शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

धनगर बांधवांचे प्रश्न सोडवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:55 IST

धनगर बांधवांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: धनगर बांधवांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. वननिवासींना जमिनींचे हक्क देण्याबाबत तसेच त्यांच्या घरांच्या विषयांवर व एसटी दर्जाबाबत चर्चा करण्यात आली. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, धनगर समाजाचे नेते माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम, तसेच समाजकल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीपासून जवळजवळ दोन दशकांनंतरही राज्य सरकारने वननिवासींनी जमिनींच्या हक्कांसाठी केलेल्या एकूण १०,१३६ दाव्यांपैकी केवळ ८ टक्के दावे निकालात काढून सनदा दिलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ३१ मार्च २०२४ ची अंतिम मुदतदेखील चुकवली आहे.

गोव्यात 'अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी हक्क कायदा २००६ मध्ये लागू झाला आणि त्यानंतर राज्याने मागास समुदायाला जमिनीचे हक्क देण्याचे दावे स्वीकारण्यास सुरुवात केली. डिसेंबर २०२४ पर्यंत फक्त ८७५ दावेदारांना मालकी हक्काची कागदपत्रे मिळाली आहेत. १०,१३६ दावे बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठीची मोहीम गतिमान केली आहे. मंगळवारी घेतलेली बैठक हा याचाच एक भाग होता.

प्राप्त माहितीनुसार वननिवासींचे ९,७५७ वैयक्तिक आहेत, तर ३७९ दावे सामुदायिक दावे आहेत. आतापर्यंत सरकारने नियुक्त केलेल्या वनहक्क समितीने ६,९९७ दाव्यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन केले आहे. ग्रामसभांनी ४,७६० दाव्यांना मान्यता दिली आहे, तर उपविभागस्तरीय समितीने २,६२९ दावे मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले आहेत. जिल्हास्तरीय समितीने १,७४१ दावे मंजूर केले आहेत. कायद्याच्या तरतुदींनुसार जेव्हा वननिवासी जमिनीच्या मालकीसाठी दावा दाखल करतो तेव्हा ग्रामसभा, उपविभागीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती अशा तीन स्तरावरून जातो.

एसटी दर्जासाठी पाठपुरावा करणार

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, 'इतर राज्यांमधील धनगर समाजाचे लोक आर्थिकदृष्ट्या सधन आहेत, त्यामुळे धनगर असे म्हणून एसटी दर्जा मागितल्यास तो मिळू शकत नाही. त्यामुळे गोव्यात आम्ही या समाजाला धनगर-गवळी असे अधिसूचित केले असून आरजीआयकडे ही अधिसूचना पाठवली आहे. या गोष्टीला सव्वा वर्ष उलटले तरी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता केंद्रात पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले असून गरज पडल्यास नंतर शिष्टमंडळ नेले जाईल. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत