शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

युवकांनी देश प्रथम संकल्पना अंगीकारावी: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2024 08:33 IST

साखळीत हर घर तिरंगा यात्रेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना देश प्रथम ही भावना वृद्धिंगत करून युवकांनी आगामी काळात देशाची धुरा सांभाळण्यासाठी आतापासूनच सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करून सर्व क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करताना देशाला वैभवच्या शिखरावर नेण्यासाठी युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्हावेली-साखळी येथे केले.

भाजप साखळी मतदारसंघ युवा मोर्चातर्फे रविवारी हर घर तिरंगा जागृती रॅलीचे आयोजन न्हावेली ती साखळी यादरम्यान करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात अनेक क्षेत्रात देशाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. 'विकसित भारत-आत्मनिर्भर भारत'साठी मोठे देशाला अधिक भक्कम करण्यास कारणीभूत ठरणारी असल्याने प्रत्येक भारतीय मनात देश प्रथम ही भावना रुजवणे गरजेचे आहे. त्याच हेतूने हर घर तिरंगा ही संकल्पना असून सर्व घटकांनी देशाच्या जडणघडणीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वतः दुचाकीवर बसून मुख्यमंत्र्यांनी न्हावेली ते साखळी दरम्यानच्या जागृती रॅलीमध्ये सहभाग घेऊन युवाशक्तीचा उत्साह वाढवला. भारत मातेचा जय जयकार करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत