शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

धनगर बांधवांचे प्रश्न सोडवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:55 IST

धनगर बांधवांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: धनगर बांधवांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. वननिवासींना जमिनींचे हक्क देण्याबाबत तसेच त्यांच्या घरांच्या विषयांवर व एसटी दर्जाबाबत चर्चा करण्यात आली. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, धनगर समाजाचे नेते माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम, तसेच समाजकल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीपासून जवळजवळ दोन दशकांनंतरही राज्य सरकारने वननिवासींनी जमिनींच्या हक्कांसाठी केलेल्या एकूण १०,१३६ दाव्यांपैकी केवळ ८ टक्के दावे निकालात काढून सनदा दिलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ३१ मार्च २०२४ ची अंतिम मुदतदेखील चुकवली आहे.

गोव्यात 'अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी हक्क कायदा २००६ मध्ये लागू झाला आणि त्यानंतर राज्याने मागास समुदायाला जमिनीचे हक्क देण्याचे दावे स्वीकारण्यास सुरुवात केली. डिसेंबर २०२४ पर्यंत फक्त ८७५ दावेदारांना मालकी हक्काची कागदपत्रे मिळाली आहेत. १०,१३६ दावे बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठीची मोहीम गतिमान केली आहे. मंगळवारी घेतलेली बैठक हा याचाच एक भाग होता.

प्राप्त माहितीनुसार वननिवासींचे ९,७५७ वैयक्तिक आहेत, तर ३७९ दावे सामुदायिक दावे आहेत. आतापर्यंत सरकारने नियुक्त केलेल्या वनहक्क समितीने ६,९९७ दाव्यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन केले आहे. ग्रामसभांनी ४,७६० दाव्यांना मान्यता दिली आहे, तर उपविभागस्तरीय समितीने २,६२९ दावे मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले आहेत. जिल्हास्तरीय समितीने १,७४१ दावे मंजूर केले आहेत. कायद्याच्या तरतुदींनुसार जेव्हा वननिवासी जमिनीच्या मालकीसाठी दावा दाखल करतो तेव्हा ग्रामसभा, उपविभागीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती अशा तीन स्तरावरून जातो.

एसटी दर्जासाठी पाठपुरावा करणार

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, 'इतर राज्यांमधील धनगर समाजाचे लोक आर्थिकदृष्ट्या सधन आहेत, त्यामुळे धनगर असे म्हणून एसटी दर्जा मागितल्यास तो मिळू शकत नाही. त्यामुळे गोव्यात आम्ही या समाजाला धनगर-गवळी असे अधिसूचित केले असून आरजीआयकडे ही अधिसूचना पाठवली आहे. या गोष्टीला सव्वा वर्ष उलटले तरी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता केंद्रात पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले असून गरज पडल्यास नंतर शिष्टमंडळ नेले जाईल. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत