शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
3
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
4
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
5
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
6
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
7
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
8
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
9
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
10
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
11
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
12
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
13
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
14
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
15
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
16
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
17
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
18
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
19
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
20
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
Daily Top 2Weekly Top 5

बदललेल्या वातावरणामुळे हिवाळा लांबणीवर पडण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 20:17 IST

पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. 

पणजी - पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. एकूणच ऋतुचक्रातच आमुलाग्र बदल व्हावा अशी परिस्थिती असून, वेळेवर मान्सुनचे आगमन, वेळेवर मान्सूनचे परतणे आणि वेळेवर देशातून हटणे या गोष्टी तर अलिकडील ८ वर्षांत झालेल्या नाहीत. वेळ चुकणे आणि तोही एक दोन दिवसांनी नव्हे तर तब्बल २० ते २५ दिवसांचा फरक पडतो आहे. विशेष करून परतीच्या मान्सूनच्या बाबतीत हा विलंब अधिकच होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे. पावसाच्या उशिरा आगमनामुळे परतणे उशिरा होते. उशिरा परतल्यामुळे गोव्यात उशिरा पोहोचतो आणि  संपूर्ण हटणेही उशिरा होते.  १ जूनला होणारे पावसाचे आगमन ८ जून नंतर होत आहे आणि १ सप्टेंबरला राजस्थानहून परतणारा पाऊस आता १५ सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू करतो. गोव्यातही उशिरा पोहोचतो आणि देशातून पूर्णपणे हटण्यासाठीही विलंब लागतो. त्यामुळे आॅक्टोबर महिना संपायला आला तरी हिंवाळा लागल्याच्या खाणाखुणाही दिसत नाहीत. हे सर्व  मान्सून पुढे सरकल्यामुळे होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे.

परतीचा पाऊस महाराष्ट्रातच महाराष्ट्रात दाखल झालेला परतीचा पाऊस अद्याप गोव्यात पोहोचला नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.  १५ आॅक्टोबर रोजी परतीचा पाऊस महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर व पश्चीम भागात पोहोचला होता. तसेच १६ ते २० आॅक्टोबरपर्यंत तो आणखी दक्षीणेला सरकून पूर्वेला तेलंगणा व इतर भागापर्यंत पोहोचला होता. गोव्यात पोहोचण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील अशी अपेक्षा आहे. मात्र या बाबत हवामान खाते काहीच अंदाज वर्तवित नाही. हवामान खात्याकडून केवळ परतीच्या पावसाच्या सामान्य तारखा आणि प्रत्यक्ष परतीचा पाऊस दाखल झालेल्या तारखा दिल्या जात. गोव्यात सामान्य तारीख आहे १ आॅक्टोबर.

टॅग्स :goaगोवाIndiaभारतNatureनिसर्ग