शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

युवकांनी देश प्रथम संकल्पना अंगीकारावी: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2024 08:33 IST

साखळीत हर घर तिरंगा यात्रेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना देश प्रथम ही भावना वृद्धिंगत करून युवकांनी आगामी काळात देशाची धुरा सांभाळण्यासाठी आतापासूनच सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करून सर्व क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करताना देशाला वैभवच्या शिखरावर नेण्यासाठी युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्हावेली-साखळी येथे केले.

भाजप साखळी मतदारसंघ युवा मोर्चातर्फे रविवारी हर घर तिरंगा जागृती रॅलीचे आयोजन न्हावेली ती साखळी यादरम्यान करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात अनेक क्षेत्रात देशाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. 'विकसित भारत-आत्मनिर्भर भारत'साठी मोठे देशाला अधिक भक्कम करण्यास कारणीभूत ठरणारी असल्याने प्रत्येक भारतीय मनात देश प्रथम ही भावना रुजवणे गरजेचे आहे. त्याच हेतूने हर घर तिरंगा ही संकल्पना असून सर्व घटकांनी देशाच्या जडणघडणीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वतः दुचाकीवर बसून मुख्यमंत्र्यांनी न्हावेली ते साखळी दरम्यानच्या जागृती रॅलीमध्ये सहभाग घेऊन युवाशक्तीचा उत्साह वाढवला. भारत मातेचा जय जयकार करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत