शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मंत्र्यांना दिलेल्या खात्यांमध्ये बदल करणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 16:33 IST

सर्व मंत्र्यांना गेल्या शुक्रवारी जी अतिरिक्त खाती दिली गेली आहे, त्यानुसारच अधिसूचना जारी होईल.

पणजी - सर्व मंत्र्यांना गेल्या शुक्रवारी जी अतिरिक्त खाती दिली गेली आहे, त्यानुसारच अधिसूचना जारी होईल. त्यात बदल केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले.अतिरिक्त खात्यांविषयी मंत्र्यांमध्ये वाद असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की खाती यापूर्वीच मी दिली आहेत व त्यामुळे बदल होणार नाही. खात्यांविषयी मंत्रिमंडळ बैठकीत काही चर्चा झाली नाही. पत्रकारांनी खाण व वन खात्याविषयी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की खाण खाते माङयाकडे असल्याने मी योग्य त्या पद्धतीने खाणप्रश्न सोडवीन. वन खाते उपमुख्यमंत्री विजय सरेदसाईंना दिले गेले. ते शेवटी माङया मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. मंत्री खंवटे यांना नियोजन व सांख्यिकी खाते दिले गेले, कारण आता हे खाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवण्यात अर्थ नाही. आता काही राज्याची वार्षिक योजना तयार करण्याची पद्धत नाही. या खात्याने केवळ आकडेवारी काढून अर्थ खात्याला द्यायची असते.उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पत्रकारांना सांगितले की, कुणाला कोणते खाते द्यावे हे मुख्यमंत्री ठरवत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. ते योग्य तो निर्णय घेतील. मला खातेप्रश्नी जास्त काही बोलण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या ताब्यात असलेल्या खात्यांना न्याय देणार आहोत. जे काही मिळालेय, त्यात आम्ही खूष आहोत. शेवटी आम्ही आता भाजपचे मंत्री आहोत आणि आम्हाला मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार मजबूत राहिलेले हवे आहे. आम्हाला स्थिर सरकार हवे आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाGovernmentसरकार