शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

बदलाचे वारे मणिपूरपासून सुरू; गोवा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:54 IST

आज चीनच्या सीमेवर आमच्या सैनिकांचे बलिदान जात असताना व कोविड संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना, भाजप वर्चुअल रॅली करुन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करते हे दुर्देवी आहे. 

मडगाव - लोकशाहीत लोकशक्ती व लोकभावनांना सर्वोच्च स्थान असते. हुकुमशाही व दडपशाहीचे राज्य जास्त काळ टिकत नाही. भाजपाचीही हुकूमशाही जास्त काळ टिकणार नाही. सध्या मणिपूर मधून बदलाचे वारे सुरू झाले आहे. लवकरच देशात ही बदलाची लाट येईल अशी प्रतिक्रिया गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसा निमित्त शुक्रवारी मडगावात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना कामत म्हणाले, गोमंतकीय तसेच देश व संपुर्ण जगातील लोकांनी हुकुमशहांचा अंत कसा होतो हे बघीतले आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थान मध्ये लोकांनी भाजपला जनादेशाने संदेश दिला होता परंतु भाजप नेतृत्वाने त्यातुन धडा घेतला नाही. मात्र आता मणिपूर मध्ये लोकांना खरे काय ते कळले आहे. पुर्वेकडुन बदलाचे वारे वाहू लागले असुन, हा बदल लवकरच पूर्ण देशात होणार आहे.

एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाला ज्यावेळी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत नेण्यास अपयश येते त्यावेळी इतर पक्षांतील आमदार, कार्यकर्ते फोडुन ते आपला पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करतात. भाजपने आज आपली ध्येय धोरणे पायदळी तुडवली असुन, जुमला राजकारण करुन सत्ता बळकावणे हे एकमेव धोरण आज भाजपकडे आहे. काॅंग्रेस पक्ष सामान्य माणसांच्या प्रती नेहमीच संवेदनशील राहिला असुन, त्यामुळेच आमचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आम्ही साधेपणाने व रुग्णसेवेने  साजरा करीत आहोत असे ते पुढे म्हणाले. 

काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना गोव्यातील भाजप सरकार कोविड संकट काळातही लुटमार करण्यात व्यस्त असुन, सामान्य लोकांना दिलासा देण्यास या सरकारला पुर्ण अपयश आले आहे असे सांगीतले. काॅंग्रेस पक्षाने देशावर आलेल्या संकटाचे भान ठेऊन, साधेपणाने राहुल गांधीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. भाजपला लोकांच्या हाल-अपेश्टांचे सोयर सुतक नसुन त्यांना केवळ राजकारण व सत्ता दिसते असा आरोप केला. आज चीनच्या सीमेवर आमच्या सैनिकांचे बलिदान जात असताना व कोविड संकटात लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना, भाजप वर्चुअल रॅली करुन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करते हे दुर्देवी आहे. 

विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोविड संकटामुळे तसेच भाजपकडुन म्हादई प्रश्नी गोमंतकीयांचा झालेला विश्वासघात यामुळे लोकभावनेचा आदर करुन आपला ८ मार्च रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता हे भाजपवाल्यानी लक्षात ठेवावे असा टोला गिरीश चोडणकर यांनी लावला . 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस