शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गोव्यात वाढत्या अपघात बळींबाबत चिंता, रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 10:04 IST

गोव्यात शासकीय पातळीवरून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सोमवारी आरंभ झाला.

पणजी : गोव्यात शासकीय पातळीवरून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सोमवारी आरंभ झाला. रस्ता सुरक्षेसाठी सरकार बरेच काही करत असताना व बरीच जागृतीही विविध आघाड्यांवर होत असताना देखील वाहनांचे अपघात होत आहेत व त्यात बळीही जात आहेत याविषयी खेद वाटतो, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे रस्ता सुरक्षा सप्ताहावेळी बोलताना सांगितले. मंत्री ढवळीकर हेच सार्वजनिक बांधकाम खात्याचेही मंत्री आहेत. ढवळीकर यांच्या हस्ते बांबोळी येथी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री तथा पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंग राणे, सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, वाहतूक संचालक निखिल देसाई, डीजीपी मुक्तेश चंदर, गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे (गोमेकॉ) डीन डॉ. प्रदीप नाईक व्यासपीठावर होते.

वाहने चालविणा-यांनी वाहतूक नियमांचे पालन हे स्वत:च्या मनापासून करावे, कुणी तरी पालन करायला सांगतो म्हणून नव्हे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. लोकांनी रस्ता सुरक्षेला प्राधान्य द्यावे. सरकार रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरूच ठेवील, असेही ढवळीकर यांनी नमूद केले. रायबंदर-जुनेगोवे बायपासवर आम्ही दुचाकी चालकांसाठी स्वतंत्र लेन बांधली. त्यामुळे वाहन अपघातांचे प्रमाण 20 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यत खाली आले. अजूनही काही वाहन चालक या लेनच्या बाहेर येऊन दुचाकी हाकतात, असे ढवळीकर म्हणाले.

वाहन चालविण्याचा परवाना कुणालाही देताना कठोरपणे नियमांचे व प्रक्रियेचे पालन करायला हवे. मानवी जीवन मौल्यवान असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची सवय व्हायला हवी, असे प्रतापसिंग राणे म्हणाले. मुलांनी कितीही हट्ट धरला तरी, पालकांनी स्वत:च्या अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये, असे आवाहन आमदार सिल्वेरा यांनी केले.

युवा वर्गामध्ये रस्ता सुरक्षेविषयी गांभीर्य नाही. गोमेकॉ इस्पितळाचे डॉक्टर्स अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करतातच पण अनेकदा अपघातातील व्यक्तींना होणा-या जखमा या खूप गंभीर असतात, असे डीन डॉ. नाईक यांनी नमूद केले. अपघात रोखता येतात, असे ते म्हणाले.

हायस्कूलमध्ये शिकत असतानाच्या काळापासून मुलांनी रस्ता सुरक्षेविषयी जागृत असावे. रस्ता सुरक्षेची सवय विद्यार्थी जीवनापासूनच मुलांनी स्वत:ला लावून घ्यावी. शालेय अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहेच, तेवढेच मुलांना रस्ता सुरक्षेविषयीही शिक्षित करणे महत्त्वाचे आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे, असे मुक्तेश चंदर यांनी नमूद केले. डॉ. दयानंद राव यांनी सुत्रनिवेदन केले तर वाहतूक अधिकारी संदीप देसाई यांनी आभार मानले. दरम्यान, 83 व्यक्तींचा गेल्या जानेवारी ते 20 एप्रिलर्पयत गोव्यातील रस्त्यांवर वाहन अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. वार्षिक सरासरी तीनशे व्यक्तींचे बळी वाहन अपघातात जात आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात