शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

गोव्याचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 11:16 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  यांनी गोव्याचा 2018-19 वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्राथमिक स्वरुपाचे काम सुरू केले आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  यांनी गोव्याचा 2018-19 वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्राथमिक स्वरुपाचे काम सुरू केले आहे. येत्या महिन्यात होणा-या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यावेळी राज्याची विस्टकलेली आर्थिक घडी सावरण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडून काही घोषणा अपेक्षित आहेत. शिवाय विविध क्षेत्रांमध्ये शुल्क वाढ होण्याचीही शक्यता आहे.

गोवा सरकार सध्या आर्थिक आघाडीवर अनेक कसरती करत आहे. राज्याची आर्थिक स्थिती बळकट असल्याचा दावा सरकार करत असले तरी, प्रत्यक्षात काही मंत्री, अनेक आमदार आणि अधिकारीही राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे मान्य करतात. विकास कामांविषयीचे आमदारांचे प्रस्ताव जलदगतीने मंजू होत नाहीत. मंत्र्यांच्या फाईल्सदेखील वारंवार परत येत असतात. निधी उपलब्ध नसल्याचा शेरा कधी मुख्य सचिवांकडून तर कधी अर्थ खात्याच्या अधिका-यांकडून फाईलवर मारला जातो. यामुळे काही मंत्रीही हैराण झाले आहेत.

'आम्हाला राज्य सरकारच्या स्तरावरून निधी मिळत नाही, आम्ही केंद्र सरकारकडूनच निधी आणून सध्या कामे करत आहोत', असे एका मंत्र्याने 'लोकमत'ला सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून नेहमीच अर्थसंकल्पातून अनेक घोषणा केल्या जातात. यावेळी काही वैशिष्ट्यपूर्ण घोषणा होतील पण 50 टक्के घोषणा अंमलात येत नाहीत, असाही अनुभव येतो. राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात केली गेली होती पण ती अंमलात आली नाही.

फक्त करवाढीच्या व शुल्क वाढीच्या घोषणा तेवढ्या अंमलात आल्या. गोवा चेंबर ऑफ कॉमर्ससह, गोव्याचा पर्यटन उद्योग, खाण उद्योग, मच्छिमार उद्योग, कृषी क्षेत्र यांच्या अनेक अपेक्षा गोव्याच्या अर्थसंकल्पाकडून आहेत. खनिज व्यवसाय मंदीच्या स्थितीतून जात आहे. येत्या महिन्यात सादर होणा-या अर्थसंकल्पात या सगळ्य़ाचे प्रतिबिंब पडलेले पाहायला मिळेल असे काही अधिका-यांचे म्हणणे आहे. 

सरकारने गृह आधार योजना स्थगित केली आहे. 1 लाख 52 हजार एवढे गृह आधार योजनेचे लाभार्थी झाले आहेत. आता दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार, लाडली लक्ष्मी ह्या सगळ्याच  योजनांच्या लाभार्थीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सरकारकडून जीईएल यंत्रणोला हे काम दिले गेले आहे. सरकार लाभार्थीची संख्या कमी करू पाहत आहे. अगोदरच कल्याणकारी योजना जास्त झाल्या असून सरकारच्या तिजोरीवर भार वाढला आहे. त्यामुळे सरकार नव्या योजना राबविण्याची घोषणा येत्या अर्थसंकल्पातून करणार नाही, असे संकेत मिळतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा