शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:34 IST

अस्तित्व सभेत गोमंतकीयांना सहकार्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सत्तेवर असलेले सरकार लोकांना न्याय देण्यास, त्यांचे प्रश्न हाताळण्यास, त्यांना प्राथमिक सुविधा देण्यास अपयशी ठरले असल्याने गोवेकरांचे हित राखण्यासाठी स्थापन झालेला रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष भविष्यातही गोवेकरांच्या हितासाठी अस्तित्वासाठी लढत राहणार, असा निर्धार आरजीच्या नेत्यांनी मंगळवारी केला.

आरजीने येथील टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या अस्तित्व सभेत सरकारवर टीका करण्यात आली. आमदार वीरेश बोरकर, मनोज परब व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गोवेकर गोव्यात पोरका झाला आहे. आपली वोट बँक तयार करण्यासाठी काही राजकारण्यांनी बाहेरील लोकांना गोव्यात आणले आहेत. त्यातून गावातून झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. झोपडपट्ट्यांना सुरक्षा दिली जाते. त्या जमीनदोस्त होण्याची गरज आहे. गोवेकरांच्या युवा पिढीच्या आपले हक्क मिळण्याची गरज असल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. 

सरकारला गोवेकरांच्या हिताचे काहीच पडलेले नाही. ते केवळ स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत. म्हादई वाचवण्यास सरकारला अपयश आले आहे. राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरील विचार करण्याची वेळ आली आहे. 'पोगो' कायद्यासाठी आजही आरजीकडून प्रयत्न केला जात असल्याचे बोरकर म्हणाले. म्हापशातील फुल मार्केटमध्ये आरजीच्या वतीने फुलराणी ही गोमंतकीय महिला फुल विक्रेत्यांची संघटनेची स्थापना करण्यात आली.

ज्येष्ठ विक्रेत्याच्या हस्ते त्याचे उ‌द्घाटन करण्यात आले. गावागावांतील स्थानिक विक्रेत्यांना एकत्रित आणण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी करून त्यांना सहकार्य तसेच आधार दिला जाईल. विक्रेत्यांना त्रास दिला तर संघटना त्यांच्या मागे राहील, असे मनोज परब यांनी यावेळी सांगितले. गोव्याचे भविष्य फक्त आरजीवर अवलंबून आहे. लोकांना आता हा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यामुळे लोकांनी आरजीकडे आपले भविष्य म्हणून पाहावे, असे आवाहन आरजीच्या इतर कार्यकर्त्यांनी या सभेतून केले.

बाजारपेठेतील फुल विक्रेत्यांनाही एकत्र आणण्यात येईल. राज्याबाहेरील विक्रेत्यांनी बाजारावर कब्जा केला आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांचे हित जोपासण्यासाठी ही संघटना स्थापन केल्याचे परब यांनी सांगितले. राज्याबाहेरील विक्रेत्यामुळे स्थानिक विक्रेत्यांवर परिणाम होतो. स्थानिकांच्या हक्कासाठी विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आमदार बोरकर यांनी सांगितले. भविष्यात राज्या बाहेरील विक्रेत्यांमुळे स्थानिकांवर होणारा परिणाम सहन केला जाणार नसल्याचा इशाराही बोरकर यांनी दिला. यावेळी विक्रेत्यांनी आपल्या समस्या सांगितल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्ल करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :goaगोवा