शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

धनगर बांधवांचे प्रश्न सोडवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:55 IST

धनगर बांधवांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: धनगर बांधवांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. वननिवासींना जमिनींचे हक्क देण्याबाबत तसेच त्यांच्या घरांच्या विषयांवर व एसटी दर्जाबाबत चर्चा करण्यात आली. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, धनगर समाजाचे नेते माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम, तसेच समाजकल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीपासून जवळजवळ दोन दशकांनंतरही राज्य सरकारने वननिवासींनी जमिनींच्या हक्कांसाठी केलेल्या एकूण १०,१३६ दाव्यांपैकी केवळ ८ टक्के दावे निकालात काढून सनदा दिलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ३१ मार्च २०२४ ची अंतिम मुदतदेखील चुकवली आहे.

गोव्यात 'अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी हक्क कायदा २००६ मध्ये लागू झाला आणि त्यानंतर राज्याने मागास समुदायाला जमिनीचे हक्क देण्याचे दावे स्वीकारण्यास सुरुवात केली. डिसेंबर २०२४ पर्यंत फक्त ८७५ दावेदारांना मालकी हक्काची कागदपत्रे मिळाली आहेत. १०,१३६ दावे बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठीची मोहीम गतिमान केली आहे. मंगळवारी घेतलेली बैठक हा याचाच एक भाग होता.

प्राप्त माहितीनुसार वननिवासींचे ९,७५७ वैयक्तिक आहेत, तर ३७९ दावे सामुदायिक दावे आहेत. आतापर्यंत सरकारने नियुक्त केलेल्या वनहक्क समितीने ६,९९७ दाव्यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन केले आहे. ग्रामसभांनी ४,७६० दाव्यांना मान्यता दिली आहे, तर उपविभागस्तरीय समितीने २,६२९ दावे मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले आहेत. जिल्हास्तरीय समितीने १,७४१ दावे मंजूर केले आहेत. कायद्याच्या तरतुदींनुसार जेव्हा वननिवासी जमिनीच्या मालकीसाठी दावा दाखल करतो तेव्हा ग्रामसभा, उपविभागीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती अशा तीन स्तरावरून जातो.

एसटी दर्जासाठी पाठपुरावा करणार

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, 'इतर राज्यांमधील धनगर समाजाचे लोक आर्थिकदृष्ट्या सधन आहेत, त्यामुळे धनगर असे म्हणून एसटी दर्जा मागितल्यास तो मिळू शकत नाही. त्यामुळे गोव्यात आम्ही या समाजाला धनगर-गवळी असे अधिसूचित केले असून आरजीआयकडे ही अधिसूचना पाठवली आहे. या गोष्टीला सव्वा वर्ष उलटले तरी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता केंद्रात पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले असून गरज पडल्यास नंतर शिष्टमंडळ नेले जाईल. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत