शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:34 IST

अस्तित्व सभेत गोमंतकीयांना सहकार्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सत्तेवर असलेले सरकार लोकांना न्याय देण्यास, त्यांचे प्रश्न हाताळण्यास, त्यांना प्राथमिक सुविधा देण्यास अपयशी ठरले असल्याने गोवेकरांचे हित राखण्यासाठी स्थापन झालेला रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष भविष्यातही गोवेकरांच्या हितासाठी अस्तित्वासाठी लढत राहणार, असा निर्धार आरजीच्या नेत्यांनी मंगळवारी केला.

आरजीने येथील टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या अस्तित्व सभेत सरकारवर टीका करण्यात आली. आमदार वीरेश बोरकर, मनोज परब व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गोवेकर गोव्यात पोरका झाला आहे. आपली वोट बँक तयार करण्यासाठी काही राजकारण्यांनी बाहेरील लोकांना गोव्यात आणले आहेत. त्यातून गावातून झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. झोपडपट्ट्यांना सुरक्षा दिली जाते. त्या जमीनदोस्त होण्याची गरज आहे. गोवेकरांच्या युवा पिढीच्या आपले हक्क मिळण्याची गरज असल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. 

सरकारला गोवेकरांच्या हिताचे काहीच पडलेले नाही. ते केवळ स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत. म्हादई वाचवण्यास सरकारला अपयश आले आहे. राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरील विचार करण्याची वेळ आली आहे. 'पोगो' कायद्यासाठी आजही आरजीकडून प्रयत्न केला जात असल्याचे बोरकर म्हणाले. म्हापशातील फुल मार्केटमध्ये आरजीच्या वतीने फुलराणी ही गोमंतकीय महिला फुल विक्रेत्यांची संघटनेची स्थापना करण्यात आली.

ज्येष्ठ विक्रेत्याच्या हस्ते त्याचे उ‌द्घाटन करण्यात आले. गावागावांतील स्थानिक विक्रेत्यांना एकत्रित आणण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी करून त्यांना सहकार्य तसेच आधार दिला जाईल. विक्रेत्यांना त्रास दिला तर संघटना त्यांच्या मागे राहील, असे मनोज परब यांनी यावेळी सांगितले. गोव्याचे भविष्य फक्त आरजीवर अवलंबून आहे. लोकांना आता हा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यामुळे लोकांनी आरजीकडे आपले भविष्य म्हणून पाहावे, असे आवाहन आरजीच्या इतर कार्यकर्त्यांनी या सभेतून केले.

बाजारपेठेतील फुल विक्रेत्यांनाही एकत्र आणण्यात येईल. राज्याबाहेरील विक्रेत्यांनी बाजारावर कब्जा केला आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांचे हित जोपासण्यासाठी ही संघटना स्थापन केल्याचे परब यांनी सांगितले. राज्याबाहेरील विक्रेत्यामुळे स्थानिक विक्रेत्यांवर परिणाम होतो. स्थानिकांच्या हक्कासाठी विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आमदार बोरकर यांनी सांगितले. भविष्यात राज्या बाहेरील विक्रेत्यांमुळे स्थानिकांवर होणारा परिणाम सहन केला जाणार नसल्याचा इशाराही बोरकर यांनी दिला. यावेळी विक्रेत्यांनी आपल्या समस्या सांगितल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्ल करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :goaगोवा