शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

बदलाचे वारे मणिपूरपासून सुरू; गोवा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:54 IST

आज चीनच्या सीमेवर आमच्या सैनिकांचे बलिदान जात असताना व कोविड संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना, भाजप वर्चुअल रॅली करुन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करते हे दुर्देवी आहे. 

मडगाव - लोकशाहीत लोकशक्ती व लोकभावनांना सर्वोच्च स्थान असते. हुकुमशाही व दडपशाहीचे राज्य जास्त काळ टिकत नाही. भाजपाचीही हुकूमशाही जास्त काळ टिकणार नाही. सध्या मणिपूर मधून बदलाचे वारे सुरू झाले आहे. लवकरच देशात ही बदलाची लाट येईल अशी प्रतिक्रिया गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसा निमित्त शुक्रवारी मडगावात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना कामत म्हणाले, गोमंतकीय तसेच देश व संपुर्ण जगातील लोकांनी हुकुमशहांचा अंत कसा होतो हे बघीतले आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थान मध्ये लोकांनी भाजपला जनादेशाने संदेश दिला होता परंतु भाजप नेतृत्वाने त्यातुन धडा घेतला नाही. मात्र आता मणिपूर मध्ये लोकांना खरे काय ते कळले आहे. पुर्वेकडुन बदलाचे वारे वाहू लागले असुन, हा बदल लवकरच पूर्ण देशात होणार आहे.

एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाला ज्यावेळी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत नेण्यास अपयश येते त्यावेळी इतर पक्षांतील आमदार, कार्यकर्ते फोडुन ते आपला पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करतात. भाजपने आज आपली ध्येय धोरणे पायदळी तुडवली असुन, जुमला राजकारण करुन सत्ता बळकावणे हे एकमेव धोरण आज भाजपकडे आहे. काॅंग्रेस पक्ष सामान्य माणसांच्या प्रती नेहमीच संवेदनशील राहिला असुन, त्यामुळेच आमचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आम्ही साधेपणाने व रुग्णसेवेने  साजरा करीत आहोत असे ते पुढे म्हणाले. 

काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना गोव्यातील भाजप सरकार कोविड संकट काळातही लुटमार करण्यात व्यस्त असुन, सामान्य लोकांना दिलासा देण्यास या सरकारला पुर्ण अपयश आले आहे असे सांगीतले. काॅंग्रेस पक्षाने देशावर आलेल्या संकटाचे भान ठेऊन, साधेपणाने राहुल गांधीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. भाजपला लोकांच्या हाल-अपेश्टांचे सोयर सुतक नसुन त्यांना केवळ राजकारण व सत्ता दिसते असा आरोप केला. आज चीनच्या सीमेवर आमच्या सैनिकांचे बलिदान जात असताना व कोविड संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना, भाजप वर्चुअल रॅली करुन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करते हे दुर्देवी आहे. 

विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोविड संकटामुळे तसेच भाजपकडुन म्हादई प्रश्नी गोमंतकीयांचा झालेला विश्वासघात यामुळे लोकभावनेचा आदर करुन आपला ८ मार्च रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता हे भाजपवाल्यानी लक्षात ठेवावे असा टोला गिरीश चोडणकर यांनी लावला . 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस