शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:34 IST

अस्तित्व सभेत गोमंतकीयांना सहकार्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सत्तेवर असलेले सरकार लोकांना न्याय देण्यास, त्यांचे प्रश्न हाताळण्यास, त्यांना प्राथमिक सुविधा देण्यास अपयशी ठरले असल्याने गोवेकरांचे हित राखण्यासाठी स्थापन झालेला रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष भविष्यातही गोवेकरांच्या हितासाठी अस्तित्वासाठी लढत राहणार, असा निर्धार आरजीच्या नेत्यांनी मंगळवारी केला.

आरजीने येथील टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या अस्तित्व सभेत सरकारवर टीका करण्यात आली. आमदार वीरेश बोरकर, मनोज परब व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गोवेकर गोव्यात पोरका झाला आहे. आपली वोट बँक तयार करण्यासाठी काही राजकारण्यांनी बाहेरील लोकांना गोव्यात आणले आहेत. त्यातून गावातून झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. झोपडपट्ट्यांना सुरक्षा दिली जाते. त्या जमीनदोस्त होण्याची गरज आहे. गोवेकरांच्या युवा पिढीच्या आपले हक्क मिळण्याची गरज असल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. 

सरकारला गोवेकरांच्या हिताचे काहीच पडलेले नाही. ते केवळ स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत. म्हादई वाचवण्यास सरकारला अपयश आले आहे. राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरील विचार करण्याची वेळ आली आहे. 'पोगो' कायद्यासाठी आजही आरजीकडून प्रयत्न केला जात असल्याचे बोरकर म्हणाले. म्हापशातील फुल मार्केटमध्ये आरजीच्या वतीने फुलराणी ही गोमंतकीय महिला फुल विक्रेत्यांची संघटनेची स्थापना करण्यात आली.

ज्येष्ठ विक्रेत्याच्या हस्ते त्याचे उ‌द्घाटन करण्यात आले. गावागावांतील स्थानिक विक्रेत्यांना एकत्रित आणण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी करून त्यांना सहकार्य तसेच आधार दिला जाईल. विक्रेत्यांना त्रास दिला तर संघटना त्यांच्या मागे राहील, असे मनोज परब यांनी यावेळी सांगितले. गोव्याचे भविष्य फक्त आरजीवर अवलंबून आहे. लोकांना आता हा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यामुळे लोकांनी आरजीकडे आपले भविष्य म्हणून पाहावे, असे आवाहन आरजीच्या इतर कार्यकर्त्यांनी या सभेतून केले.

बाजारपेठेतील फुल विक्रेत्यांनाही एकत्र आणण्यात येईल. राज्याबाहेरील विक्रेत्यांनी बाजारावर कब्जा केला आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांचे हित जोपासण्यासाठी ही संघटना स्थापन केल्याचे परब यांनी सांगितले. राज्याबाहेरील विक्रेत्यामुळे स्थानिक विक्रेत्यांवर परिणाम होतो. स्थानिकांच्या हक्कासाठी विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आमदार बोरकर यांनी सांगितले. भविष्यात राज्या बाहेरील विक्रेत्यांमुळे स्थानिकांवर होणारा परिणाम सहन केला जाणार नसल्याचा इशाराही बोरकर यांनी दिला. यावेळी विक्रेत्यांनी आपल्या समस्या सांगितल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्ल करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :goaगोवा