शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गोव्यात वाढत्या अपघात बळींबाबत चिंता, रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 10:04 IST

गोव्यात शासकीय पातळीवरून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सोमवारी आरंभ झाला.

पणजी : गोव्यात शासकीय पातळीवरून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सोमवारी आरंभ झाला. रस्ता सुरक्षेसाठी सरकार बरेच काही करत असताना व बरीच जागृतीही विविध आघाड्यांवर होत असताना देखील वाहनांचे अपघात होत आहेत व त्यात बळीही जात आहेत याविषयी खेद वाटतो, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे रस्ता सुरक्षा सप्ताहावेळी बोलताना सांगितले. मंत्री ढवळीकर हेच सार्वजनिक बांधकाम खात्याचेही मंत्री आहेत. ढवळीकर यांच्या हस्ते बांबोळी येथी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री तथा पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंग राणे, सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, वाहतूक संचालक निखिल देसाई, डीजीपी मुक्तेश चंदर, गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे (गोमेकॉ) डीन डॉ. प्रदीप नाईक व्यासपीठावर होते.

वाहने चालविणा-यांनी वाहतूक नियमांचे पालन हे स्वत:च्या मनापासून करावे, कुणी तरी पालन करायला सांगतो म्हणून नव्हे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. लोकांनी रस्ता सुरक्षेला प्राधान्य द्यावे. सरकार रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरूच ठेवील, असेही ढवळीकर यांनी नमूद केले. रायबंदर-जुनेगोवे बायपासवर आम्ही दुचाकी चालकांसाठी स्वतंत्र लेन बांधली. त्यामुळे वाहन अपघातांचे प्रमाण 20 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यत खाली आले. अजूनही काही वाहन चालक या लेनच्या बाहेर येऊन दुचाकी हाकतात, असे ढवळीकर म्हणाले.

वाहन चालविण्याचा परवाना कुणालाही देताना कठोरपणे नियमांचे व प्रक्रियेचे पालन करायला हवे. मानवी जीवन मौल्यवान असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची सवय व्हायला हवी, असे प्रतापसिंग राणे म्हणाले. मुलांनी कितीही हट्ट धरला तरी, पालकांनी स्वत:च्या अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये, असे आवाहन आमदार सिल्वेरा यांनी केले.

युवा वर्गामध्ये रस्ता सुरक्षेविषयी गांभीर्य नाही. गोमेकॉ इस्पितळाचे डॉक्टर्स अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करतातच पण अनेकदा अपघातातील व्यक्तींना होणा-या जखमा या खूप गंभीर असतात, असे डीन डॉ. नाईक यांनी नमूद केले. अपघात रोखता येतात, असे ते म्हणाले.

हायस्कूलमध्ये शिकत असतानाच्या काळापासून मुलांनी रस्ता सुरक्षेविषयी जागृत असावे. रस्ता सुरक्षेची सवय विद्यार्थी जीवनापासूनच मुलांनी स्वत:ला लावून घ्यावी. शालेय अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहेच, तेवढेच मुलांना रस्ता सुरक्षेविषयीही शिक्षित करणे महत्त्वाचे आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे, असे मुक्तेश चंदर यांनी नमूद केले. डॉ. दयानंद राव यांनी सुत्रनिवेदन केले तर वाहतूक अधिकारी संदीप देसाई यांनी आभार मानले. दरम्यान, 83 व्यक्तींचा गेल्या जानेवारी ते 20 एप्रिलर्पयत गोव्यातील रस्त्यांवर वाहन अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. वार्षिक सरासरी तीनशे व्यक्तींचे बळी वाहन अपघातात जात आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात