातेचा जय जयकार करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत